शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
4
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
5
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
6
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
7
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
8
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
9
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
10
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
11
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
12
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
13
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
14
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
15
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
16
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
17
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
18
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
19
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”

गहू, हरभऱ्याचे पीक बहरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:16 IST

परभणी बसस्थानकावर सुविधांचा अभाव परभणी : येथील बसस्थानकावर प्रवाशांना सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ...

परभणी बसस्थानकावर सुविधांचा अभाव

परभणी : येथील बसस्थानकावर प्रवाशांना सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासह आसन व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी उपलब्ध नसल्याने प्रवाशांत नाराजी व्यक्त केली जात आहे. अपुऱ्या जागेत बस उभ्या केल्या जात असून, बस शोधण्यासाठीही प्रवाशांना धावपळ करावी लागते.

गंगाखेड रस्त्यावरील पुलांची कामे करा

परभणी : येथील गंगाखेड रस्त्यावरील रस्त्याचे काम एका बाजूने जवळपास पूर्ण झाले आहे. या रस्त्यावरील पुलांची कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे पुलांच्या ठिकाणी पर्यायी रस्त्याने प्रवास करावा लागतो. या मार्गावरील पुलाची कामेही त्वरित पूर्ण केल्यास वाहनधारकांची गैरसोय दूर होणार आहे.

जिल्ह्यात वाढल्या विजेच्या समस्या

परभणी : जिल्ह्यात विजेच्या समस्या वाढल्या आहेत. नियमित दुरुस्ती होत असल्याने ग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये वीज तारा जीर्ण झाल्या असून, त्याचा धोका निर्माण झाला आहे. काही भागात विजेचे पोल वाकलेले आहेत. रोहित्र जळाल्यानंतर ते वेळेत दुरुस्त होत नाही. तेव्हा विजेच्या समस्यांचे तातडीने निराकरण करावे, अशी मागणी होत आहे.

सुपर मार्केट रस्त्यावर वाढली धूळ

परभणी : येथील राजगोपालाचारी उद्यानापासून ते सुपरमार्केटपर्यंतच्या रस्त्यावर मनपाने जलवाहिनीसाठी एका बाजूने रस्ता खोदला होता. मात्र खोदकाम केलेल्या जागेवर मुरुम तसाच पडून आहे. या मार्गावरील वाहतुकीमुळे धूळ उडून त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. मनपाने या रस्त्यावर पसरलेला मुरुम उचलून घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

शहरातील उद्यानातील खेळण्यांची दुरवस्था

परभणी : शहरातील राजगोपालाचारी उद्यानातील खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. घसरगुंडी, सी-सॉ, मेरी गो राऊंड या खेळण्या जागोजागी तुटल्या आहेत. त्यामुळे मुलांना इजा पोहोचण्याची भीती निर्माण झाली आहे. तेव्हा मनपा प्रशासनाने खेळण्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

ग्रामीण बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी

परभणी : जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया राबविली जात असताना एस.टी. महामंडळाने मात्र अद्यापपर्यंत ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू केल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना नाईलाजास्तव खासगी वाहनाने तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे ठिकाण गाठावे लागते. ग्रामीण मार्गावर उत्पन्न मिळत नसल्याचे कारण देत या बससेवा सुरू केल्या नाहीत.