शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील ९ प्रकल्प तुडूंब भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:26 IST

जिल्ह्यातील येलदरीसह ९ प्रकल्प १०० टक्के भरले असून सिद्धेश्वर धरणामध्ये ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. निम्न दुधना प्रकल्पामध्ये मात्र १३.३० टक्केच पाणीसाठा असल्याने या भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील येलदरीसह ९ प्रकल्प १०० टक्के भरले असून सिद्धेश्वर धरणामध्ये ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. निम्न दुधना प्रकल्पामध्ये मात्र १३.३० टक्केच पाणीसाठा असल्याने या भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे.जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या पाणीसाठ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातही चांगला पाऊस पडल्याने पूर्णा नदीवरील खडकपूर्णा धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणातील पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. या पाण्याने त्या खालील येलदरी धरण सद्यस्थितीत १०० टक्के भरल्याचा अहवाल पाटबंधारे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. याशिवाय सिद्धेश्वर धरणात ९८.२० टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्याबाहेरील औरंगाबादचा जायकवाडी प्रकल्प १०० टक्के भरला असून माजलगाव येथील प्रकल्प ९९.७० टक्के भरला आहे. याशिवाय जिल्ह्यातील मासोळी प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा असून ढालेगाव व मुद्गल बंधाऱ्यातही १०० टक्के पाणी झाले आहे. पालम तालुक्यातील तांदुळवाडी व गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव, टाकळवाडी, कोद्री, जिंतूर तालुक्यातील बेलखेडा हे प्रकल्पही १०० टक्के भरले आहेत. याशिवाय जिंतूर तालुक्यातील करपरा प्रकल्पात ८४.२० टक्के, पालम तालुक्यातील डिग्रस बंधाºयात ८१.३० टक्के, पाथरी तालुक्यातील झरी प्रकल्पात ९२.५० टक्के, सोनपेठ तालुक्यातील नखतवाडी येथील प्रकल्पात ६६.८० टक्के, गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी तलावात ६०.१० टक्के, दगडवाडी तलावात ९३.८० टक्के, डोंगरपिंपळा तलावात ८४.७० टक्के, भेंडेवाडी तलावात ९८.३० टक्के, जिंतूर तालुक्यातील देवगाव तलावात ६४.७० टक्के, कवडा तलावात ७६.३० टक्के, मांडवी तलावात ६२.५० टक्के, चारठाणा तलावात ३९.६० टक्के, दहेगाव तलावात ४६ टक्के पाणीसाठा झाला आहे.८ प्रकल्पांचा पाणीसाठा चिंताजनक४दुधना नदीवरील निम्न दुधना प्रकल्पात फक्त १३.३० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील परतूरसह सेलू, परभणी, जिंतूर आदी तालुक्यातील या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांची चिंता वाढली आहे. याशिवाय गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाºयात फक्त ९.४ टक्के तर परभणी तालुक्यातील पेडगाव तलावात ७.७ टक्के, मानवत तालुक्यातील आंबेगाव तलावात २४.३ टक्के, जिंतूर तालुक्यातील जोगवाडा तलावात १९.६० टक्के, जिंतूर तालुक्यातील चिंचोली तलावात १९.३० टक्के, आडगाव तलावात १६.७० टक्के, केहाळ तलावात २२.४० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी काळात या तलाव परिसरातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणी