शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

सायरस मिस्त्री अन् रतन टाटा यांच्यात काय नातं होतं, दोघांचे कौटुंबिक संबंध कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 19:32 IST

1 / 10
सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात केवळ व्यावसायिक संबंध नाहीत, तर दोघांमध्ये कौटुंबिक संबंधही आहेत. टाटा कुटुंब आणि मिस्त्री कुटुंब यांच्यात नातं आहे. परंतु हे नातं नेमकं कसलं आहे? कारण या नात्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल.
2 / 10
सायरस मिस्त्रीची आई पेट पेरिन डबास या आयर्लंडच्या रहिवासी आहेत. त्यांचा जन्म १९३९ मध्ये आयर्लंडमधील डब्लिन येथे झाला. पालोनजी मिस्त्री देखील पेट पेरिन डबासशी लग्न केल्यानंतर आयरिश नागरिक झाले. त्यांना दोन मुलगे आणि दोन मुली होत्या.
3 / 10
पालोनजी शापूरजींच्या दोन मुलांची नावे शापूर मिस्त्री आणि सायरस मिस्त्री आहेत, तर लैला आणि अल्लू या दोन मुली आहेत. पालोनजींची मुलगी अल्लू हिचा विवाह नोएल टाटा यांच्याशी झाला आणि त्यामुळे टाटा आणि मिस्त्री कुटुंब एकमेकांशी जोडले गेले. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत
4 / 10
म्हणजेच बहीण अल्लूचे पती नोएल टाटा नात्यात सायरस मिस्त्री यांचे मेहुणे झाले. आणि अशा रीतीने नोएलचे सावत्र भाऊ रतन टाटा देखील मेहुण्यासारखा झाले. म्हणजेच सायरस मिस्त्री हे नातेसंबंधात रतन टाटा यांच्या मेव्हण्यासारखे होते. एकप्रकारे पाहिले तर दोघांचे नाते दाजी-मेव्हणे मानले जाऊ शकते.
5 / 10
वडिलांप्रमाणे सायरस मिस्त्री यांच्याकडेही आयरिश नागरिकत्व होते. त्यांनी भारतात लग्न केले. देशातील आघाडीच्या वकिलांपैकी एक असलेल्या इक्बाल छागला यांची मुलगी रोहिका छागला यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. सायरस यांना दोन मुलगे आहेत.
6 / 10
कॉर्पोरेट जगतातील वादाचं बोलायचे झाले तर सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यातील वाद हा सर्वात मोठा होता. वर्षानुवर्षे त्यांच्यात भांडणे व वाद सुरूच होते. या दोघांमधील अंतर्गत भांडणे हा इतिहासातील सर्वात मोठा वाद मानला जातो. लाखो प्रयत्न आणि हस्तक्षेप करूनही दोन्ही बाजूंमध्ये तोडगा निघू शकला नाही.
7 / 10
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा समूहाने निवडणुकीसाठी देणगी कशी द्यायची, कोणत्या प्रकल्पात आणि कोणत्या प्रकल्पात गुंतवणूक कशी करायची, टाटा समूहाने अमेरिकन फास्ट फूड चेनमध्ये सामील व्हावे की नाही अशा मुद्द्यांवरून दोन्ही बाजूंमध्ये मतभेद आणि वादही झाले. हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला.
8 / 10
पालोनजी मिस्त्री यांचे पुत्र सायरस मिस्त्री यांना २०१२ मध्ये टाटा सन्स समूहाचे अध्यक्ष बनवण्यात आले. रतन टाटा यांना हटवून त्यांना या पदावर बसवण्यात आले. मात्र, २०१६ मध्ये मिस्त्री यांना अचानक अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. तेव्हापासून त्यांचे टाटा समूहाशी मतभेद आणि वाद सुरू होते.
9 / 10
टाटा समूहाने मिस्त्री यांच्या मालकीच्या एसपी ग्रुपचे शेअर्स विकत घेण्याची आणि टाटा सन्समध्ये विलीन करण्याची ऑफर दिली होती, परंतु मिस्त्री कुटुंबाने ते स्वीकारले नाही. अखेर हे प्रकरण न्यायालयात गेले जेथे रतन टाटा यांच्या बाजूने निकाल लागला. मिस्त्री कुटुंबाचा एसपी ग्रुप खूप कर्जदार आहे.त्याने टाटा सन्सचे काही शेअर्सही तारण ठेवले आहेत.
10 / 10
ज्या मुद्द्यांवरून वाद निर्माण झाला होता त्यातला एक मुद्दा म्हणजे देणग्यांचा मुद्दा. मोठमोठी कॉर्पोरेट हाऊसेस राजकीय देणग्या देतात आणि ही सुरुवातीपासूनची प्रथा आहे. टाटा सन्सचीही तीच स्थिती आहे. ओडिशातील देणगी प्रकरणावरून मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात मतभेद झाले होते.
टॅग्स :Ratan Tataरतन टाटा