शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, एकाचा मृत्यू झाल्याची माहिती...
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
5
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
6
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
7
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
8
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
9
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
10
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
11
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
12
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
13
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
14
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
15
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
16
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
17
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
18
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
19
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
20
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी

गहू, हरभऱ्याचे पीक बहरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:16 IST

परभणी बसस्थानकावर सुविधांचा अभाव परभणी : येथील बसस्थानकावर प्रवाशांना सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ...

परभणी बसस्थानकावर सुविधांचा अभाव

परभणी : येथील बसस्थानकावर प्रवाशांना सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासह आसन व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी उपलब्ध नसल्याने प्रवाशांत नाराजी व्यक्त केली जात आहे. अपुऱ्या जागेत बस उभ्या केल्या जात असून, बस शोधण्यासाठीही प्रवाशांना धावपळ करावी लागते.

गंगाखेड रस्त्यावरील पुलांची कामे करा

परभणी : येथील गंगाखेड रस्त्यावरील रस्त्याचे काम एका बाजूने जवळपास पूर्ण झाले आहे. या रस्त्यावरील पुलांची कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे पुलांच्या ठिकाणी पर्यायी रस्त्याने प्रवास करावा लागतो. या मार्गावरील पुलाची कामेही त्वरित पूर्ण केल्यास वाहनधारकांची गैरसोय दूर होणार आहे.

जिल्ह्यात वाढल्या विजेच्या समस्या

परभणी : जिल्ह्यात विजेच्या समस्या वाढल्या आहेत. नियमित दुरुस्ती होत असल्याने ग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये वीज तारा जीर्ण झाल्या असून, त्याचा धोका निर्माण झाला आहे. काही भागात विजेचे पोल वाकलेले आहेत. रोहित्र जळाल्यानंतर ते वेळेत दुरुस्त होत नाही. तेव्हा विजेच्या समस्यांचे तातडीने निराकरण करावे, अशी मागणी होत आहे.

सुपर मार्केट रस्त्यावर वाढली धूळ

परभणी : येथील राजगोपालाचारी उद्यानापासून ते सुपरमार्केटपर्यंतच्या रस्त्यावर मनपाने जलवाहिनीसाठी एका बाजूने रस्ता खोदला होता. मात्र खोदकाम केलेल्या जागेवर मुरुम तसाच पडून आहे. या मार्गावरील वाहतुकीमुळे धूळ उडून त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. मनपाने या रस्त्यावर पसरलेला मुरुम उचलून घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

शहरातील उद्यानातील खेळण्यांची दुरवस्था

परभणी : शहरातील राजगोपालाचारी उद्यानातील खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. घसरगुंडी, सी-सॉ, मेरी गो राऊंड या खेळण्या जागोजागी तुटल्या आहेत. त्यामुळे मुलांना इजा पोहोचण्याची भीती निर्माण झाली आहे. तेव्हा मनपा प्रशासनाने खेळण्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

ग्रामीण बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी

परभणी : जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया राबविली जात असताना एस.टी. महामंडळाने मात्र अद्यापपर्यंत ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू केल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना नाईलाजास्तव खासगी वाहनाने तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे ठिकाण गाठावे लागते. ग्रामीण मार्गावर उत्पन्न मिळत नसल्याचे कारण देत या बससेवा सुरू केल्या नाहीत.