शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

परभाणी : ३८ शिक्षकांवर येणार गंडातर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:52 IST

टीईटी उत्तीर्ण नसतानाही २०१३ नंतर नियुक्त्या दिलेले जिल्ह्यात अनुदानित शाळांमधील प्राथमिक व माध्यमिकचे ३८ शिक्षक आढळले असून या शिक्षकांवरील कारवाईच्या अनुषंगाने राज्य शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : टीईटी उत्तीर्ण नसतानाही २०१३ नंतर नियुक्त्या दिलेले जिल्ह्यात अनुदानित शाळांमधील प्राथमिक व माध्यमिकचे ३८ शिक्षक आढळले असून या शिक्षकांवरील कारवाईच्या अनुषंगाने राज्य शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला आहे.राज्याच्या शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक केले होते. शासकीय शाळांबरोबरच सर्व खाजगी शाळांनाही हा निर्णय बंधनकारक करण्यात आला होता. असे असतानाही २०१३ नंतर टीईटी उत्तीर्ण नसणाऱ्या शिक्षकांना नियुक्त्या दिल्याचा प्रकार समोर आला होता. या संदर्भात राज्य शासनाकडे तक्रार करण्यात आली होती. या संदर्भात डीएड, बी.एड. स्टुडंड असोसिएशनच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार टीईटी उत्तीर्ण असणाºया शिक्षकांनाच नियुक्ती देणे बंधनकारक असताना १३ फेब्रुवारी २०१३ नंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शासकीय नियम पायंदळी तुडवून शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने राज्य शासनानेच न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यामध्ये १३ पेक्षा जास्त शिक्षकांची नियुक्ती टीईटी डावलून झाल्याचे शासनाचे म्हणणे होते. प्रत्यक्षात डीएड, बीएड स्टुडंड असोसिएशनच्या म्हणण्यानुसार २ हजार पेक्षा अधिक शिक्षकांची नियमबाह्यरित्या नियुक्ती करण्यात आल्याची तक्रार होती.शिक्षण हक्क कायदा न जुमानता अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्यांना मान्यता देणारे शिक्षणाधिकारी दोषी असून त्या संदर्भात माहिती सादर करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने ३ आॅक्टोबर रोजी राज्य शासनाला दिले होते. अडीच महिन्यांचा कालावधी उलटला तरी या संदर्भातील माहिती शिक्षण विभाग संकलित करु शकला नव्हता. या पार्श्वभूमीवर शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकाºयांना या संदर्भात १५ डिसेंबर रोजी पत्र पाठविले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने सर्व अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांकडून या संदर्भात माहिती मागविली होती. त्यामध्ये जिल्ह्यात २०१३ नंतर टीईटी उत्तीर्ण नसतानाही नियुक्त्या दिलेले प्राथमिकचे २९ शिक्षक आढळले आहेत. तर माध्यमिकचे ९ शिक्षकही यामध्ये आढळले आहेत. या संदर्भातील सविस्तर अहवाल शिक्षणाधिकाºयांनी राज्याच्या शिक्षण विभागाला काही दिवसांपूर्वीच सादर केला आहे. त्यामुळे आता या शिक्षकांच्या नोकºयांवर गंडातर येण्याची दाट शक्यता आहे.या शिक्षकांवर काय कारवाई होणार हे, अधिकृतरित्या शासनाने स्पष्ट केले नसले तरी त्यांची सेवेतून बडतर्फी करुन पगारापोटी दिलेली रक्कम वसूल केली जाऊ शकते, अशी चर्चा शिक्षण वर्तूळातून होताना दिसून येत आहे. त्यामुळे राज्य शासनाचा नियम पायंदळी तुडवून मनमानी पद्धतीने नियुक्त्या देणाºया प्रवृत्तींविरोधात शिक्षण विभागाकडून काय कारवाई केली जाते, याबाबत शिक्षण वर्तूळात उत्सुकता लागली आहे.शिक्षणाधिकाºयांवरही होणार कारवाई४टीईटी उत्तीर्ण नसतानाही २०१३ नंतर शिक्षकांच्या नियुक्त्यांना मंजुरी देणाºया तत्कालीन शिक्षणाधिकाºयांवरही कारवाई होणार आहे. तसे संकेत राज्य शासनानेच दिले आहेत. राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण परिषदेने टीईटी उत्तीर्ण नसणाºया शिक्षकांना नियुक्त्या देण्याच्या प्रकरणात राज्याच्या शिक्षण विभागाकडे सूचना केली होती; परंतु, टीईटीची परीक्षा ही फक्त शासकीय शाळांसाठीच असल्याचा समज संबंधित शिक्षणाधिकाºयांना झाला व त्यातून शासन नियमांची पडताळणी न करताच नियुक्त्यांना मंजुरी देण्यात आल्याची बाबही समोर आली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानेही या संदर्भात शिक्षण विभागाला पत्र पाठविले होते; परंतु, ते पत्रही गांभीर्याने घेतले गेले नाही.अल्पसंख्याक शाळांमध्येही झाली अनियमितता४जिल्ह्यातील अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झालेल्या काही शाळांमध्येही शासनाचे नियम डावलून भरती प्रक्रिया राबविली गेल्याचा प्रकार गतवर्षी समोर आला होता. याबाबत जिल्हा परिषदेकडून औरंगाबाद येथील शिक्षण उपसंचालकांकडे अहवाल पाठविण्यात आला होता; परंतु, त्या अहवालावर कारवाई मात्र झालेली नाही. प्रशासनात बेशिस्त चालणार नसल्याची वल्गना करणारे अधिकारी या प्रकरणात मात्र मूग मिळून गप्प बसले आहेत. या मागची कारणे काय? असा सवालही या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. वरिष्ठ अधिकाºयांकडूनच नियमांचे उल्लंघन झाले असताना त्यांचे वरिष्ठ त्यांना पाठिशी घालत असल्याबद्दल शिक्षणप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीTeacherशिक्षक