शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

Valentine Day : सामाजिक ध्येयातून जुळली मने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 13:44 IST

कॉ़ राजन आणि अ‍ॅड़ माधुरी क्षीरसागर दाम्पत्याने खऱ्या अर्थाने पीडितांच्या प्रश्नांमध्ये जिव्हाळा शोधला आहे.

- प्रसाद आर्वीकर

परभणी : प्रेमाच्या आणा-भाका घेऊन सुखी संसाराचे इमले रचण्याच्या प्रेमकहाण्या नव्या नाहीत; परंतु, या प्रेमापलीकडे जाऊन समाजातील दीन-दलित, पीडितांच्या प्रश्नांवर काम करीत सामाजिक ध्येयातून एकत्र येत येथील कॉ़ राजन आणि अ‍ॅड़ माधुरी क्षीरसागर दाम्पत्याने खऱ्या अर्थाने पीडितांच्या प्रश्नांमध्ये जिव्हाळा शोधलाआहे.

माधुरी बापूराव कुलकर्णी या मूळच्या पुणे येथील तर राजन रामचंद्र क्षीरसागर हे सोलापूर जिल्ह्यातील. पुणे येथे सर परशुरामभाऊ महाविद्यालयात १९८६ मध्ये बी.एस्सी.चे शिक्षण घेताना दोघेही वर्गमित्र होते. शिक्षण सुरू असताना राजन क्षीरसागर हे लोकविज्ञान संघटनेत काम करीत होते. वैज्ञानिक प्रचार, प्रसार करणे, तंत्रज्ञानाचा वापर जनतेसाठी व्हावा, विघातक कामासाठी होऊ नये, हा मूळ उद्देश समोर ठेवून ही संघटना काम करीत होती. माधुरी या स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियामध्ये (एसएफआय) काम करायच्या. दोघांवरही डाव्या विचारांचा पगडा असल्याने सोबत काम करण्यास सुरुवात केली आणि यातूनच लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि १३ मार्च १९९० रोजी विवाहबद्ध झाले.

पुढे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काम करीत असताना राजन यांच्यावर परभणी जिल्ह्याची जबाबदारी आली आणि त्यांच्यासोबत काम करण्यासाठी याच जिल्ह्यात भारत ज्ञानविज्ञान समितीच्या माध्यमातून माधुरी क्षीरसागर यांनी कामाला सुरुवात केली़ स्त्री शिक्षण, संपूर्ण साक्षरता अभियान, महिलांचे प्रश्न घेऊन माधुरी यांनी तर राजन क्षीरसागर यांनी शेतकरी, शेतमजूर, हमाल, मापाड्यांच्या प्रश्नांवर कामाला सुरुवात केली़ १५ वर्षांपासून हे दाम्पत्य समाजातील पीडित आणि शोषितांसाठी एकत्र येऊन काम करीत आहे़मार्ग वेगळे; ध्येय मात्र एक‘आमच्या दोघांचाही वैचारिक पगडा वेगळा आहे. राजन यांचे विचार राजकीय, तंत्रस्नेही आणि माझे विचार सामाजिक अधिष्ठान असलेले. दोघांचीही काम करण्याची पद्धत वेगळी असली तरी समाजातील पीडितांना न्याय देणे या ध्येयातूनच आम्ही काम करतो. त्यामुळे काम करण्याच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी ध्येय मात्र एक आहे’, माधुरी क्षीरसागर सांगत होत्या.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेSocialसामाजिकsocial workerसमाजसेवक