शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

परभणी :शेतकऱ्यांमध्ये भांडण कशाला लावता? राहुल पाटील यांचा बबनराव लोणीकर यांना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:04 IST

निम्न दुधना प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने परभणीला १५ दलघमी पाणी सोडले तरी इतर ठिकाणच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही. त्यामुळे धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यास सहकार्य करा. जालना आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भांडणं कशाला लावता, असा सवाल शिवसेनेचे आ.राहुल पाटील यांनी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांना केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : निम्न दुधना प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने परभणीला १५ दलघमी पाणी सोडले तरी इतर ठिकाणच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही. त्यामुळे धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यास सहकार्य करा. जालना आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भांडणं कशाला लावता, असा सवाल शिवसेनेचे आ.राहुल पाटील यांनी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांना केला आहे.निम्न दुधना प्रकल्पातून परभणी, सेलू, मानवत व जिंतूर तालुक्यातील गावांना पिण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांनी लावून धरली आहे. या अनुषंगाने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पुढाकार घेतला होता. याला जालना जिल्ह्यातील राजकीय नेते व काही शेतकरी विरोध करीत आहेत. शुक्रवारी धरणाच्या पायथ्याशी पाणी सोडण्यास विरोध करणाºया आंदोलकांसमोर बोलताना पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झालेला नाही व नदीपात्रात पाणी सोडू देणार नाही. बॅकवॉटरमधील मोटारी कदापि काढू दिल्या जाणार नाहीत, अशी भूमिका घेतली होती. या संदर्भात बोलताना परभणीचे शिवसेनेचे आ.डॉ.राहुल पाटील म्हणाले की, धरणाची निर्मितीच मुळात कमांड एरियासाठी झालेली आहे.शिवाय धरणात सध्या मुबलक पाणी आहे. परभणीसाठी १५ टीएमसी पाणी सोडले तरी त्याचा इतर योजनांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील शेतकºयांमध्ये वाद कशाला लावता, असा सवाल पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांना करून परभणीचे संपर्कमंत्री म्हणून दुष्काळाने व्याकुळ झालेल्या जिल्हावासियांना पाणी देण्याची तुमची जबाबदारी नाही का, असा सवालही आ.डॉ.पाटील यांनी केला आहे. बॅकवॉटरमध्ये अनधिकृत मोटारीद्वारे उपसा सुरु आहे. त्यालाही आमची हरकत नाही. तरीही तुम्ही राजकारण कशासाठी करता आहात, असेही ते म्हणाले. खुद्द पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी पाणी सोडण्यास हरकत नसल्याचे लेखी वरिष्ठांना कळविले आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जनतेच्या भावना व गरजा लक्षात घेऊन सर्व शेतकरी लोणीकर यांनी एकसमान समजावेत व सकारात्मक भूमिका घेऊन पाणी सोडण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहनही आ.डॉ.पाटील यांनी केले आहे.जिल्ह्यातील इतर नेत्यांची पाणी सोडण्याबाबत अस्पष्ट भूमिकानिम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी आ.राहुल पाटील यांनी लावून धरली आहे. काही नेत्यांनी गेल्या महिन्यात या संदर्भात जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले होते; परंतु, सक्रिय भूमिका मात्र अद्यापपर्यंत घेण्यात आलेली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.दुसरीकडे नदीपात्रात पाणी सोडण्यास पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, काँग्रेसचे माजी आ.सुरेश जेथलिया यांच्यासह जालन्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. शिवाय परभणी जिल्ह्यातील सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनीही विरोधाची भूमिका घेतली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीWaterपाणी