शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

मराठवाडा-विदर्भाला जोडणारा सी-लिंक धर्तीवरील पूल पूर्ण; मात्र जोडरस्ते अडकले ‘लाल फितीत’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 19:28 IST

९५ कोटी रुपयांच्या निधीतून हा पूल साकारण्यात आला असून, मराठवाड्यातील हा पहिलाच अशा प्रकारचा पूल ठरणार आहे.

- प्रशांत मुळीयेलदरी (जि. परभणी) : मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या येलदरी धरणावर वरळी सी-लिंकच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या केबल स्टेड पुलाचे काम तब्बल ७० वर्षांनंतर पूर्णत्वास आले आहे. ९५ कोटी रुपयांच्या निधीतून हा पूल साकारण्यात आला असून, मराठवाड्यातील हा पहिलाच अशा प्रकारचा पूल ठरणार आहे. मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूंना जोडणाऱ्या रस्त्यांचे काम अद्याप सुरू न झाल्याने वाहतुकीसाठी या पुलाचा वापर होण्याचा मार्ग लाल फितीतच अडकला आहे.

येलदरी धरणावर १९५६ साली बांधलेल्या जुन्या अरुंद व दगडी पुलावरून आजही वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहतूक करावी लागत आहे. अनेक अपघात व जीवितहानीचा साक्षीदार ठरलेला हा पूल आजही वाहतुकीचा एकमेव पर्याय आहे. नागरिक, वाहनधारक व पर्यटक वर्षानुवर्षे नवीन पुलासाठी मागणी करत होते. अखेर, जिंतूरच्या आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पाठपुराव्यामुळे मार्च २०२० च्या अर्थसंकल्पात तत्कालीन बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पुलासाठी ९५ कोटींची तरतूद केली होती. पुलाचे काम पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतरही पूल अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. कारण दोन्ही बाजूंनी जोडणाऱ्या रस्त्यांचे कामच अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे हा पूल केवळ शोभेची वस्तू ठरतोय. जवळपास एक अब्ज रुपयांचा खर्च करूनही प्रत्यक्ष वाहतुकीसाठी हा पूल सुरू होऊ शकला नाही.

जर्मन तंत्रज्ञान, विद्युत रोषणाई अन् पर्यटन विकासाची योजनाया पुलाच्या बांधकामासाठी जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, कायमस्वरूपी विद्युत रोषणाईची योजना आखण्यात आली आहे. तसेच धरण परिसराचा सर्वांगीण पर्यटन विकास व्हावा म्हणून उद्यान, सेल्फी पॉइंट, धरण सौंदर्यीकरण, आदींचा समावेश असलेला एकत्रित विकास आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, या संकल्पनेतील उर्वरित निधी अद्याप शासन दरबारी मंजूर झालेला नाही.

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव?या पुलाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी विरोधी पक्षात असताना आमदार बोर्डीकर यांनी आवाज उठवला होता. आता त्या राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी आपले राजकीय वजन वापरून रस्त्यांच्या कामासाठी उर्वरित निधी मंजूर करून घ्यावा आणि येलदरी परिसरातील पर्यटन विकास आराखड्यालाही गती द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरण