1 / 7उन्हाळ्यात झालेली काहिली आणि पावसाच्या आगमनाची आतुरता अशा संमिश्र मनःस्थितीच्या काळात हे व्रत येते. जेणेकरून पूर्व अनुभवाचा विचार करून लोकांनी पुढच्या उन्हाळ्यात त्रास होऊ नये, पुढच्या पिढयांना त्रास होऊ नये, या जाणिवेसाठीदेखील या व्रताचे आयोजन पूर्वसुरींनी केले असावे.2 / 7निर्जला एकादशीचे व्रत निर्जळी राहून अर्थात पाणी न पिता केले जाते. द्वादशीला कृष्णाला फुल वाहून या उपास सोडला जातो. त्याचबरोबर या दिवशी जलकुंभदान करण्याची प्रथा आहे. आपण निर्जळी राहून पाण्याचा कुंभ दान करणे यामागे कारण काय? तर भरल्या पोटी कोणीही दान करेल, पण आपण उपाशी असताना गरजवंताला केलेली मदत हे खरे दान असते. त्याचप्रमाणे आपण पाणी न पिता या एकादशीला दुसऱ्याला पाण्याचा कुंभ दान करणे हे दानाचे महत्त्व लक्षात यावे यासाठी केलेले प्रयोजन आहे. 3 / 7दानाच्या अनेक प्रकारांमध्ये जलकुंभदानाला महत्त्व आहे. घरी आलेल्या पाहुण्यांना आपण जसे आदरातिथ्य म्हणून पाणी देतो, तसेच पावसाळ्यात मचूळ पाण्यामुळे अनेक गरीब कुटुंबियांना दुषित पाणी प्यावे लागते. यासाठी अशा कुटुंबांना आपल्या कडून एक घडाभर स्वच्छ पाणी पुरवता आले, तर ते जलकुंभदान पुण्यदायी ठरेल.4 / 7दानाचा उद्देशच हा आहे, की समोरच्याची गरज ओळखून अडल्या-नडलेल्याला यथाशक्ती मदत करणे. जलदान केवळ उन्हाळ्यात नाही, तर पावसातही गरजेचे आहे, हे ओळखून वस्त्रगाळ केलेले अथवा उकळलेले पाणी गरजवंतांना द्यावे, यासाठी निर्जला एकादशी निमित्त या विधीचे आयोजन केले आहे.सर्व पापांचा नाश होऊन स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून हे व्रत केले जाते. तसेच जेव्हा तुम्ही दुसऱ्याला उपयोगी ठरता तेव्हा तुमच्याही घरात सुख समृद्धीचा घडा आपोआप भरलेला राहतो!5 / 7निर्जला एकादशीच्या आदल्या दिवशी गंगादशहरा पूर्णत्वास जातो. तर ज्येष्ठ शुक्ल एकादशी ही `निर्जला एकादशी' म्हणून प्रसिद्ध आहे. आधी नदीचा अर्थात जीवन दायिनी गंगा मातेचा उत्सव आणि नंतर पाणी न पिता केलेले निर्जला एकादशीचे व्रत पाण्याचे महत्त्व शिकवणारे आहे. ते निर्जला एकादशी केल्याशिवाय कसे कळणार?6 / 7पाण्याला आपण `जीवन' म्हणतो. `जलति जीवयति लोकानिती' म्हणजे जीव जगवण्याचे काम पाणी करते. मग तो प्राण्यांचा असो की, वृक्षवेलींचा! सर्व उपचारविधी करता येणे शक्य नसेल त्यांनी निदान चार पाच जणांना थंड पेय पदार्थ तरी जरूर द्यायला हरकत नाही.7 / 7अशा तऱ्हेने तुम्हीदेखील हे सोपे व्रत अथवा जलदान विधी करून पुण्याचे भागीदार सहज होऊ शकता. जलदानाप्रमाणे निर्जला एकादशीनिमित्त एखाद्या भुकेल्याला अन्न देणे, पावसाळी उपयोगी वस्तू दान करणे, वाटसरूला आवश्यक मदत करणे हे सत्कर्मदेखील दानधर्माचे पुण्य देते.