तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:54 IST
1 / 9राजा रघुवंशी हत्याकांडामुळे अवघा देश हादरला आहे. जर त्याच्याशी असेच वागायचे होते तर लग्नच का केले असा सवाल आता लोकांमधून विचारला जात आहे. एखाद्या क्रूर किंवा मानसिक रोग्याला लाजवेल अशी राजाची १० दिवसांची पत्नी सोनम वागली आहे. जर नांदायचेच नव्हते तर तिला लग्नापूर्वी आणि लग्नानंतरही राजापासून वेगळे व्हायचे मार्ग होते, मग तिने एवढे खतरनाक पाऊल का उचलले असेल, असा सवाल लोकांच्या मनात उपस्थित होत आहे.2 / 9मेघालय पोलिसांनी राजाच्या हत्येमागे सोनम आणि राज यांच्यातील प्रेमसंबंधांचे कारण दिले आहे. पोलीस ज्या गोष्टीवर तपास करत आहेत, त्यातही अनेक हेलकावे आहेत. हत्या का केली याचे ठोस कारणच स्पष्ट होत नाहीय. सोनमकडे जर अन्य सोपे पर्याय होते तर हत्या का केली, कारण तिला माहिती होते की तुरुंगवास पक्का आहे मग तिने एवढी मोठी रिक्स का घेतली असाबी सवाल उपस्थित होत आहे. 3 / 9एवढी क्रूर हत्या करण्याचा मार्ग निवडणे सोनमसारख्या मुलीकडून हे तथ्य वाटत नाही. कारण हत्या करण्यासाठी मोठे धाडस लागते. तेवढे क्रूर असावे लागते किंवा अत्याचार सहन करून सहनशीलता संपली की एखादा व्यक्ती हे टोकाचे पाऊल उचलतो. सोनमकडे तर तसे काहीच नव्हते. पोलिसांनुसार ते लग्न होण्यापूर्वीपासूनच राजाच्या हत्येचा प्लॅन करत होते. राजाची हत्या झाली हे खरे आहे, पोलिसांनुसार सोनमनेच केली हे देखील खरे मानले तरी यामागचे कारण काही वेगळेच असण्याची शंका येत आहे.4 / 9सोनम तिच्या लग्नामुळे खूश नव्हती हे खरे वाटते. पण ती एवढीही मूर्ख नसेल की पतीला मारून टाकून तुरुंगात जाण्याएवढी. तिच्याकडे सोपे मार्ग असूनही ती अशी क्रूर सैतानासारखी का वागली, यामागचे कारण देखील पोलिसांना शोधून काढावे लागणार आहे.5 / 9सोनमकडे लग्नापूर्वी अनेक पर्याय होते. राजासोबत लग्न करायचे नव्हते तर ती आपल्या आई-वडिलांना सांगू शकली असती. त्यांना समाजातच लग्न करायचे होते, असे जरी असले तरी घरात काहीतरी भांडण-तंटे तरी झाले असते, तिला खोलीत कोंडून ठेवले असते किंवा ती पळून देखील जाऊ शकली असती. असे झाले असते तर किमान राजाची हत्या तरी झाली नसती. 6 / 9लग्न मोडण्यासाठी सोनम किंवा तिचा कथित प्रियकर राज हे राजाच्या घरच्यांना जाऊन त्यांच्या प्रेमाची कबुली देऊ शकले असते. ते ऐकल्यावर कोणते आई-बाप आपल्या मुलाचे लग्न अशा मुलीशी लावून देण्यास तयार होतील. राजाच्या आईवडिलांनीच लग्न मोडले असते. 7 / 9एवढे धाडस सोनम करू शकली नसती तरी निदान राजाला तरी सांगू शकली असती. माझे दुसऱ्या मुलावर प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचे आहे, एवढे जरी सांगितले असते तरी राजाने तिच्यासोबत लग्न मोडले असते किंवा नकार दिला असता. 8 / 9समजा सोनमला या तीनपैकी एकाही गोष्टीचे धाडस करता आले नाही. मग किमान लग्न झाल्यावर तरी ती घटस्फोट घेऊ शकली असती. किमान यात निष्पाप राजाचा जीव तरी वाचला असता. 9 / 9हे सर्व मार्ग सोडून सोनमने राजाला कुठेतरी नेऊन संपविण्याचा मार्ग का निवडला, प्रेमात एवढी का क्रूर झाली की आता ती स्वत: तुरुंगवासात बसणार आहे. तिचा प्रियकरही दुसऱ्या कुठल्यातरी तुरुंगात खितपत असणार आहे. मग या दोघांनी प्रेम करून आणि राजाचा जीव घेऊन काय मिळविले, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. प्रेम आणि रागाच्या भरात अशी पाऊले उचलताना थोडा तरी विचार केला असता तर आज या दोघांवर पश्चातापाची वेळ आली नसती. राजाचे आयुष्य संपले नसते, तसेच राजाच्या आईवडिलांचेही आयुष्य उध्वस्त झाले नसते.