विमान अपघातानंतर लगेच दुसरा 'धक्का'! एअर इंडियाचं कोट्यवधींचं नुकसान, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:30 IST
1 / 7गुरुवारी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर, शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा हवाई प्रवासासंदर्भात चिंतेची बातमी समोर आली आहे. मुंबईहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI129 उड्डाणानंतर काही वेळातच मुंबईत परत बोलावण्यात आले. यामुळे एअर इंडियाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.2 / 7गुरुवारी घडलेल्या घटनेत एअर इंडियाचे सुमारे ९६० कोटी रुपये किमतीचे विमान नष्ट झाले. शिवाय मोठी जीवितहानी झाली. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाही प्रत्येकी १ कोटी रुपयांची मदत कंपनीने जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत आज अचानक उड्डाणे रद्द आणि काही वळवावी लागल्याने कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.3 / 7इराणमधील परिस्थिती सध्या खूपच तणावपूर्ण आहे. या वाढत्या तणावामुळे तेथील हवाई क्षेत्र तात्पुरते बंद करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वात जास्त प्राधान्य देत, एअर इंडियाने हे पाऊल उचलले आहे. धोका टाळण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.4 / 7आंतरराष्ट्रीय उड्डाणे वळवली: एअर इंडियाने एक निवेदन जारी करून सांगितले आहे की, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे त्यांच्या निर्धारित मार्गांवरून वळवण्यात आली आहेत किंवा त्यांच्या उड्डाणाच्या ठिकाणी (Departure Points) परत बोलावण्यात आली आहेत.5 / 7पूर्वीही अशी खबरदारी: याआधीही, जेव्हा अशाप्रकारची जागतिक किंवा भू-राजकीय संकटं निर्माण झाली आहेत, तेव्हा विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अशाच प्रकारची खबरदारी घेतली आहे.6 / 7एअर इंडियाचे आवाहन: एअर इंडिया सध्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. त्यांनी प्रवाशांना सहकार्य करण्याचे आणि धीर धरण्याचे आवाहन केले आहे.7 / 7प्रवाशांसाठी सूचना: प्रवाशांना त्यांच्या फ्लाइटची अद्ययावत स्थिती जाणून घेण्यासाठी एअरलाइनची वेबसाइट तपासण्याचा किंवा ग्राहक सेवेशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे.