शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
3
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
4
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
10
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
11
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
12
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
13
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
14
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
15
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
16
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
17
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
18
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

परभणी जिल्ह्यातील ९ प्रकल्प तुडूंब भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:26 IST

जिल्ह्यातील येलदरीसह ९ प्रकल्प १०० टक्के भरले असून सिद्धेश्वर धरणामध्ये ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. निम्न दुधना प्रकल्पामध्ये मात्र १३.३० टक्केच पाणीसाठा असल्याने या भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील येलदरीसह ९ प्रकल्प १०० टक्के भरले असून सिद्धेश्वर धरणामध्ये ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. निम्न दुधना प्रकल्पामध्ये मात्र १३.३० टक्केच पाणीसाठा असल्याने या भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे.जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या पाणीसाठ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातही चांगला पाऊस पडल्याने पूर्णा नदीवरील खडकपूर्णा धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणातील पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. या पाण्याने त्या खालील येलदरी धरण सद्यस्थितीत १०० टक्के भरल्याचा अहवाल पाटबंधारे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. याशिवाय सिद्धेश्वर धरणात ९८.२० टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्याबाहेरील औरंगाबादचा जायकवाडी प्रकल्प १०० टक्के भरला असून माजलगाव येथील प्रकल्प ९९.७० टक्के भरला आहे. याशिवाय जिल्ह्यातील मासोळी प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा असून ढालेगाव व मुद्गल बंधाऱ्यातही १०० टक्के पाणी झाले आहे. पालम तालुक्यातील तांदुळवाडी व गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव, टाकळवाडी, कोद्री, जिंतूर तालुक्यातील बेलखेडा हे प्रकल्पही १०० टक्के भरले आहेत. याशिवाय जिंतूर तालुक्यातील करपरा प्रकल्पात ८४.२० टक्के, पालम तालुक्यातील डिग्रस बंधाºयात ८१.३० टक्के, पाथरी तालुक्यातील झरी प्रकल्पात ९२.५० टक्के, सोनपेठ तालुक्यातील नखतवाडी येथील प्रकल्पात ६६.८० टक्के, गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी तलावात ६०.१० टक्के, दगडवाडी तलावात ९३.८० टक्के, डोंगरपिंपळा तलावात ८४.७० टक्के, भेंडेवाडी तलावात ९८.३० टक्के, जिंतूर तालुक्यातील देवगाव तलावात ६४.७० टक्के, कवडा तलावात ७६.३० टक्के, मांडवी तलावात ६२.५० टक्के, चारठाणा तलावात ३९.६० टक्के, दहेगाव तलावात ४६ टक्के पाणीसाठा झाला आहे.८ प्रकल्पांचा पाणीसाठा चिंताजनक४दुधना नदीवरील निम्न दुधना प्रकल्पात फक्त १३.३० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील परतूरसह सेलू, परभणी, जिंतूर आदी तालुक्यातील या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांची चिंता वाढली आहे. याशिवाय गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाºयात फक्त ९.४ टक्के तर परभणी तालुक्यातील पेडगाव तलावात ७.७ टक्के, मानवत तालुक्यातील आंबेगाव तलावात २४.३ टक्के, जिंतूर तालुक्यातील जोगवाडा तलावात १९.६० टक्के, जिंतूर तालुक्यातील चिंचोली तलावात १९.३० टक्के, आडगाव तलावात १६.७० टक्के, केहाळ तलावात २२.४० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी काळात या तलाव परिसरातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणी