शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सरकारसोबत अनेक वर्षांपासूनचा झगडा; मरेन पण, समाजाशी गद्दारी नाही: मनोज जरांगे

By ज्ञानेश्वर भाले | Updated: October 2, 2023 18:12 IST

अनेक अडचणी आल्या, मात्र समाजाच्या प्रश्नांसाठी मी यंत्रणांना भांडत राहिलो.

परभणी : मराठा समाजाचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत असून त्यांना न्याय देण्यासाठी समाजाला कुणबी म्हणून गणले जाणे महत्त्वाचे आहेत. आंतरवालीतील आंदोलनानंतर नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. परंतु तो अर्धवट असून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केले. ते सोमवारी दुपारी परभणीत झालेल्या सभेत बोलत होते.

मराठा समाजाची स्थिती बघता त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची गरज असून कुणबी प्रमाणपत्र द्यायला हवे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत लढा उभारला होता. यादरम्यान सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेत समाजाला न्याय देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांसह बहुतांश मंत्र्यांनी आंदोलनस्थळी येऊन त्यांना दिले होते. त्यानंतर सरकारने निर्णय घेत ज्यांच्याकडे निजामकालीन नोंदी आहे, त्यांनाच प्रमाणपत्र देण्यात येईल असे धोरण आखले. परंतु या निर्णयामुळे मराठा समाजाचे प्रश्न सुटणार नसून समाजाला अर्धवट नाही तर सरसकटच कुणबी असल्याचे प्रमाणपत्रावर जरांगे पाटील ठाम होते. त्यामुळे सरकारने यासाठी पुरावे गोळा करण्यासाठी एका महिन्याची मुदत मागवली होती. यावर जरांगे पाटील यांनी अजून दहा दिवसाचा कालावधी दिला होता. संबंधित मुदत संपत आली असून समाधानकारक निर्णय झाला नाही तर १४ ऑक्टोंबरला आंतरवालीत सभा घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. 

आणखी किती पुरावे हवेतआंतरवालीतील आंदोलनानंतर सरकारने त्याची दखल घेत मराठवाड्यातील मराठा समाजाला न्याय देण्यासाठी जिल्हानिहाय प्रशासकीय यंत्रणांना कळविण्यात आले होते. त्यानुसार मराठवाड्यातील शासकीय दस्तावेजांची तपासणी करून कुणबी समाजाच्या नोंदी असणाऱ्या विविध कागदपत्रांचा अहवाल एकत्रित करून सरकारला देण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने मराठवाड्यात मराठा समाजाच्या कागदपत्रांवर शेकडो ठिकाणी कुणबी असल्याच्या नोंदी पुढे आल्या आहे. त्यामुळे सरकारला आणखी किती पुरावे हवेत, असा प्रश्न यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

अंतरवालीत राज्यव्यापी सभासरकारने मराठा समाजाला कुणबीचे म्हणून प्रमाणपत्र देण्यासाठी एका महिन्याची मुदत मागितली होती. यानंतर आणखी दहा दिवस त्यांना वाढवून देण्यात आले. परंतु ती मुदत आता संपत आली आहे. आगामी काळात सकारात्मक निर्णय झाला नाही तर १४ ऑक्टोंबरला अंतरवाली सराटीत राज्यव्यापी सभा घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

मरेन पण, समाजाशी गद्दारी नाहीमी कित्येक वर्षापासून मराठा समाजाच्या प्रश्नासाठी सरकारशी झगडत आहे. यादरम्यान अनेक अडचणी आल्या, मात्र समाजाच्या प्रश्नांसाठी मी यंत्रणांना भांडत राहिलो. यादरम्यान अनेक अडचणी, प्रलाेभने आली पण त्यास कधीही बळी पडलो नाही. मी मरेन पण समाजाशी गद्दारी करणार नसल्याची भुमिका जरांगे पाटलांनी आपल्या भाषणात मांडली. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणparabhaniपरभणी