शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

शाळा-महाविद्यालयातील क्षमतेपेक्षा अधिकचे विद्यार्थी प्रवेश होणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 19:07 IST

शहरालगतच्या ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक देण्यात आलेले प्रवेश रद्द करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत

परभणी : शहरालगतच्या ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक देण्यात आलेले प्रवेश रद्द करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले असून या संदर्भातील बाबींची तपासणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे भरारी पथक स्थापन करण्याचेही ९ आॅगस्ट रोजी काढण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

शहरालगतच्या ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मंजूर क्षमतेपेक्षा जादा प्रवेश होत असल्याच्या तक्रारी राज्य शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांच्या स्वाक्षरीने ९ आॅगस्ट रोजी काढण्यात आले आहेत.

त्यामध्ये महापालिका क्षेत्रातील जवळच्या ग्रामीण भागातील परिसरांमध्ये असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत किंवा नाही, हे तपासण्यासाठी सर्व शैक्षणिक विभागांमध्ये विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली किमान ४ भरारी पथकांची स्थापना करण्यात यावी, या भरारी पथकांमध्ये मान्यताप्राप्त व प्रतिष्ठित उच्च माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्यालयातील निवडक ३ प्राचार्यांचा समावेश करावा. त्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकांनी संबंधित शाळांना भेटी देऊन क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांची यादी शिक्षण उपसंचालकांना सादर करावी व उपसंचालकांनी ती तातडीने शिक्षण संचालकांना सादर करावी, असेही या आदेशात म्हटले आहे.

क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्यास्तरावरुन अतिरिक्त विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करावेत, एखाद्या उच्च माध्यमिक विद्यालयाने क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिले असल्यास संबंधित विद्यालयातील जादा विद्यार्थ्यांना १२ वीच्या परीक्षेला बसता येणार नाही. त्यामुळे क्लास/ संस्थाचालकांच्या सांगण्यावरुन ज्या विद्यार्थ्यांनी अशा शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे, त्या विद्यालयांमधील प्रवेश रद्द करुन मंजूर प्रवेशित क्षमतेच्या महाविद्यालयातच प्रवेश घ्यावेत, अशा सूचनाही या आदेशात देण्यात आल्या आहेत.

सर्व माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांची ‘सरल’मधील माहिती ३० सप्टेंबरपर्यंत अपडेट करणे आवश्यक आहे. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांची मंजूर क्षमता, प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या आणि ‘सरल’मधील विद्यार्थ्यांची संख्या या सर्व बाबी लक्षात घेऊनच राज्य मंडळाने १२ वीच्या परीक्षेचे अर्ज स्वीकारावेत, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, शिक्षण विभागाच्या या आदेशानुसार लवकरच जिल्ह्यात कारवाई होणार आहे. त्यामुळे खाजगी शिक्षण संस्था चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

बायोमेट्रिक उपस्थितीमुळेच घेतला निर्णयराज्याच्या शिक्षण विभागाने ११ वीच्या विद्यार्थ्यांची कनिष्ठ महाविद्यालयांमधील उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने नोंदविण्याचा निर्णय २५ जून रोजी घेतला होता. खाजगी कोचिंग क्लासेसचे पेव वाढल्याने शहरालगतच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्याची औपचारिकता पूर्ण करुन अनेक विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थितीच राहत नाहीत व ते थेट खाजगी शिकवण्यांमध्येच गुंतून राहतात. त्यामुळे खाजगी कोचिंग क्लासेसला आळा बसावा, या उद्देशाने राज्य शासनाने बायोमॅट्रिकचा निर्णय घेतला. आता याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शहरांलगतच्या कनिष्ठ विद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक दिलेले प्रवेश रद्द करण्याचा निर्णय घेऊन शिक्षण विभागाने खाजगी कोचिंग क्लासेस चालकांना एक प्रकारे इशाराच दिला असल्याचे मानले जात आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थीState Governmentराज्य सरकारEducationशिक्षणSchoolशाळाcollegeमहाविद्यालय