शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मानसिक रुग्ण पतीचे धक्कादायक कृत्य; झोपेतील पत्नीचा बेल्टने गळा आवळून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 18:05 IST

जिंतूर शहरातील घटना; किरकोळ कारणावरुन झाले कडाक्याचे भांडण

जिंतूर : रडणाऱ्या मुलास घेण्यास नवऱ्याने नकार दिल्यामुळे पती-पत्नीमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर भांडणात झाले. भांडणाचा राग मनात धरून पतीने कमरेच्या बेल्टने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना सोमवारी जिंतूर शहरातील रमाई नगरात घडली.

शहरातील रमाई नगरात राहणारे राजू अवचार व मयत सुनिता राजू अवचार यांच्यामध्ये १३ मार्च रोजी रात्री १२ ते सकाळी ६ वाजे दरम्यान नवरा-बायकोमध्ये वाद झाला. रडणाऱ्या मुलास घ्या, म्हणून पत्नीने राजू यास सांगितले असता आरोपी व त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर नवऱ्याने कमरेला लावलेला बेल्ट काढून पत्नीचा गळा आवळला. त्यानंतर पत्नी बेशुद्ध अवस्थेत पडून होती. सकाळी हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर या संदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोफणे, पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास कोकाटे, उपनिरीक्षक साहेबराव चौरे, कॉ. लीला जोगदड, बाळकृष्ण कांबळे, उमेश चव्हाण, गजानन बंदुके आदींच्या पथकाने धाव घेत घटनास्थळावरून बेशुद्ध अवस्थेत विवाहित महिलेस नातेवाईकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉ. देवीदास गरड यांनी तपासून मृत घोषित केले.

आरोपी होता मनोरुग्नदरम्यान, राजू आवचार हा मनोरुग्न होता त्याच्यावर औरंगाबाद येथे काही दिवस उपचार करण्यात आले होते. नवरा- बायको विभक्त राहत होते. परंतु, घरी लग्न असल्याचे कारण सांगून राजू आवचार याने काही दिवसापूर्वीच पत्नीला जिंतूर येथे आणले होते, या संदर्भातली फिर्याद संतोष नितनवरे यांनी जिंतूर पोलिसात दिली. त्यावरून आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सदरील प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास कोकाटे हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादparabhaniपरभणी