शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पीक गेलं, आता जगून करायचं काय? पूरग्रस्त शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय, सैन्याने वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 15:00 IST

गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेलं शेत पूराच्या पाण्याने वेढलेलं असल्याने घेतला टोकाचा निर्णय.

- विठ्ठल भिसेपाथरी: संपूर्ण पीक पाण्यात गेलं...शासन पंचनामा सुद्धा करत नाही , आता कस जगावं? अशी हताश हाक देत वडी येथील शेतकरी हनुमंत प्रभाकर तालडे (३५) यांनी मंगळवारी सकाळी 10 वाजता  पाण्यात गेलेल्या  शेतीकडे मोर्चा वळवला. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेलं त्यांचं शेत पूरपाण्याने वेढलेलं होतं. शेती पाण्याखाली गेली, उरलेलं आयुष्य जगायचं कसं, या नैराश्यात ते थेट पुराच्या पाण्यातील   आखाड्याकडे गेले.

या क्षणाचं हृदयद्रावक चित्र गावकऱ्यांनी मोबाईलवर टिपलं आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. घटनेची माहिती सरपंच सिद्धू पाटील यांनी  महसूल विभागाला दिली. त्यानंतर तीन तासांनी प्रशासन हललं आणि भारतीय सैन्याने बोटीच्या मदतीने हनुमंत यांना सुखरूप बाहेर काढलं.

अद्याप पंचनामाच नाही, मदत कुठे?हनुमंत तालडे हे अल्पभूधारक शेतकरी. त्यांच्याकडे फक्त दोन एकर स्वतःची शेती असून पाच एकर शेत त्यांनी ठोक्याने घेतलं होतं. प्रति एकर २५ हजार रुपये देऊन तब्बल सव्वा लाख रुपये भरले होते. मात्र पूराने सारे स्वप्न, सारी मेहनत, सर्व आशा पाण्यात गेली. “नुकसान झालं तरी शासन काही करत नाही. अजून पंचनामा झाला नाही, मग नुकसान भरपाई मिळणार कशी?” अशी व्यथा त्यांनी सैन्याच्या जवानांसमोर मांडली.

जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरीघरात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील अशी पोटाची जबाबदारी आहे. शेत उद्ध्वस्त झालं, ठोक्याचे पैसे डोक्यावर आहेत, आणि पुढचा दिवस कसा उजाडणार याची चिंता. त्यामुळेच हनुमंत यांच्यासारखा तरुण शेतकरी नैराश्याच्या गर्तेत खेचला गेला.

शासनाचे डोळे कधी उघडणार?पूर हळूहळू ओसरतोय, पण शेतकऱ्यांच्या मनातला पूर अजूनही ओसरणार नाही. हनुमंत तालडे यांचं आयुष्य वाचलं, पण त्यांची स्वप्नं वाहून गेली. प्रश्न फक्त एवढाच आहे की, अशा शेतकऱ्यांच्या जखमा शासन खरंच भरून काढणार का? की या जखमा कायमस्वरूपी त्यांच्या आयुष्यात खोल ठसे उमटवत राहणार?

English
हिंदी सारांश
Web Title : Crop loss drives farmer to despair; army saves his life.

Web Summary : Burdened by crop loss and debt, a farmer attempted suicide in floodwaters. Prompt action by villagers and the army saved him. He lamented the lack of government assessment and compensation for his destroyed livelihood, leaving his family in dire straits.
टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस