शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वांझोट्या सोयाबीन बियाणांसाठी जबाबदार कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 16:04 IST

शेतकऱ्यांच्या या संकटाला जबाबदार कोण? उसनवारी केलेल्या शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार, या प्रश्नावर अंतिम अहवालानंतर शासन योग्य तो निर्णय घेईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. 

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार?२९२५ पैकी १ हजार ९१५ नमुने अप्रमाणित 

- प्रसाद आर्वीकर 

परभणी : मराठवाड्यातील सुमारे १५ लाख हेक्टर क्षेत्रापैकी बहुतांश क्षेत्रावरील सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. आठही जिल्ह्यांतून ४६ हजारांवर तक्रारी आल्या. काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले. पंचनामेदेखील गतीने सुरू झाले. तपासणीत २९२५ पैकी १ हजार ९१५ नमुने अप्रमाणित निघाले. शेतकऱ्यांच्या या संकटाला जबाबदार कोण? उसनवारी केलेल्या शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार, या प्रश्नावर अंतिम अहवालानंतर शासन योग्य तो निर्णय घेईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. 

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी परभणी येथे बीज प्रमाणीकरण कार्यालयात बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली जाते़ या कार्यालयात एप्रिल ते ८ जुलैपर्यंत ३ हजार ६२ सोयाबीन बियाणांचे नमुने तपासणीसाठी आले होते़ त्यापैकी २ हजार ९२५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली़ त्यातील तब्बल १ हजार ९१५ नमुने अप्रमाणित ठरले आहेत़ यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या महाबीज या कंपनीसह विविध खाजगी कंपन्या आणि खाजगी वैयक्तीक शेतकऱ्यांच्या नमुन्यांचाही समावेश आहे़ महाबीज कंपनीचे १ हजार ८७३ लॉटस् तपासण्यात आले़ त्यापैकी १४८० नापास झाले़ तसेच विविध कंपन्या आणि शेतकऱ्यांचे २४३ लॉटस् तपासले होते़ त्यापैकी २३० लॉटस् अप्रमाणित प्राप्त झाले आहेत़ त्याचप्रमाणे या कार्यालयातून विक्रीसाठी आलेल्या बियाणांचीही तपासणी केली जाते़ या तीन महिन्यांमध्ये ९४६ नमुने आले होते़ त्यातील २५६ नापास निघाले.

का उगवले नाही सोयाबीन?या प्रश्नावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विद्यावेत्ता डॉ़यु़एल़ आळसे म्हणाले,  ‘सोयाबीन न उगवण्यासाठी केवळ एक घटक कारणीभूत नाही़ बियाणांची उगवण क्षमता कमी असणे हे सर्वात महत्त्वाचे कारण. नामांकित कंपन्यांचेही बियाणे उगवले नाही़ मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात मराठवाड्याच्या बहुतांश भागात अतिवृष्टी झाली होती़ त्यावेळी सोयाबीन बियाणे भिजले़ या बियाणांवर बुरशी वरुन दिसत नसली तरी ती अस्तित्वात होती़ आर्द्रता वाढल्याने बियाणांची उगवण क्षमता कमी झाली़’ बीज प्रक्रिया करूनच पेरणी करणे आवश्यक असताना तसे झाले नाही़ काही ठिकाणी बीज प्रक्रिया केल्यानंतरही या बियाणांची ४ पेक्षा अधिक वेळा हाताळणी झाल्याने उगवण क्षमता कमी झाली़, तर काही भागांत हलक्या जमिनींमध्ये पेरणी केल्यानंतर अपेक्षित पाऊस झाला नाही,’ अशी अनेक कारणे असल्याचे आळसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

नुकसान भरपाईची कायद्यातही तरतूद नाहीकेंद्र आणि राज्य शासनाने बियाणे संदर्भातील एकाही कायद्यात नुकसान भरपाईच्या अनुषंगाने मदतीची तरतूद नाही़ केवळ ग्राहक मंचामध्ये एक ग्राहक म्हणून तक्रार करता येते़ त्यामुळे शासनाने हस्तक्षेप करून नैसर्गिक आपत्ती म्हणून २५ टक्के रक्कम नुकसान भरपाई म्हणून द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे सुधीर बिंदू यांनी केली आहे़

विद्यापीठाने बियाणे विकलेच नाहीयावर्षी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सोयाबीनचे बियाणे उपलब्ध नव्हते़ जे बियाणे उपलब्ध होते ते ब्रिडींगसाठी ठेवले होते़ त्याचीही उगवण क्षमता कमी असल्याची माहिती कृषी विद्यापीठातून देण्यात आली़

कृषी विक्रेत्यांचा तीन दिवस राज्यव्यापी बंदसोयाबीन न उगवल्याचा ठपका बियाणे विक्रेत्यांवर ठेवून एफआयआर दाखल करा, असे आदेश कृषी आयुक्तांनी दिले आहेत. याविरुद्ध राज्यातील ५२ हजार कृषी विक्रेते १० ते १२ जुलैदरम्यान दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविणार असल्याची माहिती, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड सीडस डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी औरंगाबादेत दिली.

शासन योग्य तो निर्णय घेईलपंचनाम्यांचा अहवाल शेतकऱ्यांना देऊन संबंधित दोषी कंपनीविरुद्ध शेतकरी स्वत: गुन्हा दाखल करू शकतात़  तसेच कृषी विभागाकडूनही गुन्हे नोंदविले जात आहेत़  शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी प्रशासन म्हणून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत़  अहवाल सादर केल्यानंतर शासन योग्य तो निर्णय घेईल़- डी़.एल़.जाधव, कृषी सहसंचालक  

शेतकऱ्यांच्या या प्रश्नांचे उत्तर कोण देणार?1. पहिल्या-दुसऱ्या पेरणीसाठी झालेला खर्च आणि मनुष्यवेळ भरपाई कोण देणार?2. पुढील पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत कोण करणार?3. अंतिम अहवाल आल्यानंतर सरकारी मदत मिळेपर्यंत शेत पडीक ठेवले तर कुटुंबाचे कसे भागणार ? 

टॅग्स :parabhaniपरभणीagricultureशेतीFarmerशेतकरी