शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

सार्वजनिक विहिरींची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:16 IST

रस्त्यांच्या कामांना जिल्ह्यात मिळेना गती परभणी : जिल्ह्यात रस्त्यांची कामे वेगाने होत नसल्याने त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत ...

रस्त्यांच्या कामांना जिल्ह्यात मिळेना गती

परभणी : जिल्ह्यात रस्त्यांची कामे वेगाने होत नसल्याने त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. वसमत, जिंतूर, पाथरी आणि गंगाखेड या चारही रस्त्यांवर रस्त्याची कामे सुरू झाली आहेत. मात्र, मागच्या दोन वर्षांपाूसन ही कामे पूर्ण होत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे या कामांमुळे किरकोळ अपघातही होत आहेत. तेव्हा रस्त्याच्या कामांना गती द्यावी, अशी वाहनधारकांची मागणी आहे.

कोरोनाच्या संकटाने विकासकामांना ब्रेक

परभणी : दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट वाढत असल्याने जिल्ह्यातील विकासकामांना ब्रेक लागला आहे. काही कामांसाठी निधी उपलब्ध नाही तर काही कामे निधी उपलब्ध असतानाही सुरू केली नाहीत. त्यामुळे तब्बल दोन वर्षांपासून विकासकामे ठप्प आहेत. पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, रोजगार याविषयी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अडचणी उभ्या राहात आहेत. राज्य शासनाने विकासकामे हाती घ्यावीत, अशी मागणी होत आहे.

रेल्वेस्थानकावर दादऱ्याचे काम संथगतीने

परभणी : येथील रेल्वेस्थानक परिसरात दादऱ्याचे काम संथगतीने सुरू असून, दीड वर्षांपासून हे काम पूर्ण झाले नाही. परभणी रेल्वेस्थानकावर प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेता, अधिक रुंदीचा दादरा या ठिकाणी उभारण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र अद्याप हे काम पूर्ण झाले नाही. सध्या रेल्वे प्रवाशांची संख्या मर्यादित स्वरुपाची आहे. तेव्हा पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

बँकांसमोर ग्राहकांची मोठी गर्दी

परभणी : शहरातील बँकांसमोर ग्राहकांची मोठी गर्दी होत असून, फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन होत आहे. प्रत्येक महिन्यात १ ते १० तारखेदरम्यान बँकांच्या परिसरात मोठी गर्दी होते. विशेष म्हणजे ग्रामीण भागातून आलेले आणि गोरगरीब नागरिकच या ठिकाणी रांगा लावून बँकेचे व्यवहार करतात. या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. तेव्हा बँक प्रशासनाने याबाबत त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

दुभाजकावरील झाडे वाळू लागली

परभणी : शहरातील जिंतूर रोड आणि वसमत रस्त्यावरील दुभाजकावर झाडे लावण्यात आली आहेत. वाढलेल्या उन्हामुळे ही झाडे जळू लागली आहेत. झाडांना पाणी कमी पडत असून, कोवळी झाडे जळत आहेत. महानगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन झाडांना टँकरद्वारे पाणी द्यावे, अशी मागणी वृक्षप्रेमी नागरिकांतून केली जात आहे.