शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
6
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
7
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
8
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
9
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
10
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
11
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
12
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
13
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
14
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
15
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
16
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
17
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
18
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
19
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
20
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

कानसूर येथून वाहून आलेल्या वाळूने तारुगव्हान ठेक्यावर तणाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 12:45 IST

गोदावरी नदीत जायकवाडी धरणातील पाणी सोडण्यात आल्याने कानसुर पात्रातील वाळू तारुगव्हाण येथील पात्रात वाहून गेली. मात्र, तारुगव्हान पात्रातील वाळूचा ठेकेदाराने आधीच उपसा केल्याने या वाळूचा उपसा करण्यात कानसूर ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

पाथरी (परभणी ) : गोदावरी नदीत जायकवाडी धरणातील पाणी सोडण्यात आल्याने कानसुर पात्रातील वाळू तारुगव्हाण येथील पात्रात वाहून गेली. मात्र, तारुगव्हान पात्रातील वाळूचा ठेकेदाराने आधीच उपसा केल्याने या वाळूचा उपसा करण्यात कानसूर ग्रामस्थांनी विरोध केला आहे. याबाबत आक्रमक पवित्रा घेत ग्रामस्थांनी ८ दिवसांपासून येथील वाळू ठेका बंद पाडला आहे. 

तालुक्यातील तारुगव्हाण येथील नदी पात्रातून ३ हजार ५००  ब्रास वाळू उपसण्यासाठी लिलाव झालेला आहे. यातून मागील महिनाभरातून बेसुमार वाळू उपसा करण्यात आला आहे. यामुळे येथील पात्रात मोठे खड्डे पडले आहेत. तर दुसरीकडे बाजूच्या कानसूर पात्रात ग्रामस्थांनी वाळूचा लिलाव करण्यास मज्जाव केला आहे. यामुळे या भागात अद्याप चांगला पाणीसाठा आहे. येथे पाणीटंचाई जाणवत नाही.

मागील आठवड्यात जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आले. यामुळे कानसूर पात्रातील वाळू वाहून तारूगव्हाणच्या पात्रात आली. लागलीच येथील ठेकेदाराने याचा उपसा सुरु केला. मात्र, या ठेकेदाराने आधीच वाळूचा अमाप उपसा केला असल्याने कानसूर ग्रामस्थांनी याला विरोध केला. दरम्यान, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी आणि संबंधित ठेकेदार यांनी या ठेक्यावर जाऊन पाहणी.मात्र, कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणचा वाळू उपसा करू दिला जाणार नाही अशी ठोक भूमिका कानसुर ग्रामस्थांनी घेतली आहे. यामुळे मागील आठ दिवसांपासून येथील ठेका बंद आहे.  वाळूचा एक कणही पात्रातून उचलू देणार नाहीत या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम असून त्यांची एकजूट आहे. 

टॅग्स :sandवाळूriverनदीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी