शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

परभणी जिल्ह्यात पावणे तीन लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 23:38 IST

२०१९-२० या रबी हंगामामध्ये जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने जिल्ह्यात २ लाख ७५ हजार ४७५ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. या क्षेत्रावर ज्वारी, गहू, हरभरा, करडई आदी पिकांची पेरणी केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : २०१९-२० या रबी हंगामामध्ये जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने जिल्ह्यात २ लाख ७५ हजार ४७५ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. या क्षेत्रावर ज्वारी, गहू, हरभरा, करडई आदी पिकांची पेरणी केली जाणार आहे.जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, मूग, उडीद ही नगदी पिके घेतली जातात. त्यातून मिळालेल्या उत्पादनातून बळीराजा आपल्या एका वर्षाची आर्थिक घडी बसवितो. तर रबी हंगामामध्ये ज्वारी, गहू, हरभरा, बाजरी ही पिके दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण केल्या जातात. त्यामुळे या रबी हंगामाला मोठे महत्त्व आहे. गतवर्षी जिल्हा कृषी कार्यालयाच्या वतीने २ लाख ७० हजार ७१२ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले होते. मात्र जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील सहा तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच बरोबर इतर तीन तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृष्य परिथिती असल्याने केवळ १ लाख ६८ हजार ४५९ हेक्टर क्षेत्रावरच रबी हंगामात पेरणी करण्यात आली होती. यामध्ये गव्हासाठी गतवर्षी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने २० हजार ८२२ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. मात्र २३ हजार ६४४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. एवढीच एक समाधानाची बाब गतवर्षीच्या रबी हंगामात दिसून आली. तर रबी ज्वारीसाठी १ लाख ७८ हजार ४७८ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते;परंतु, ८३ हजार ९६९ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली होती. विशेष म्हणजे दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने ९४ हजार ५०९ हेक्टर क्षेत्र पेरणीअभावी पडीक राहिले होते.जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी २ लाख ७५ हजार ४७५ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये गव्हासाठी ३६ हजार, रबी ज्वारीसाठी १ लाख १४ हजार, करडईसाठी २ हजार ५०० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार जिल्ह्यात रबी हंगामातील पेरणी सुरू आहे. विशेष म्हणजे १९, २० व २१ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना जरी फटका बसला असला तरी रबी हंगामातील ज्वारी, हरभरा, करडई, गहू या पिकांच्या पेरणीसाठी मात्र हा पाऊस उपयुक्त झाला आहे. त्यामुळे गतवर्षीचा हातून गेलेला रबी हंगाम यावर्षी मात्र भरभरून देईल, अशी आशा शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. आगामी काळात एक दोन चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्यांना हा हंगाम उभारी देणारा ठरणार आहे.जायकवाडीच्या पाण्याचा लाभ४यावर्षीच्या पावसाळ्यात जायकवाडी धरण १०० टक्के भरले. त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले. परिणामी या नदीपात्रात उभारण्यात आलेले परभणी जिल्ह्यातील मुदगल, ढालेगाव, डिग्रस हे बंधारे तुडुंब भरले आहेत.४त्यामुळे या बंधाºयातील पाण्याचा रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांच्या सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठावरील लाभधारक शेतकºयांमध्ये समाधान आहे.४दुसरीकडे निम्न दुधना प्रकल्प मृत साठ्यातच असल्याने दुधना नदीकाठावरील शेतकºयांना रबी हंगामात कमी पाण्यावरील पिकेच घ्यावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी