शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

पीक गेलं, आता जगून करायचं काय? पूरग्रस्त शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय, सैन्याने वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 15:00 IST

गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेलं शेत पूराच्या पाण्याने वेढलेलं असल्याने घेतला टोकाचा निर्णय.

- विठ्ठल भिसेपाथरी: संपूर्ण पीक पाण्यात गेलं...शासन पंचनामा सुद्धा करत नाही , आता कस जगावं? अशी हताश हाक देत वडी येथील शेतकरी हनुमंत प्रभाकर तालडे (३५) यांनी मंगळवारी सकाळी 10 वाजता  पाण्यात गेलेल्या  शेतीकडे मोर्चा वळवला. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेलं त्यांचं शेत पूरपाण्याने वेढलेलं होतं. शेती पाण्याखाली गेली, उरलेलं आयुष्य जगायचं कसं, या नैराश्यात ते थेट पुराच्या पाण्यातील   आखाड्याकडे गेले.

या क्षणाचं हृदयद्रावक चित्र गावकऱ्यांनी मोबाईलवर टिपलं आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. घटनेची माहिती सरपंच सिद्धू पाटील यांनी  महसूल विभागाला दिली. त्यानंतर तीन तासांनी प्रशासन हललं आणि भारतीय सैन्याने बोटीच्या मदतीने हनुमंत यांना सुखरूप बाहेर काढलं.

अद्याप पंचनामाच नाही, मदत कुठे?हनुमंत तालडे हे अल्पभूधारक शेतकरी. त्यांच्याकडे फक्त दोन एकर स्वतःची शेती असून पाच एकर शेत त्यांनी ठोक्याने घेतलं होतं. प्रति एकर २५ हजार रुपये देऊन तब्बल सव्वा लाख रुपये भरले होते. मात्र पूराने सारे स्वप्न, सारी मेहनत, सर्व आशा पाण्यात गेली. “नुकसान झालं तरी शासन काही करत नाही. अजून पंचनामा झाला नाही, मग नुकसान भरपाई मिळणार कशी?” अशी व्यथा त्यांनी सैन्याच्या जवानांसमोर मांडली.

जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरीघरात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील अशी पोटाची जबाबदारी आहे. शेत उद्ध्वस्त झालं, ठोक्याचे पैसे डोक्यावर आहेत, आणि पुढचा दिवस कसा उजाडणार याची चिंता. त्यामुळेच हनुमंत यांच्यासारखा तरुण शेतकरी नैराश्याच्या गर्तेत खेचला गेला.

शासनाचे डोळे कधी उघडणार?पूर हळूहळू ओसरतोय, पण शेतकऱ्यांच्या मनातला पूर अजूनही ओसरणार नाही. हनुमंत तालडे यांचं आयुष्य वाचलं, पण त्यांची स्वप्नं वाहून गेली. प्रश्न फक्त एवढाच आहे की, अशा शेतकऱ्यांच्या जखमा शासन खरंच भरून काढणार का? की या जखमा कायमस्वरूपी त्यांच्या आयुष्यात खोल ठसे उमटवत राहणार?

English
हिंदी सारांश
Web Title : Crop loss drives farmer to despair; army saves his life.

Web Summary : Burdened by crop loss and debt, a farmer attempted suicide in floodwaters. Prompt action by villagers and the army saved him. He lamented the lack of government assessment and compensation for his destroyed livelihood, leaving his family in dire straits.
टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस