By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 11:34 IST
1 / 8गेल्या महिनाभरात सरकारने आणि गॅस कंपन्यांनी मिळून तब्बल ८ लाख नवीन पीएनजी कनेक्शन दिले आहेत. हा आतापर्यंतचा एक मोठा विक्रम मानला जात आहे.2 / 8ज्यांच्या घरी पीएनजी कनेक्शन आले आहे, त्यांनी स्वेच्छेने आपले एलपीजी कनेक्शन सोडण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत १६,००० हून अधिक लोकांनी आपले जुने गॅस कनेक्शन सरकारकडे जमा केले आहे.3 / 8स्वेच्छेने गॅस कनेक्शन सोडणाऱ्या नागरिकांचा गौरव करण्यासाठी सरकारने पोर्टलवर 'हॉल ऑफ फेम' तयार केले आहे. येथे अशा नागरिकांची माहिती प्रसिद्ध करून त्यांचा सन्मान केला जातो.4 / 8वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सध्या पाईपलाईनद्वारे घराघरातील गॅसची १००% मागणी यशस्वीरीत्या पूर्ण केली जात आहे. म्हणजेच घरगुती वापरासाठी आता पीएनजी हा सर्वात सक्षम पर्याय ठरत आहे.5 / 8केवळ घरेच नाही, तर हॉटेल्स आणि उद्योगांसारख्या व्यावसायिक क्षेत्रातील गॅसची मागणीही आता ८०% पीएनजीद्वारे पूर्ण केली जात आहे.6 / 8गॅस वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. आता देशात सिलिंडरची ९५% बुकिंग ही ऑनलाईन माध्यमातून केली जात आहे.7 / 8गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी आता ९०% डिलिव्हरी ही 'ऑथेंटिकेशन कोड'द्वारे केली जात आहे. फेब्रुवारीमध्ये हा आकडा केवळ ५३% होता, जो आता मोठ्या प्रमाणात सुधारला आहे.8 / 8सुमारे ५० लाख सिलिंडरचा नियमित पुरवठा सुरू ठेवण्यासोबतच, आता पीएनजीचे जाळे देशभर पसरवण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.