शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

प्राणांतिक अपघात रोखण्यास चंद्रपूर पॅटर्न जिल्ह्यात राबविणार; नूतन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी पदभार स्वीकारला

By राजन मगरुळकर | Published: February 04, 2024 4:56 PM

सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या समस्या, प्रश्न थेट पोलिसांकडे मांडाव्यात, त्यांचे निराकरण केले जाईल, असा विश्वास नुतन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी व्यक्त केला.

परभणी : जिल्ह्यातील रस्ते अपघात आणि प्राणांतिक अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी चंद्रपूर येथे राबविलेल्या पॅटर्नचा उपयोग करणार आहे. लोकाभिमुख पोलीस प्रशासन राबविण्यावर भर दिला जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या समस्या, प्रश्न थेट पोलिसांकडे मांडाव्यात, त्यांचे निराकरण केले जाईल, असा विश्वास नुतन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी व्यक्त केला.

जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रवींद्रसिंग परदेशी यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी रविवारी पदभार स्वीकारला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. रवींद्रसिंग परदेशी हे चंद्रपूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. परभणीच्या मावळत्या पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांची बदली बृह्नमुंबई येथे झाल्यानंतर त्याच बदली आदेशामध्ये रवींद्रसिंग परदेशी यांची परभणीत पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. शनिवारी मध्यरात्री रवींद्रसिंग परदेशी हे परभणी शहरात दाखल झाले. यानंतर रविवारी त्यांनी सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन पदभार स्वीकारला. याप्रसंगी पोलीस दलाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलीस उपाधीक्षक मुख्यालय सुभाष अनमूलवार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणेदार, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक परदेशी म्हणाले, राज्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी व हे अपघात कमी करण्यास विशेष प्राधान्य दिले. यामुळे राज्यातून चंद्रपूर हे दुसऱ्या स्थानी होते. परभणी जिल्ह्यातील रस्ते अपघात, सोबतच सर्वसामान्यांचे प्रश्न समस्या यासाठी लोकाभिमुख पोलीस प्रशासन राबविणार आहे. आजच पदभार स्विकारला आहे, त्यानुसार जिल्ह्यातील सर्व बाबींची माहिती घेऊन त्या दृष्टीने पुढील वाटचाल असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चंद्रपूर येथील प्राणांतिक अपघात रोखण्यासाठीचा पॅटर्न परभणी जिल्ह्यातही राबवून रस्ते अपघात कमी करण्याचे विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

ठाणेदारांची घेतली आढावा बैठक -रविवारी सकाळी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील बैठक कक्षामध्ये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखा विविध प्रमुख शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्याकडून जिल्ह्यातील विविध बाबींचा आढावा घेतला. या बैठकीत सध्या सुरू असलेल्या ऊरुस यात्रा सोबतच इतर सण उत्सव आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांविषयीची माहिती त्यांनी ठाणेदारांकडून, अधिकाऱ्यांकडून घेतली. सर्व ठाणेदारांना बैठकीत त्यांनी सूचना देत ओळख करून घेतली. 

टॅग्स :Parbhani Policeपरभणी पोलीसPoliceपोलिस