शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

गंगाखेड तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट गडद; तलावांनी गाठला हिवाळ्यातच तळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 18:19 IST

तालुक्यातील पाझर तलावांसह मासोळी प्रकल्पांनी हिवाळ्यातच तळ गाठला आहे. त्यामुळे या तलावावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. मासोळी प्रकल्पातून रब्बी हंगामातील सिंचनासाठीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देगंगाखेड तालुक्यामध्ये पुरेसा पाऊस झाला नाही.गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी साठवण तलावामध्ये आज घडीला १५.७९ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी या महिन्यामध्ये ९०.२५ टक्के पाणीसाठा होता.

गंगाखेड : तालुक्यातील पाझर तलावांसह मासोळी प्रकल्पांनी हिवाळ्यातच तळ गाठला आहे. त्यामुळे या तलावावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. मासोळी प्रकल्पातून रब्बी हंगामातील सिंचनासाठीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. 

गंगाखेड तालुक्यामध्ये पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे बहुतांश पाणीसाठे दरवर्षी प्रमाणे यावर्षी भरले नाहीत. गतवर्षीच्या पाणीसाठ्यामध्ये थोडी भर पडली असली तरी हिवाळ्यामध्येच बहुतांश तलाव व पाणी प्रकल्पातील साठा कमी झाला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची शक्यता नाकारता येत नाही. गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी साठवण तलावामध्ये आज घडीला १५.७९ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी या महिन्यामध्ये ९०.२५ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये या तलावावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवली नाही. यावर्षी मात्र परिस्थिती वेगळी आहे.

राणीसावरगाव तलावामध्ये २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. टाकळवाडी तलावाने पूर्णपणे तळ गाठला आहे. गतवर्षी या तलावामध्ये ८३ टक्के पाणीसाठा होता. शिवाय कोद्री तलावही जोत्याखाली गेला आहे. गंगाखेड तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करणार्‍या  पालम तालुक्यातील तांदुळवाडी तलावही जोत्याखाली गेला आहे. सोनपेठ तालुक्यातील नखतवाडी तलावाचीही अशीच स्थिती आहे. या दोन्ही तलावात गतवर्षी अनुक्रमे ८३ व ७५ टक्के पाणीसाठा होता, अशी माहिती सिंचन शाखा २ चे कालवा निरिक्षक डी.एम. नागरगोजे यांनी दिली. 

गंगाखेड शहरासह माखणी, इसाद, पोखर्णी वाळके, चिलगरवाडी, खोकलेवाडी, सिरसम आदी गावांची तहान भागविणार्‍या मासोळी मध्यम प्रकल्पात केवळ १८ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये ८९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता, अशी माहिती मासोळी मध्यम प्रकल्पाच्या मोजणीदार एस.एस. मांगुळकर यांनी दिली.

सिंचनासाठीचा पाणीपुरवठा बंदयावर्षी पुरेसा पाऊस झाला नसल्याने हिवळ्यामध्येच तालुक्यातील तलावांनी तळ गाठला आहे. यामुळे मासोळी मध्यम प्रकल्पातून रब्बी हंगामातील सिंचनासाठी करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच मासोळी प्रकल्पातील मृत पाणीसाठ्यातून शहराला तसेच इतर गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जाईल. मार्चनंतर प्रकल्पात शिल्लक असलेला पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पुढील नियोजन केले जाणार असल्याचे प्रकल्पाचे शाखाधिकारी रामेश्वर उबाळे यांनी सांगितले. 

गोदावरी नदीवरील मुळी बंधार्‍याचे दरवाजे वाहून गेले आहेत. या बंधार्‍याला काही दरवाजे नसल्याने बंधार्‍यातही पाणीसाठा उपलब्ध नाही. सध्या बंधार्‍याची परिस्थिती बिकट झाली आहे. भविष्यात उद्भवणार्‍या तीव्र पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. 

टॅग्स :parabhaniपरभणी