शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

लॉकडाऊनमुळे अभ्यासावर परिणाम झाला; तणावातून विद्यार्थ्याने गळफास घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 16:48 IST

Student commits suicide धर्मापुरी या छोट्याशा गावातील शुभम गंगाधर उगले हा परभणी येथील रघुनाथ महाविद्यालयातील बी. ए. प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.

परभणी : जिल्ह्यातील धर्मापुरी येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेत जीवनयात्रा संपविली. पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे शिक्षणात खंड पडण्याच्या भीतीने तो तणावात होता. यातूनच नैराश्य आल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते. शुभम गंगाधर उगले (२०) असे मृताचे नाव असून, या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

धर्मापुरी या छोट्याशा गावातील शुभम गंगाधर उगले हा परभणी येथील रघुनाथ महाविद्यालयातील बी. ए. प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद होती. दोन महिन्यांपूर्वी कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने महाविद्यालये सुरू झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा संसर्ग वाढत चालल्याने पुन्हा दि. १ ते ४ मार्च या कालावधीत महाविद्यालये बंद होती. दरम्यान, परीक्षेचे वेळापत्रकही आले होते. नुकत्याच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्या. शुभमची परीक्षा २३ मार्चपासून सुरू होणार असल्याने व लाॉकडाऊनमध्ये पुरेसा अभ्यास न झाल्याने तो निराश होता, कोणाशी फारसे बोलत नव्हता, असे त्याचे काका धाराजी नारायणराव उगले यांनी सांगितल्याचे सूत्रांकडून कळते.तो सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास स्वयंपाक खोलीत एकटाच होता. तिथेच त्याने साडीच्या साह्याने पंख्याला गळफास घेतला. या प्रकरणी काका धाराजी नारायणराव उगले यांनी दिलेल्या माहितीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूStudentविद्यार्थी