शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

६० हजार हेक्टरवरील पिकांसाठी सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST

येलदरी धरणात यावर्षी १०० टक्के पाणीसाठा झाला. त्यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या नांदेड, हिंगोली व परभणी या तीन जिल्ह्यातील ...

येलदरी धरणात यावर्षी १०० टक्के पाणीसाठा झाला. त्यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या नांदेड, हिंगोली व परभणी या तीन जिल्ह्यातील पिकांना भविष्यात पाणी सोडले जाईल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार येलदरी धरण प्रशासनाकडून पाणी पाळ्याचे नियोजनही करण्यात आले होते. त्यानुसार या धरणातून उन्हाळी हंगामातील भूईमुग, ऊस यासह रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू या पिकांसाठी पाण्याचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. हे पाणी येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणात नदीवाटे नेले जात आहे. सिद्धेश्वर धरणातून पूर्णा मुख्य कालवा, हट्टा शाखा कालवा, लासिना शाखा कालवा, वसमत शाखा कालवा व अंतिम शाखा कालवा या५ कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी जलसंपदा विभाग नियोजन केले आहे. या पाच कालव्यामधून परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील ५७ हजार ९८८हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. २३फेब्रुवारी रोजी सोडलेल्या पाण्यामुळे या भागातील शेतीसह तीन जिल्ह्यातील २५० हून अधिक गावांना देखील भर उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. त्याच बरोबर परभणी, हिंगोली, पूर्णा, वसमत व जिंतूर या मोठ्या शहरांचाही समावेश आहे. त्यामुळे या पाण्यामुळे रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांमधून शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी वाढ होणार आहे.

१५ मेगावॅट वीज निर्मिती

येलदरी येथील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे ५७ हजार ९८८ हेक्टरवरील पिकांना फायदा होणार आहे. त्याच बरोबर आतापर्यंत येलदरी येथील जलविद्युत केंद्राने या पाण्याच्या माध्यमातून १५ मेगावॅट एवढी वीज निर्मिती केली आहे. त्यामुळे शेती सिंचनाबरोबरच वीज निर्मितीही होत आहे.

‘‘ यावर्षी येलदरी धरण १०० टक्के भरल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात झालेल्या नैसर्गिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी मोठी संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोडलेल्या पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करावा. तसेच ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा वापर करुन पाण्याची बचत करावी.

-एस.के.सबनीवार, अधीक्षक अभियंता नांदेड मंडळ