शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

अपघातात विजेच्या तारेला धक्का लागून तिघांचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 22:54 IST

पालम शहरातील घटना : बालाजी नगर डेपोजवळ भीषण अपघात

प्रमोद साळवे,  गंगाखेड (जि.परभणी) : पालम शहरात रविवारी सायंकाळी पावने सहाच्या सुमारास बालाजी नगर डेपोजवळ भीषण अपघात झाला. यात पानटपरी खाली उतरविताना बैलगाडीवरील लोखंडी दांडी विजेच्या तारेला लागल्याने सहा जणांना विजेचा जबर धक्का बसला. यात तिघांचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये सिद्धार्थ नरहरी बावळे (३५, रा. जवळा, ता. पालम), शेख शफीक शेख मुसा (३१) व शेख शौकत शेख मुसा (४०, दोघे रा.बालाजी नगर, पालम) यांचा समावेश आहे. तिघांनाही तातडीने पालममधील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर जखमींमध्ये शेख फरहान शेख महेबूब (१६), आसेफ शाखेर शेख (१८) व शेख असलम शेख गुड्डू (रा.आयेशा कॉलनी, पालम) यांचा समावेश असून त्यांच्यावर साई हॉस्पिटल, लोहा येथे उपचार सुरू आहेत.

ही दुर्घटना शेख शफीक शेख मुसा यांची पानटपरी बैलगाडीतून घराजवळ उतरविताना रविवारी सायंकाळी पावनेसहाच्या सुमारास घडली. यात बैलगाडीवरील पानटपरी घसरून लोखंडी दांडीवर आदळली आणि ती थेट मुख्य लाईनच्या विद्युत तारेला लागल्याने हा भीषण प्रकार घडला. या घटनेने पालम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी पालम ठाण्याच्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेट दिली. या प्रकरणी जखमी तसेच मयत यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी आणि ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती.

टॅग्स :electricityवीजAccidentअपघात