शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

परभणीतील राहटी बंधारा दुरुस्तीसाठी टोलवाटोलवी : कागदी घोडे नाचवण्याचे नाटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:08 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाºयाच्या प्लेटस् गंजल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याचे वारंवार कळवूनही पूर्णा पाटबंधारे विभागातून बंधारा दुरुस्तीसाठी प्रयत्न होत नसल्याने परभणीकरांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाºयाच्या प्लेटस् गंजल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याचे वारंवार कळवूनही पूर्णा पाटबंधारे विभागातून बंधारा दुरुस्तीसाठी प्रयत्न होत नसल्याने परभणीकरांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे़पूर्णा नदीवर २० वर्षापूर्वी राहटी येथे कोल्हापुरी बंधारा उभारण्यात आला आहे़ या बंधाºयात साठविलेले पाणी परभणी शहरासाठी वापरले जाते़ या बंधाºयाच्या निर्मितीच्या वेळी टाकलेल्या प्लेटस् आता गंजल्या आहेत़ जागोजागी गंजलेल्या प्लेटस्मधून पाण्याचा अपव्यय होत आहे़ विशेष म्हणजे मागील सहा महिन्यांत दोन वेळा या प्लेट निकामी झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा प्रकार घडला होता. तर एप्रिल महिन्यातही एक प्लेट खराब झाल्याने शहराला पाणी पुरवठा होऊ शकला नव्हता़राहटी येथील बंधाºयाला एकूण ४७ कप्पे असून, या कप्प्यांमध्ये ३५२ लोखंडी प्लेट टाकलेल्या आहेत़ या प्लेट बंधाºयातील पाणी रोखून धरण्याचे काम करतात़ २० वर्षापूर्वी टाकलेल्या प्लेट आता पूर्णत: गंजल्या आहेत़ त्यामुळे नदीपात्रातून बंधाºयात पाणी सोडल्यानंतर अनेक वेळा पाण्याचा दाब सहन न झाल्याने प्लेटा वाकतात आणि पाण्याचा अपव्यय होतो़ यापूर्वी तीन ते चार वेळा अशा स्वरुपाच्या घटना घडल्या आहेत़ त्यामुळे परभणी शहराला निर्जळीला सामोरे जावे लागत आहे़ ही बाब लक्षात आल्यानंतर महानगरपालिकेने पूर्णा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे वारंवार पत्रव्यवहार केला़ शहरवासिंयाच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता सर्वच्या सर्व प्लेटा तत्काळ बदलून द्याव्यात, जेणे करून पाण्याचा अपव्यय होणार नाही, अशी मागणी कण्यात आली़ जिल्हाधिकाºयांमार्फतही हा पत्रव्यवहार करण्यात आला आहे़ परंतु, पूर्णा पाटबंधारे विभागाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही़ त्यामुळे सध्या जुन्याच प्लेटांवर बंधाºयाची भिस्त आहे़ उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेता बंधारा दुरुस्तीचे काम प्राधान्याने हाती घेणे अपेक्षित आहे; परंतु, पूर्णा पाटबंधारे विभागाकडून दुरुस्तीसाठी टोलवाटोलवी केली जात आहे़दीड दलघमी क्षमतेचा हा बंधारा आहे़ बंधाºयात गाळही मोठ्या प्रमाणात साचल्याने केवळ एक दलघमी पाणी साठवण्याची क्षमता या बंधाºयाची झाली आहे़ बंधाºयाच्या दुरुस्तीबरोबरच गाळ काढण्याचे कामही करावे लागणार आहे़मात्र पाटबंधारे विभागाकडून या संदर्भात गांभीर्याने घेतले जात नाही़ बंधाºयाची वेळेत दुरुस्ती झाली नाही तर भर उन्हाळ्यात परभणीकरांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे़...तर पाणीप्रश्न गंभीरबंधाºयाच्या देखभाल दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागाचे असून, बंधाºयातील पाणी उपसा महापालिकेमार्फत केला जातो़ त्यामुळे दुरुस्तीची जबाबदारी पाटबंधारे विभागाची असतानाही याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही़ यापूर्वी बंधाºयातून प्लेट निकामी झाल्याने पाणी वाया गेले होते. असा प्रकार पुन्हा होवू नये, यासाठी तातडीने बंधाºयाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे़ मात्र चार वर्षांपासून पत्रव्यवहार करूनही पाटबंधारे विभाग दखल घेत नसल्याचे दिसते़केवळ कागदोपत्रीच प्रश्नोत्तरांचा खेळपरभणी शहराची लोकसंख्या साडेतीन लाखांच्या घरात आहे़ राहटी बंधाºयाचे पाणी शहरवासियांसाठी अपुरे पडत आहे़ त्यामुळे बंधाºयात उपलब्ध झालेले पाणी शहरवासियांसाठी उपलब्ध व्हावे, यासाठी महानगरपालिकेने वारंवार पूर्णा पाटबंधारे विभागाकडे बंधाºयाच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला आहे़ यासंदर्भात वसमत येथील पूर्णा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महानगरपालिकेने पाठविलेला ३५२ फळ्या (प्लेटस्) बदलण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे़ एवेढच उत्तर मनपाला दिले आहे़ मात्र पाणीप्रश्नासारख्या गंभीर प्रश्नावर यापुढे कोणतीही कारवाई झाली नाही़ परिणामी परभणीकरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईriverनदीPurna Riverपूर्णा नदी