शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

परभणी जिल्ह्यातील ९ प्रकल्प तुडूंब भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:26 IST

जिल्ह्यातील येलदरीसह ९ प्रकल्प १०० टक्के भरले असून सिद्धेश्वर धरणामध्ये ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. निम्न दुधना प्रकल्पामध्ये मात्र १३.३० टक्केच पाणीसाठा असल्याने या भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील येलदरीसह ९ प्रकल्प १०० टक्के भरले असून सिद्धेश्वर धरणामध्ये ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. निम्न दुधना प्रकल्पामध्ये मात्र १३.३० टक्केच पाणीसाठा असल्याने या भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे.जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या पाणीसाठ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातही चांगला पाऊस पडल्याने पूर्णा नदीवरील खडकपूर्णा धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणातील पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. या पाण्याने त्या खालील येलदरी धरण सद्यस्थितीत १०० टक्के भरल्याचा अहवाल पाटबंधारे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. याशिवाय सिद्धेश्वर धरणात ९८.२० टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्याबाहेरील औरंगाबादचा जायकवाडी प्रकल्प १०० टक्के भरला असून माजलगाव येथील प्रकल्प ९९.७० टक्के भरला आहे. याशिवाय जिल्ह्यातील मासोळी प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा असून ढालेगाव व मुद्गल बंधाऱ्यातही १०० टक्के पाणी झाले आहे. पालम तालुक्यातील तांदुळवाडी व गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव, टाकळवाडी, कोद्री, जिंतूर तालुक्यातील बेलखेडा हे प्रकल्पही १०० टक्के भरले आहेत. याशिवाय जिंतूर तालुक्यातील करपरा प्रकल्पात ८४.२० टक्के, पालम तालुक्यातील डिग्रस बंधाºयात ८१.३० टक्के, पाथरी तालुक्यातील झरी प्रकल्पात ९२.५० टक्के, सोनपेठ तालुक्यातील नखतवाडी येथील प्रकल्पात ६६.८० टक्के, गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी तलावात ६०.१० टक्के, दगडवाडी तलावात ९३.८० टक्के, डोंगरपिंपळा तलावात ८४.७० टक्के, भेंडेवाडी तलावात ९८.३० टक्के, जिंतूर तालुक्यातील देवगाव तलावात ६४.७० टक्के, कवडा तलावात ७६.३० टक्के, मांडवी तलावात ६२.५० टक्के, चारठाणा तलावात ३९.६० टक्के, दहेगाव तलावात ४६ टक्के पाणीसाठा झाला आहे.८ प्रकल्पांचा पाणीसाठा चिंताजनक४दुधना नदीवरील निम्न दुधना प्रकल्पात फक्त १३.३० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील परतूरसह सेलू, परभणी, जिंतूर आदी तालुक्यातील या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांची चिंता वाढली आहे. याशिवाय गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाºयात फक्त ९.४ टक्के तर परभणी तालुक्यातील पेडगाव तलावात ७.७ टक्के, मानवत तालुक्यातील आंबेगाव तलावात २४.३ टक्के, जिंतूर तालुक्यातील जोगवाडा तलावात १९.६० टक्के, जिंतूर तालुक्यातील चिंचोली तलावात १९.३० टक्के, आडगाव तलावात १६.७० टक्के, केहाळ तलावात २२.४० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी काळात या तलाव परिसरातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणी