शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

अडीचशेच्यावर ग्रामस्थांनी सोडले गाव; रोजगाराअभावी गावात उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 11:59 IST

ग्रामस्थांची कामासाठी भटकंती

ठळक मुद्देखोकलेवाडी येथील स्थितीगावात २०० च्या आसपास कुटुंब संख्या आहे.

- अन्वर लिंबेकर 

खोकलेवाडी (जि. परभणी) : दुष्काळी परिस्थितीचा मोठा फटका खोकलेवाडी या गावाला बसला असून गावात काम मिळत नसल्याने अडीचशेपेक्षा अधिक ग्रामस्थांनी गाव सोडले आहे. साधारणत: १२०० मतदार असलेल्या या गावातील बहुतांश ग्रामस्थ बाहेरगावी कामाच्या शोधार्थ गेल्याने अनेक घरांना कुलूप लागले आहे. सोमवारी ‘लोकमत’ने केलेल्या ‘आॅन दी स्पॉट रिपोर्ट’ मध्ये ही परिस्थिती दिसून आली.

संपूर्ण गंगाखेड तालुकाच दुष्काळाच्या तीव्र झळा सहन करीत आहे. पाणी आणि चारा टंचाई पाठोपाठ मजुरांचे स्थलांतर हा गंभीर प्रश्न तालुक्यात निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गंगाखेड शहरापासून १५ कि.मी.अंतरावर असलेल्या खोकलेवाडी या गावची परिस्थिती जाणून घेण्यासाठी सोमवारी थेट गावात भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली तेव्हा दुष्काळाची दाहकता दिसून आली. साधारणत: २ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात १२०० मतदार आहेत. तर २०० च्या आसपास कुटुंब संख्या आहे. ८०० मजुरांनी रोजगार हमी योजनेकडे नोंदणी केली आहे. सध्या या गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावातील हातपंप आटले असून पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचे पाणीही तळाला गेले आहे. गावात पिण्यासाठीच पाणी मिळत नसून शेतीचा तर प्रश्नच येत नाही. परिणामी शेतातील कामेही ठप्प आहेत.

गावात आणि परिसरात कामेच नसल्याने सुमारे अडीचशेहून अधिक मजुरांनी गाव सोडले असून त्यांनी पुणे, हैदराबाद, औरंगाबाद, गंगाखेड शहर आदी ठिकाणी स्थलांतर केल्याचे समोर आले. काही मजुरांच्या घराला चक्क कुलूप लागले असून त्यांचे कुटुंबासह स्थलांतर झाल्याचे गावकºयांनी सांगितले. शेती हा मुख्य व्यवसाय असलेल्या या गावात शेतीची कामे शिल्लक नाहीत. काही छोटेमोठे व्यवसाय चालतात. मात्र दुष्काळाने हे व्यवसायही डबघाईला आले आहेत. त्यामुळे रोजची गुजरान करण्यासाठी गाव सोडण्याशिवाय पर्याय नसल्याने या गावातून सर्वाधिक स्थलांतर झाले आहे. स्थलांतर रोखण्यासाठी मात्र ठोस पाऊले उचलली जात नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत.

गावात फक्त वृद्ध, मुलेखोकलेवाडी गावाला सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास भेट दिली त्यावेळेस गावातील तरुण व कर्ते व्यक्ती रोजगाराच्या शोधार्थ इतरत्र गेल्याचे दिसून आले. गावामध्ये महिला, वृद्ध व लहान मुलेच मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले. काही तरुण गंगाखेड येथे दररोज रोजगारासाठी ये-जा करतात. अशातच हातालाही काम नाही. त्यामुळे संपूर्ण गाव ओसाड पडले आहे. तशी प्रतिक्रिया गावातील पद्ममीनबाई व्यंकटी राजपुंगे, गंगाधर बाबुराव धोंडकर, पार्वतीबाई भानूदास सावंत यांनी दिली.

टॅग्स :droughtदुष्काळparabhaniपरभणीWaterपाणी