शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

परभणीत भाजीपाल्याचे दर गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:35 IST

काही दिवसांपूर्वी वधारलेला भाजीपाला, फळे व कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे़ दररोजच्या आहारात असलेल्या मेथी, शेपू, कोथंबीर, टोमॅटो, वांगी या भाज्यांना शहरातील बाजारपेठेत कवडीमोल दर मिळत असल्याचे रविवारी केलेल्या पाहणीतून दिसून आले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : काही दिवसांपूर्वी वधारलेला भाजीपाला, फळे व कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे़ दररोजच्या आहारात असलेल्या मेथी, शेपू, कोथंबीर, टोमॅटो, वांगी या भाज्यांना शहरातील बाजारपेठेत कवडीमोल दर मिळत असल्याचे रविवारी केलेल्या पाहणीतून दिसून आले़मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे़ त्यामुळे खरीप व रबी हंगामात शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाºया नगदी व पारंपारिक पिकांतून शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागले नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी भाजीपाला व फळपिकांकडे वळताना दिसून येत आहेत़मागील आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतकºयांचा फळे व भाजीपाला निसर्गाने मातीस मिळविला़ त्यामुळे परभणी शहरातील क्रांती चौक, शनिवार बाजार, गांधी पार्क, वसमत रस्त्यावरील काळी कमान, जिंतूर रस्त्यावरील महाराणा प्रताप चौकासह इतर ठिकाणच्या बाजारपेठेत भाजीपाल्यांचे भाव चांगलेच वधारले होते़ त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकºयांमध्ये भाजीपाल्यांतून मिळालेल्या उत्पादनाबद्दल समाधान होते; परंतु, डिसेंबर महिन्याच्या १५ तारखेपासून शहरातील बाजारपेठेत भाजीपाल्याची मोठी आवक होताना पहावयास मिळत आहे़ याचा थेट परिणाम भाजीपाला व फळांच्या दरांवर झाल्याचे दिसून आले़रविवारी केलेल्या पाहणीमध्ये २०० रुपये किलो असणारी कोथंबीर १० रुपयांना दोन जुड्या विक्री होताना दिसून आली. त्याचबरोबर २० रुपये दराने एक जुडी मिळणारी मेथी शनिवारी केलेल्या पाहणीत १० रुपयांच्या चार जुड्या विक्री होताना दिसून आल्या़गेल्या काही दिवसांत भाजीपाल्यांचे गगनाला भिडलेले दर अचानक घसरले़ त्यामुळे बाजारातील ओट्यांवर भाज्यांचे ढिग दिसून येत आहेत़घसरलेल्या दरामुळे भाजीपाला विक्रीसाठी आणावयाचा खर्च देखील वसूल होत नसल्याने अनेक शेतकºयांच्या शेतात भाज्या पडून आहेत़ त्यामुळे शेतकºयांनी भाजीपाल्यांवर केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे़ त्यामुळे भाजीपाला उत्पादक आर्थिक कोंडीत सापडले आहेत़कांद्याचे भाव वधारले४जिल्ह्यात भाजीपाल्याचे भाव गडगडले असले तरी कांद्याचे भाव अद्याप कमी झाले नाहीत़४कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून, बाजारपेठेत सद्यस्थितीला १०० रुपये किलो प्रमाणे कांद्याची विक्री होत आहे़४त्यामुळे इतर भाजीपाल्यांच्या तुलनेत कांद्याचे भाव वधारलेले आहेत़आवक वाढल्याने घसरले भाव४मागील महिनाभरात भाज्यांचे भाव चांगलेच वधारले होते़ त्यातून शेतकºयांना चांगला पैसाही मिळाला़ त्यामुळे शेतकºयांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जलस्त्रोतातील पाण्याचा उपयोग घेवून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड केली आहे़ सध्या १५ डिसेंबरपासून बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मेथी, भेंडी, गवार, टोमॅटो, शेपू आदी भाज्यांची आवक होत आहे़ त्यामुळे आवक वाढल्याने बाजारपेठेतील भाज्यांचे भाव मात्र गडगडल्याचे दिसून येत आहेत़ एकीकडे नैसर्गिक संकटांचा सामना करणाºया शेतकºयांना उत्पादन झाले तर बाजारपेठेतील गडगडत्या भावाचा सामना करावा लागत असल्याचे पाहणीतून दिसून आले़असे होते दरमेथी- १० रुपये (४ जुड्या)पालक- १० रुपये (२ जुड्या)कोथंबीर- १० रुपये (२ जुड्या)शेपू- १० रुपये (३ जुड्या)टोमॅटो १० रुपये (१ किलो)वांगी- ३० रुपये (१ किलो)मिरची- ५० रुपये (१ किलो)दोडका- ३० रुपये (१ किलो)भेंडी- ३० रुपये (१ किलो)

टॅग्स :parabhaniपरभणीvegetableभाज्या