शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

Valentine Day : सामाजिक ध्येयातून जुळली मने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 13:44 IST

कॉ़ राजन आणि अ‍ॅड़ माधुरी क्षीरसागर दाम्पत्याने खऱ्या अर्थाने पीडितांच्या प्रश्नांमध्ये जिव्हाळा शोधला आहे.

- प्रसाद आर्वीकर

परभणी : प्रेमाच्या आणा-भाका घेऊन सुखी संसाराचे इमले रचण्याच्या प्रेमकहाण्या नव्या नाहीत; परंतु, या प्रेमापलीकडे जाऊन समाजातील दीन-दलित, पीडितांच्या प्रश्नांवर काम करीत सामाजिक ध्येयातून एकत्र येत येथील कॉ़ राजन आणि अ‍ॅड़ माधुरी क्षीरसागर दाम्पत्याने खऱ्या अर्थाने पीडितांच्या प्रश्नांमध्ये जिव्हाळा शोधलाआहे.

माधुरी बापूराव कुलकर्णी या मूळच्या पुणे येथील तर राजन रामचंद्र क्षीरसागर हे सोलापूर जिल्ह्यातील. पुणे येथे सर परशुरामभाऊ महाविद्यालयात १९८६ मध्ये बी.एस्सी.चे शिक्षण घेताना दोघेही वर्गमित्र होते. शिक्षण सुरू असताना राजन क्षीरसागर हे लोकविज्ञान संघटनेत काम करीत होते. वैज्ञानिक प्रचार, प्रसार करणे, तंत्रज्ञानाचा वापर जनतेसाठी व्हावा, विघातक कामासाठी होऊ नये, हा मूळ उद्देश समोर ठेवून ही संघटना काम करीत होती. माधुरी या स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियामध्ये (एसएफआय) काम करायच्या. दोघांवरही डाव्या विचारांचा पगडा असल्याने सोबत काम करण्यास सुरुवात केली आणि यातूनच लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि १३ मार्च १९९० रोजी विवाहबद्ध झाले.

पुढे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काम करीत असताना राजन यांच्यावर परभणी जिल्ह्याची जबाबदारी आली आणि त्यांच्यासोबत काम करण्यासाठी याच जिल्ह्यात भारत ज्ञानविज्ञान समितीच्या माध्यमातून माधुरी क्षीरसागर यांनी कामाला सुरुवात केली़ स्त्री शिक्षण, संपूर्ण साक्षरता अभियान, महिलांचे प्रश्न घेऊन माधुरी यांनी तर राजन क्षीरसागर यांनी शेतकरी, शेतमजूर, हमाल, मापाड्यांच्या प्रश्नांवर कामाला सुरुवात केली़ १५ वर्षांपासून हे दाम्पत्य समाजातील पीडित आणि शोषितांसाठी एकत्र येऊन काम करीत आहे़मार्ग वेगळे; ध्येय मात्र एक‘आमच्या दोघांचाही वैचारिक पगडा वेगळा आहे. राजन यांचे विचार राजकीय, तंत्रस्नेही आणि माझे विचार सामाजिक अधिष्ठान असलेले. दोघांचीही काम करण्याची पद्धत वेगळी असली तरी समाजातील पीडितांना न्याय देणे या ध्येयातूनच आम्ही काम करतो. त्यामुळे काम करण्याच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी ध्येय मात्र एक आहे’, माधुरी क्षीरसागर सांगत होत्या.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेSocialसामाजिकsocial workerसमाजसेवक