शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

६० हजार हेक्टरवरील पिकांसाठी सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST

येलदरी धरणात यावर्षी १०० टक्के पाणीसाठा झाला. त्यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या नांदेड, हिंगोली व परभणी या तीन जिल्ह्यातील ...

येलदरी धरणात यावर्षी १०० टक्के पाणीसाठा झाला. त्यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या नांदेड, हिंगोली व परभणी या तीन जिल्ह्यातील पिकांना भविष्यात पाणी सोडले जाईल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार येलदरी धरण प्रशासनाकडून पाणी पाळ्याचे नियोजनही करण्यात आले होते. त्यानुसार या धरणातून उन्हाळी हंगामातील भूईमुग, ऊस यासह रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू या पिकांसाठी पाण्याचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. हे पाणी येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणात नदीवाटे नेले जात आहे. सिद्धेश्वर धरणातून पूर्णा मुख्य कालवा, हट्टा शाखा कालवा, लासिना शाखा कालवा, वसमत शाखा कालवा व अंतिम शाखा कालवा या५ कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी जलसंपदा विभाग नियोजन केले आहे. या पाच कालव्यामधून परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील ५७ हजार ९८८हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. २३फेब्रुवारी रोजी सोडलेल्या पाण्यामुळे या भागातील शेतीसह तीन जिल्ह्यातील २५० हून अधिक गावांना देखील भर उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. त्याच बरोबर परभणी, हिंगोली, पूर्णा, वसमत व जिंतूर या मोठ्या शहरांचाही समावेश आहे. त्यामुळे या पाण्यामुळे रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांमधून शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी वाढ होणार आहे.

१५ मेगावॅट वीज निर्मिती

येलदरी येथील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे ५७ हजार ९८८ हेक्टरवरील पिकांना फायदा होणार आहे. त्याच बरोबर आतापर्यंत येलदरी येथील जलविद्युत केंद्राने या पाण्याच्या माध्यमातून १५ मेगावॅट एवढी वीज निर्मिती केली आहे. त्यामुळे शेती सिंचनाबरोबरच वीज निर्मितीही होत आहे.

‘‘ यावर्षी येलदरी धरण १०० टक्के भरल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात झालेल्या नैसर्गिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी मोठी संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोडलेल्या पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करावा. तसेच ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा वापर करुन पाण्याची बचत करावी.

-एस.के.सबनीवार, अधीक्षक अभियंता नांदेड मंडळ