शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

येलदरी प्रकल्पात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी: जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील प्रकल्पामध्ये सद्यस्थितीला ६९.६८ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक असून, या पाण्याच्या भरवशावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी: जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील प्रकल्पामध्ये सद्यस्थितीला ६९.६८ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक असून, या पाण्याच्या भरवशावर उन्हाळ्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाणार आहे.

मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला होता. ६ वर्षांनंतर प्रथमच पावसाळ्यापूर्वीच येलदरी प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा झाला होता. पावसाळ्याच्या काळात अनेक वेळा हा प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडून देण्याची वेळ आली होती. त्याचबरोबर, या प्रकल्पाच्या पाण्यावर वीजनिर्मितीही सुरू करण्यात आली.

पावसाळा संपल्यानंतर उन्हाळ्यातही प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने, अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. परभणी शहरासह हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी येलदरी प्रकल्पावर आहे. त्याचप्रमाणे, ग्रामीण भागातील सुमारे अडीचशेपेक्षा अधिक पाणीपुरवठा योजना या प्रकल्पावर चालविल्या जातात.

उन्हाळ्यात दरवर्षी टंचाईचा सामना करावा लागतो. मात्र, या वर्षी टंचाईची परिस्थिती उद्‌भवणार नाही, असे दिसते. ६८८ दलघमी एकूण पाणी साठवण क्षमता असलेल्या या प्रकल्पामध्ये सद्यस्थितीला ५६४.२८७ दलघमी जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याची टक्केवारी ६९.६८ टक्के एवढी आहे.

१ जूनपासून १ हजार मिमी पाऊस

येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये १ जून, २०२० पासून आजपर्यंत १ हजार ५४ मिमी पाऊस झाला आहे. या पावसामुळे धरणात १८८४.६३ दलघमी पाण्याची आवक झाली. धरण १०० टक्के भरल्याने या प्रकल्पाच्या विद्युत निर्मिती केंद्राद्वारे ६३८.८१ आणि मुख्य दरवाजाद्वारे १०२१.६९ दलघमी पाण्याचा विसर्ग आजपर्यंत झाला आहे.