By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 11:15 IST
1 / 10मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षादरम्यान, होर्मुझची सामुद्रधुनी जगातील सर्वात संवेदनशील सागरी मार्गांपैकी एक बनली आहे. जगातील जवळजवळ २०% तेल टँकर येथून जातात, पण ड्रोन हल्ले, क्षेपणास्त्र धोके आणि नौदल तणाव आता वाढत आहेत.2 / 10अनेक शिपिंग कंपन्यांनी या मार्गाने जाणे जवळजवळ थांबवले आहे. या मार्गावर परिस्थिती गंभीर आहे.3 / 10अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनी ताब्यात घेण्याची धमकी दिला. 'जर हल्ले सुरूच राहिले तर ते मध्य पूर्वेतून 'एक लिटरही तेल' पाठवू देणार नाही, असा इशाराही इराणनेही लगेच दिला.4 / 10इराणी नौदलाच्या अनेक जहाजांवर हल्ला केला असल्याची माहिती अमेरिकेने आहे, यामध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ कार्यरत असलेल्या १६ सुरुंग टाकणाऱ्या जहाजांचा समावेश आहे. यामध्ये सर्व इराणी जहाजे नष्ट करण्यात आली आहेत, असा दावा अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचा आहे.5 / 10मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, या महत्त्वाच्या जलमार्गावरून सध्या प्रवास करणारी जहाजे लाईव्ह ट्रॅकरद्वारे पाहता येतील. पाहण्यासाठी येथे क्लिक करा. https://hormuzstraitmonitor.com/6 / 10होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद होण्यापूर्वीच पेट्रोलच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, अमेरिकन सैन्य ते उघडे ठेवण्यासाठी अधिक पर्यायांवर विचार करत आहे. मंगळवारी देशात झालेल्या लष्करी कारवाईचा हा भाग होता. हा आतापर्यंतच्या हल्ल्यांपैकी 'सर्वात तीव्र' दिवस असेल, असा इशारा अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी दिला.7 / 10वृत्तानुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या आवश्यक तेल आणि वायूचा पुरवठा करणाऱ्या जहाजांना एस्कॉर्ट करण्यासाठी भारत आपल्या युद्धनौका पाठवण्याचा विचार करत आहे. पाकिस्तान आधीच स्वतःच्या दोन जहाजांना मायदेशी परत आणण्यासाठी नौदलाच्या जहाजांचा वापर करत आहे. 8 / 10भारतीय जहाज मालकांनी नौदलाच्या एस्कॉर्टसाठी केलेल्या विनंतीला प्रतिसाद म्हणून सरकार युद्धनौका पाठवण्याचा विचार करत आहे. 9 / 10भारतीय व्यावसायिक जहाजांना मायदेशी परत आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या युद्धनौका पाठवण्याची योजना आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर, इराणने पर्शियन समुद्रातील मोक्याचा होर्मुझचा सामुद्रधुनी बंद केला आहे. युद्धाच्या ११ व्या दिवशीही डझनभर देशांना होणारा ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला आहे.10 / 10ब्रोकरेज फर्म जेफरीजच्या मते, मध्य पूर्व भारताच्या ५५% कच्च्या तेलाचा पुरवठा करते. देशाच्या ३५% तेल आयात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. भारत त्याच्या एलपीजी मागणीपैकी जवळजवळ दोन तृतीयांश आयात आयातीद्वारे पूर्ण करतो, यापैकी बहुतेक युएई, कतार, सौदी अरेबिया आणि कुवेत सारख्या आखाती देशांमधून येते. भारताच्या एलपीजी आयातीपैकी जवळजवळ ८०% होर्मुझच्या मोक्याच्या सामुद्रधुनीतून जाते.