शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

गंगाखेड तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट गडद; तलावांनी गाठला हिवाळ्यातच तळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 18:19 IST

तालुक्यातील पाझर तलावांसह मासोळी प्रकल्पांनी हिवाळ्यातच तळ गाठला आहे. त्यामुळे या तलावावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. मासोळी प्रकल्पातून रब्बी हंगामातील सिंचनासाठीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देगंगाखेड तालुक्यामध्ये पुरेसा पाऊस झाला नाही.गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी साठवण तलावामध्ये आज घडीला १५.७९ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी या महिन्यामध्ये ९०.२५ टक्के पाणीसाठा होता.

गंगाखेड : तालुक्यातील पाझर तलावांसह मासोळी प्रकल्पांनी हिवाळ्यातच तळ गाठला आहे. त्यामुळे या तलावावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. मासोळी प्रकल्पातून रब्बी हंगामातील सिंचनासाठीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. 

गंगाखेड तालुक्यामध्ये पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे बहुतांश पाणीसाठे दरवर्षी प्रमाणे यावर्षी भरले नाहीत. गतवर्षीच्या पाणीसाठ्यामध्ये थोडी भर पडली असली तरी हिवाळ्यामध्येच बहुतांश तलाव व पाणी प्रकल्पातील साठा कमी झाला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची शक्यता नाकारता येत नाही. गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी साठवण तलावामध्ये आज घडीला १५.७९ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी या महिन्यामध्ये ९०.२५ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये या तलावावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवली नाही. यावर्षी मात्र परिस्थिती वेगळी आहे.

राणीसावरगाव तलावामध्ये २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. टाकळवाडी तलावाने पूर्णपणे तळ गाठला आहे. गतवर्षी या तलावामध्ये ८३ टक्के पाणीसाठा होता. शिवाय कोद्री तलावही जोत्याखाली गेला आहे. गंगाखेड तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करणार्‍या  पालम तालुक्यातील तांदुळवाडी तलावही जोत्याखाली गेला आहे. सोनपेठ तालुक्यातील नखतवाडी तलावाचीही अशीच स्थिती आहे. या दोन्ही तलावात गतवर्षी अनुक्रमे ८३ व ७५ टक्के पाणीसाठा होता, अशी माहिती सिंचन शाखा २ चे कालवा निरिक्षक डी.एम. नागरगोजे यांनी दिली. 

गंगाखेड शहरासह माखणी, इसाद, पोखर्णी वाळके, चिलगरवाडी, खोकलेवाडी, सिरसम आदी गावांची तहान भागविणार्‍या मासोळी मध्यम प्रकल्पात केवळ १८ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये ८९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता, अशी माहिती मासोळी मध्यम प्रकल्पाच्या मोजणीदार एस.एस. मांगुळकर यांनी दिली.

सिंचनासाठीचा पाणीपुरवठा बंदयावर्षी पुरेसा पाऊस झाला नसल्याने हिवळ्यामध्येच तालुक्यातील तलावांनी तळ गाठला आहे. यामुळे मासोळी मध्यम प्रकल्पातून रब्बी हंगामातील सिंचनासाठी करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच मासोळी प्रकल्पातील मृत पाणीसाठ्यातून शहराला तसेच इतर गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जाईल. मार्चनंतर प्रकल्पात शिल्लक असलेला पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पुढील नियोजन केले जाणार असल्याचे प्रकल्पाचे शाखाधिकारी रामेश्वर उबाळे यांनी सांगितले. 

गोदावरी नदीवरील मुळी बंधार्‍याचे दरवाजे वाहून गेले आहेत. या बंधार्‍याला काही दरवाजे नसल्याने बंधार्‍यातही पाणीसाठा उपलब्ध नाही. सध्या बंधार्‍याची परिस्थिती बिकट झाली आहे. भविष्यात उद्भवणार्‍या तीव्र पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. 

टॅग्स :parabhaniपरभणी