शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गहू, हरभऱ्याचे पीक बहरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:16 IST

परभणी बसस्थानकावर सुविधांचा अभाव परभणी : येथील बसस्थानकावर प्रवाशांना सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ...

परभणी बसस्थानकावर सुविधांचा अभाव

परभणी : येथील बसस्थानकावर प्रवाशांना सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासह आसन व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी उपलब्ध नसल्याने प्रवाशांत नाराजी व्यक्त केली जात आहे. अपुऱ्या जागेत बस उभ्या केल्या जात असून, बस शोधण्यासाठीही प्रवाशांना धावपळ करावी लागते.

गंगाखेड रस्त्यावरील पुलांची कामे करा

परभणी : येथील गंगाखेड रस्त्यावरील रस्त्याचे काम एका बाजूने जवळपास पूर्ण झाले आहे. या रस्त्यावरील पुलांची कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे पुलांच्या ठिकाणी पर्यायी रस्त्याने प्रवास करावा लागतो. या मार्गावरील पुलाची कामेही त्वरित पूर्ण केल्यास वाहनधारकांची गैरसोय दूर होणार आहे.

जिल्ह्यात वाढल्या विजेच्या समस्या

परभणी : जिल्ह्यात विजेच्या समस्या वाढल्या आहेत. नियमित दुरुस्ती होत असल्याने ग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये वीज तारा जीर्ण झाल्या असून, त्याचा धोका निर्माण झाला आहे. काही भागात विजेचे पोल वाकलेले आहेत. रोहित्र जळाल्यानंतर ते वेळेत दुरुस्त होत नाही. तेव्हा विजेच्या समस्यांचे तातडीने निराकरण करावे, अशी मागणी होत आहे.

सुपर मार्केट रस्त्यावर वाढली धूळ

परभणी : येथील राजगोपालाचारी उद्यानापासून ते सुपरमार्केटपर्यंतच्या रस्त्यावर मनपाने जलवाहिनीसाठी एका बाजूने रस्ता खोदला होता. मात्र खोदकाम केलेल्या जागेवर मुरुम तसाच पडून आहे. या मार्गावरील वाहतुकीमुळे धूळ उडून त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. मनपाने या रस्त्यावर पसरलेला मुरुम उचलून घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

शहरातील उद्यानातील खेळण्यांची दुरवस्था

परभणी : शहरातील राजगोपालाचारी उद्यानातील खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. घसरगुंडी, सी-सॉ, मेरी गो राऊंड या खेळण्या जागोजागी तुटल्या आहेत. त्यामुळे मुलांना इजा पोहोचण्याची भीती निर्माण झाली आहे. तेव्हा मनपा प्रशासनाने खेळण्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

ग्रामीण बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी

परभणी : जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया राबविली जात असताना एस.टी. महामंडळाने मात्र अद्यापपर्यंत ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू केल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना नाईलाजास्तव खासगी वाहनाने तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे ठिकाण गाठावे लागते. ग्रामीण मार्गावर उत्पन्न मिळत नसल्याचे कारण देत या बससेवा सुरू केल्या नाहीत.