शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तब्येतीच्या ‘या’ ४ तक्रारी असतील तर आंघोळ करणं टाळा, तब्येतीसाठी ते घातक-पाहा कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2024 5:12 PM

1 / 7
आंघोळ करणं हे अगदी रोजचं काम आणि ते झालंच पाहिजे. स्वच्छतेसाठी तर आपण आंघोळ करतोच, पण आंघोळ करण्याचेही इतर अनेक फायदे आहेत.
2 / 7
नियमितपणे आंघोळ केल्यामुळे शरीराचं तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच वात, पित्त, कफ या तिन्ही प्रकृती संतुलित राहण्यास मदत होते. आंघोळ करण्याचे असे फायदे असले तरी तब्येतीच्या कोणत्या तक्रारी असतील तर आंघोळ करणं टाळलं पाहिजे, याची माहिती आयुर्वेद तज्ज्ञांनी दिली आहे.
3 / 7
सर्वसामान्यपणे खूप जास्त सर्दी असल्यावर किंवा ताप आल्यावर आपण आंघोळ करत नाही. पण या व्यतिरिक्त अन्य दुखण्यांमध्येही आंघोळ करणं टाळावं, असं आयुर्वेद तज्ज्ञांनी chitchatrajlavi and rajeshwarisachdev या इन्स्टाग्राम पेजवर सुचवलं आहे.
4 / 7
त्यानुसार जर जुलाब होत असतील, तर आंघोळ करू नये.
5 / 7
कान दुखत असेल तरीही आंघोळ करणं टाळावं.
6 / 7
जेवल्यानंतर लगेचच आंघोळ करू नये.
7 / 7
तसेच गॅसेसचा त्रास खूप जास्त होत असेल, तरीही अशा केसमध्ये आंघोळ करणं टाळायला पाहिजे, असं आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सAyurvedic Home Remediesघरगुती उपाय