शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अपघातात विजेच्या तारेला धक्का लागून तिघांचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 22:54 IST

पालम शहरातील घटना : बालाजी नगर डेपोजवळ भीषण अपघात

प्रमोद साळवे,  गंगाखेड (जि.परभणी) : पालम शहरात रविवारी सायंकाळी पावने सहाच्या सुमारास बालाजी नगर डेपोजवळ भीषण अपघात झाला. यात पानटपरी खाली उतरविताना बैलगाडीवरील लोखंडी दांडी विजेच्या तारेला लागल्याने सहा जणांना विजेचा जबर धक्का बसला. यात तिघांचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये सिद्धार्थ नरहरी बावळे (३५, रा. जवळा, ता. पालम), शेख शफीक शेख मुसा (३१) व शेख शौकत शेख मुसा (४०, दोघे रा.बालाजी नगर, पालम) यांचा समावेश आहे. तिघांनाही तातडीने पालममधील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर जखमींमध्ये शेख फरहान शेख महेबूब (१६), आसेफ शाखेर शेख (१८) व शेख असलम शेख गुड्डू (रा.आयेशा कॉलनी, पालम) यांचा समावेश असून त्यांच्यावर साई हॉस्पिटल, लोहा येथे उपचार सुरू आहेत.

ही दुर्घटना शेख शफीक शेख मुसा यांची पानटपरी बैलगाडीतून घराजवळ उतरविताना रविवारी सायंकाळी पावनेसहाच्या सुमारास घडली. यात बैलगाडीवरील पानटपरी घसरून लोखंडी दांडीवर आदळली आणि ती थेट मुख्य लाईनच्या विद्युत तारेला लागल्याने हा भीषण प्रकार घडला. या घटनेने पालम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी पालम ठाण्याच्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेट दिली. या प्रकरणी जखमी तसेच मयत यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी आणि ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती.

टॅग्स :electricityवीजAccidentअपघात