शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दोन दिवसात सहा बसेस ११०० किमी धावल्या; हाती पडले केवळ १८ हजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊन सुरू असल्याने चार आगारांतून शनिवार व रविवार या दोन दिवसात केवळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊन सुरू असल्याने चार आगारांतून शनिवार व रविवार या दोन दिवसात केवळ सहा बसेस सोडण्यात आल्या. या बसेसनी १ हजार १११ किलोमीटरचे अंतर पार करून १८ हजार ६९४ रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. त्यामुळे वीकेंड लॉकडाऊनचा एस. टी. महामंडळाला जोरदार फटका बसला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून २२ मार्च २०२०पासून वारंवार लॉकडाऊन व संचारबंदी जाहीर करण्यात येत आहे. या निर्णयाचा एस. टी. महामंडळाला मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी, गंगाखेड, जिंतूर व परभणी या चार आगारांमध्ये २५५ बसेस आहेत. या बसच्या दररोजच्या फेऱ्यांमधून २९ लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र, वीकेंड लॉकडाऊनमध्ये एस. टी. महामंडळाला गेल्या दोन दिवसात केवळ १८ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे.

दोन दिवसात २९ लाखांचा फटका

एस. टी. महामंडळाच्या चारही आगारांमधून पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू असल्यास महामंडळाला दोन दिवसात सर्वसाधारणपणे २९ लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र, वीकेंड लॉकडाऊन सुरू असल्याने प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद एस. टी.ला मिळत नाही. त्यामुळे गंगाखेड आगारासह इतर काही आगार बंद ठेवण्यात आली. केवळ सहा बसेस रस्त्यावरून धावल्या. या बसफेऱ्यांमधून जवळपास २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित होते.

वीकेंड लॉकडाऊन असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे १ हजार १११ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून केवळ १८ हजार ६९४ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे एस. टी. महामंडळाला मोठा फटका बसला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने ५० टक्केच कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे एस. टी. महामंडळातही ५० टक्के कर्मचाऱ्यांवरच कामकाज सुरू आहे. शनिवारी व रविवारी तर या ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या हातालाही काम नव्हते.

आगारातील एकूण बसेसची संख्या

२५५

दोन दिवसात धावलेल्या बसेस

०६

फेऱ्या झाल्या आगारामध्ये

१२

पैसे मिळाले दोन दिवसात

१८,६९४