शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स विमा कंपनीविरोधात परभणी जिल्ह्यात १५ ठिकाणी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 15:35 IST

पीक विमा नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने आज जिल्ह्यात १५ ठिकाणी रस्ता अडवून आपला रोष व्यक्त केला़

ठळक मुद्देरिलायन्स पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान झाले असतानाही विमा दिला नाही़ रिलायन्स इन्शुअरन्स कंपनीविरूद्ध सोयाबीन उत्पादकांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे नोंदवावेत़ अशी मुख्य मागणी

परभणी : पीक विमा नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने आज जिल्ह्यात १५ ठिकाणी रस्ता अडवून आपला रोष व्यक्त केला़ या आंदोलनामुळे ठिक ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली होती़ 

रिलायन्स पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान झाले असतानाही विमा दिला नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे़ तेव्हा रिलायन्स इन्शुअरन्स कंपनीविरूद्ध सोयाबीन उत्पादकांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे नोंदवावेत़ या खरीप हंगामात १०७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची जबाबदारी रिलायन्स कंपनीवर निश्चित करावी, विमा जोखीम रकमेच्या हेक्टरी ४० हजार रुपये विमा भरपाई द्यावी, दुष्काळ जाहीर करण्यासाठी लागू केलेले नवीन नियम रद्द करावेत, या मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीचे कॉ़ राजन क्षीरसागर, माणिक कदम यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ 

परभणी शहरातील खानापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करून शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला़ गंगाखेड तालुक्यात गंगाखेड, राणीसावरगाव, पालम,  दैठणा, परभणी तालुक्यात खानापूर, झिरोफाटा, झरी, पाथरी, सेलू आदी ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ ठिक ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती़ प्रशासनाची धावपळ झाली़ 

खानापूर फाटा येथे रास्ता रोको

खानापूर फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ पीक विम्याच्या पैशाबरोबरच तुरीचा प्रश्नही या आंदोलनातून मांडण्यात आला़ १५ मे पासून तूर खरेदी बंद पडली आहे़ आॅनलाईन नोंदणी केलेल्या १३ हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे शिल्लक असून, ही तूर खरेदी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली़ या आंदोलनात स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामभाऊ आवरगंड, शेख जाफर, दिगंबर पवार, गोपाळ लोंढे, अमोल जवंजाळ, बालाजी मोहिते, दिनकर गरुड, रामकिशन गरुड, गजानन गरुड, शिवाजी आवचार, संतोष थोरात, नागनाथ देशमुख, शिवाजी ढगे, बाळासाहेब ढगे, योगेश दराडे, रमेश दुधाटे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ 

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीparabhaniपरभणी