शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कानसूर येथून वाहून आलेल्या वाळूने तारुगव्हान ठेक्यावर तणाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 12:45 IST

गोदावरी नदीत जायकवाडी धरणातील पाणी सोडण्यात आल्याने कानसुर पात्रातील वाळू तारुगव्हाण येथील पात्रात वाहून गेली. मात्र, तारुगव्हान पात्रातील वाळूचा ठेकेदाराने आधीच उपसा केल्याने या वाळूचा उपसा करण्यात कानसूर ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

पाथरी (परभणी ) : गोदावरी नदीत जायकवाडी धरणातील पाणी सोडण्यात आल्याने कानसुर पात्रातील वाळू तारुगव्हाण येथील पात्रात वाहून गेली. मात्र, तारुगव्हान पात्रातील वाळूचा ठेकेदाराने आधीच उपसा केल्याने या वाळूचा उपसा करण्यात कानसूर ग्रामस्थांनी विरोध केला आहे. याबाबत आक्रमक पवित्रा घेत ग्रामस्थांनी ८ दिवसांपासून येथील वाळू ठेका बंद पाडला आहे. 

तालुक्यातील तारुगव्हाण येथील नदी पात्रातून ३ हजार ५००  ब्रास वाळू उपसण्यासाठी लिलाव झालेला आहे. यातून मागील महिनाभरातून बेसुमार वाळू उपसा करण्यात आला आहे. यामुळे येथील पात्रात मोठे खड्डे पडले आहेत. तर दुसरीकडे बाजूच्या कानसूर पात्रात ग्रामस्थांनी वाळूचा लिलाव करण्यास मज्जाव केला आहे. यामुळे या भागात अद्याप चांगला पाणीसाठा आहे. येथे पाणीटंचाई जाणवत नाही.

मागील आठवड्यात जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आले. यामुळे कानसूर पात्रातील वाळू वाहून तारूगव्हाणच्या पात्रात आली. लागलीच येथील ठेकेदाराने याचा उपसा सुरु केला. मात्र, या ठेकेदाराने आधीच वाळूचा अमाप उपसा केला असल्याने कानसूर ग्रामस्थांनी याला विरोध केला. दरम्यान, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी आणि संबंधित ठेकेदार यांनी या ठेक्यावर जाऊन पाहणी.मात्र, कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणचा वाळू उपसा करू दिला जाणार नाही अशी ठोक भूमिका कानसुर ग्रामस्थांनी घेतली आहे. यामुळे मागील आठ दिवसांपासून येथील ठेका बंद आहे.  वाळूचा एक कणही पात्रातून उचलू देणार नाहीत या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम असून त्यांची एकजूट आहे. 

टॅग्स :sandवाळूriverनदीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी