शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
2
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
3
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
4
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
5
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
6
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
7
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
8
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
11
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
12
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
13
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
14
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
15
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
16
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
17
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
18
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
19
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात पावणे तीन लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 23:38 IST

२०१९-२० या रबी हंगामामध्ये जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने जिल्ह्यात २ लाख ७५ हजार ४७५ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. या क्षेत्रावर ज्वारी, गहू, हरभरा, करडई आदी पिकांची पेरणी केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : २०१९-२० या रबी हंगामामध्ये जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने जिल्ह्यात २ लाख ७५ हजार ४७५ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. या क्षेत्रावर ज्वारी, गहू, हरभरा, करडई आदी पिकांची पेरणी केली जाणार आहे.जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, मूग, उडीद ही नगदी पिके घेतली जातात. त्यातून मिळालेल्या उत्पादनातून बळीराजा आपल्या एका वर्षाची आर्थिक घडी बसवितो. तर रबी हंगामामध्ये ज्वारी, गहू, हरभरा, बाजरी ही पिके दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण केल्या जातात. त्यामुळे या रबी हंगामाला मोठे महत्त्व आहे. गतवर्षी जिल्हा कृषी कार्यालयाच्या वतीने २ लाख ७० हजार ७१२ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले होते. मात्र जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील सहा तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच बरोबर इतर तीन तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृष्य परिथिती असल्याने केवळ १ लाख ६८ हजार ४५९ हेक्टर क्षेत्रावरच रबी हंगामात पेरणी करण्यात आली होती. यामध्ये गव्हासाठी गतवर्षी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने २० हजार ८२२ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. मात्र २३ हजार ६४४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. एवढीच एक समाधानाची बाब गतवर्षीच्या रबी हंगामात दिसून आली. तर रबी ज्वारीसाठी १ लाख ७८ हजार ४७८ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते;परंतु, ८३ हजार ९६९ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली होती. विशेष म्हणजे दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने ९४ हजार ५०९ हेक्टर क्षेत्र पेरणीअभावी पडीक राहिले होते.जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी २ लाख ७५ हजार ४७५ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये गव्हासाठी ३६ हजार, रबी ज्वारीसाठी १ लाख १४ हजार, करडईसाठी २ हजार ५०० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार जिल्ह्यात रबी हंगामातील पेरणी सुरू आहे. विशेष म्हणजे १९, २० व २१ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना जरी फटका बसला असला तरी रबी हंगामातील ज्वारी, हरभरा, करडई, गहू या पिकांच्या पेरणीसाठी मात्र हा पाऊस उपयुक्त झाला आहे. त्यामुळे गतवर्षीचा हातून गेलेला रबी हंगाम यावर्षी मात्र भरभरून देईल, अशी आशा शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. आगामी काळात एक दोन चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्यांना हा हंगाम उभारी देणारा ठरणार आहे.जायकवाडीच्या पाण्याचा लाभ४यावर्षीच्या पावसाळ्यात जायकवाडी धरण १०० टक्के भरले. त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले. परिणामी या नदीपात्रात उभारण्यात आलेले परभणी जिल्ह्यातील मुदगल, ढालेगाव, डिग्रस हे बंधारे तुडुंब भरले आहेत.४त्यामुळे या बंधाºयातील पाण्याचा रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांच्या सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठावरील लाभधारक शेतकºयांमध्ये समाधान आहे.४दुसरीकडे निम्न दुधना प्रकल्प मृत साठ्यातच असल्याने दुधना नदीकाठावरील शेतकºयांना रबी हंगामात कमी पाण्यावरील पिकेच घ्यावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी