शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
3
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
4
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
5
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
6
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
7
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
8
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
9
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
10
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
11
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
12
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
13
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
14
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
15
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
16
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
17
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
18
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
19
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
20
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप

पाऊस, धुक्यामध्ये नाणेघाट ते भीमाशंकर ट्रेकचा थरार; परभणीच्या गिर्यारोहकांची मोहीम फत्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 16:45 IST

सह्याद्रीत भर पावसांत तीन दिवसांत नाणेघाट ते भीमाशंकर ७५ किमीचा ट्रेक यशस्वी आढळले ऐतिहासिक शिलालेख

परभणी : मुसळधार पावसात धुक्याने आच्छादलेला सह्याद्री, तसेच चढाईस कठीण असलेला नाणेघाट ते भीमाशंकर ट्रेक परभणीच्या स्वराज्य ट्रेकर्सच्या १७ सदस्यांनी केवळ तीन दिवसांत यशस्वीपणे पार केला. या मोहिमेची एकूण दुर्मीळ आणि साहसी ७५ किलोमीटरची मार्गदर्शक प्रवास होता.

या मोहिमेची सुरुवात ठाणे जिल्ह्यातील वाल्लीवरे गावातून शुक्रवारी झाली. सातवाहन काळातील ऐतिहासिक व्यापारी मार्ग असलेल्या नाणेघाटाची चढाई गिर्यारोहकांनी सात तासांत, जोरदार पावसात पार केली. मार्गातील गुहांमध्ये आजही ब्राह्मी लिपीत लिहिलेला प्राकृत भाषेतील शिलालेख दिसतो, तर टोल वसुलीचे प्रतीक असलेला रांजण देखील आहेत. यामुळे गिर्यारोहकांना ऐतिहासिक ठसा अनुभवता आला. त्यानंतर त्यांनी जीवधन किल्ला सर केला. पावसाळ्यात अधिकच कठीण होणाऱ्या नाळेवाटेने चढाई करताना, पाय घसरणारे दगड, झाडाझुडपांमधून जाणारी वाट आणि धारदार पाण्याच्या धारांना तोंड देत गिर्यारोहकांनी साहसाचे उत्तम दर्शन घडवले.

२६ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील आंबोली गावातून ढाकोबा व दुर्ग किल्ल्याच्या दिशेने चढाई सुरू झाली. अनेक धबधबे, घनदाट जंगल आणि चिखलाने भरलेले मार्ग पार करत गिर्यारोहकांनी दुर्गम वाटा सहज पार केल्या. २७ जुलै रोजी आहुपे गावातून सुरू झालेला शेवटचा टप्पा अनेक डोंगररांगा पार करत भीमाशंकर गावी समाप्त झाला. संपूर्ण मोहिमेत गिर्यारोहकांनी निसर्गातील अनेक आव्हानांना तोंड देत, कठीण चढाई व दाट जंगलातील मार्गावर मात करून धाडसी साहस सिद्ध केले.

यांनी नोंदविला सहभागही मोहीम नाशिक येथील जॉकी सोळुंके व किशन मोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली, तर नेतृत्व स्वराज्य ट्रेकर्सचे माधव यादव, गुलाब गरूड आणि रणजित कारेगावकर यांनी सांभाळले. मोहिमेत प्रा. डॉ. जयंत बोबडे, डॉ. रमेश शिंदे, ॲड. सोमनाथ व्यवहारे, प्रा. राम कराळे, प्रसाद गरूड, विष्णू मेहत्रे, भागवत मोरे, शंकर गायकवाड, गजानन पवार, गणेश यादव, प्रकाश राठोड, गजानन तुरे, हरिओम पवार, ऋषिकेश मुळे यांचा सहभाग होता.

दुर्गम किल्ल्यांचे दर्शनस्वराज्य ट्रेकर्स संस्थेमार्फत दरवर्षी अशा साहसी मोहिमांचे आयोजन केले जाते. यामार्फत सह्याद्रीतील दुर्गम किल्ल्यांचे दर्शन घडवले जाते, तसेच गिर्यारोहणाच्या माध्यमातून इतिहासाची ओळख, शारीरिक क्षमतेची चाचणी आणि मनोबल वृद्धी यांचा संगम साधला जातो. अशा मोहिमांमुळे तरुण पिढीत देशाच्या दुर्गवारशाचा अभिमान जागविला जात आहे.

 

टॅग्स :parabhaniपरभणीBhimashankarभीमाशंकर