शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

SSC-HSC exam: परीक्षेत विद्यार्थी कॉपी करताना आढळल्यास पर्यवेक्षक जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 16:01 IST

SSC-HSC exam: दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षण मंडळाची नियमावली जाहीर

परभणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेची तयारी सुरू करण्यात आली असून, नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एकाच वर्गात एकाचवेळी पाचपेक्षा अधिक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यास संबंधित विद्यार्थ्यासह पर्यवेक्षकाला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या लेखीपरीक्षा ४ मार्चपासून, तर दहावीच्या लेखीपरीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार आहेत. या अनुषंगाने परीक्षेसाठीचे केंद्र, पथकांची स्थापना आदींची तयारी शिक्षण मंडळाने चालविली आहे. या परीक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनाही शिक्षण मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एकाच वर्गात एकाचवेळी पाचपेक्षा जास्त विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यास संबंधित विद्यार्थ्यासह पर्यवेक्षकाला जबाबदार धरले जाणार आहे. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध मंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश केंद्र संचालकांना देण्यात आले आहे. या केंद्रावर अनावश्यक हस्तापेक्ष करू नये, तणावमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच कोविडच्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन सर्व केंद्रप्रमुखांनी करावेत, असेही या मार्गदर्शक सूचनेत मंडळाने नमूद केले आहे.

चार सदस्यांचे एक बैठे पथकप्रत्येक परीक्षा केंद्रावर किमान चार सदस्यांचे एक बैठे पथक नियुक्त करण्यात यावे, परीक्षा कालावधीत दोन सदस्यांनी वारंवार परीक्षा हॉलमधून फेरी माराव्यात व दोन सदस्यांनी केंद्राच्या आवारात फेरी मारावी. पथकातील सदस्यांची संख्या कमी जास्त असल्यास त्याची पथकप्रमुखांनी विभागणी करावी तसेच पथकातील सदस्यांनी विद्यार्थ्यांना किंवा पर्यवेक्षकांना कोणत्याही परस्पर सूचना देऊ नयेत, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :examपरीक्षाssc examदहावीAurangabadऔरंगाबाद