शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
5
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
6
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
7
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
8
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
9
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
10
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
11
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
12
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
13
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
14
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
15
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
16
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
17
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
18
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
19
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
20
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?

गहू, हरभऱ्याचे पीक बहरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:16 IST

परभणी बसस्थानकावर सुविधांचा अभाव परभणी : येथील बसस्थानकावर प्रवाशांना सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ...

परभणी बसस्थानकावर सुविधांचा अभाव

परभणी : येथील बसस्थानकावर प्रवाशांना सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासह आसन व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी उपलब्ध नसल्याने प्रवाशांत नाराजी व्यक्त केली जात आहे. अपुऱ्या जागेत बस उभ्या केल्या जात असून, बस शोधण्यासाठीही प्रवाशांना धावपळ करावी लागते.

गंगाखेड रस्त्यावरील पुलांची कामे करा

परभणी : येथील गंगाखेड रस्त्यावरील रस्त्याचे काम एका बाजूने जवळपास पूर्ण झाले आहे. या रस्त्यावरील पुलांची कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे पुलांच्या ठिकाणी पर्यायी रस्त्याने प्रवास करावा लागतो. या मार्गावरील पुलाची कामेही त्वरित पूर्ण केल्यास वाहनधारकांची गैरसोय दूर होणार आहे.

जिल्ह्यात वाढल्या विजेच्या समस्या

परभणी : जिल्ह्यात विजेच्या समस्या वाढल्या आहेत. नियमित दुरुस्ती होत असल्याने ग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये वीज तारा जीर्ण झाल्या असून, त्याचा धोका निर्माण झाला आहे. काही भागात विजेचे पोल वाकलेले आहेत. रोहित्र जळाल्यानंतर ते वेळेत दुरुस्त होत नाही. तेव्हा विजेच्या समस्यांचे तातडीने निराकरण करावे, अशी मागणी होत आहे.

सुपर मार्केट रस्त्यावर वाढली धूळ

परभणी : येथील राजगोपालाचारी उद्यानापासून ते सुपरमार्केटपर्यंतच्या रस्त्यावर मनपाने जलवाहिनीसाठी एका बाजूने रस्ता खोदला होता. मात्र खोदकाम केलेल्या जागेवर मुरुम तसाच पडून आहे. या मार्गावरील वाहतुकीमुळे धूळ उडून त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. मनपाने या रस्त्यावर पसरलेला मुरुम उचलून घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

शहरातील उद्यानातील खेळण्यांची दुरवस्था

परभणी : शहरातील राजगोपालाचारी उद्यानातील खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. घसरगुंडी, सी-सॉ, मेरी गो राऊंड या खेळण्या जागोजागी तुटल्या आहेत. त्यामुळे मुलांना इजा पोहोचण्याची भीती निर्माण झाली आहे. तेव्हा मनपा प्रशासनाने खेळण्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

ग्रामीण बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी

परभणी : जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया राबविली जात असताना एस.टी. महामंडळाने मात्र अद्यापपर्यंत ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू केल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना नाईलाजास्तव खासगी वाहनाने तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे ठिकाण गाठावे लागते. ग्रामीण मार्गावर उत्पन्न मिळत नसल्याचे कारण देत या बससेवा सुरू केल्या नाहीत.