1 / 8दिल्ली विद्यापीठातील दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने विद्यार्थ्यांना (डीएसजीएमसी) अनोखी पण चांगली अट घातली आहे. 2 / 8विद्यपीठात प्रवेश घेण्यापूर्वी दिल्लीच्या पर्यावरणासाठी काहीतरी चांगलं काम करण्याचं विद्यापीठाने बजावलं आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना एक नियम बनवून दिला आहे. 3 / 8विद्यापीठाच्या या नियमांचे पालन केल्यास दरवर्षी 55 हजार नवीन झाडं लावले जातील, असे डीएसजीएमसीचे प्रमुख मनजिंदर सिंह यांनी सांगितले आहे. 4 / 8विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रवेश घेताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे झाडे लावल्यासंदर्भातील लेखाजोखा सादर करावा लागणार आहे. 5 / 8डीएसजीएमसीने विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी 10 झाडे लावण्याची सक्ती केली आहे. प्रवेश घेतानाच, विद्यार्थ्यांना तसे वचनपत्र विद्यापीठाला द्यावे लागणार आहे. 6 / 8विद्यापीठाच्या या उपक्रमामुळे केवळ दिल्लीची हवा शुद्ध होणार नसून तरुणांमध्येही पर्यावरणासंदर्भात जागरुकता निर्माण होईल, असे दिल्ली कमिटीने म्हटले आहे. 7 / 8कमिटीच्या प्रमुखांच्या या आयडियाला स्विकारुन माता सुंदरी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. हरप्रीत कौर आणि खालसा कॉलेजच्या ऑफिसिएटींग प्राचार्य डॉ. पीएस जस्सल सिंह उपक्रब राबविण्याचे म्हटले आहे. 8 / 8दिल्लीत सध्या वायूप्रदुषणासोबतच जलप्रदुषण ही गंभीर समस्या बनली आहे. शहरातील नागरिकांनावर याचा वाईट परिमाण होत आहे. त्यामुळे दिल्ली विद्यापीठाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.