शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

रिलायन्स विमा कंपनीविरोधात परभणी जिल्ह्यात १५ ठिकाणी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 15:35 IST

पीक विमा नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने आज जिल्ह्यात १५ ठिकाणी रस्ता अडवून आपला रोष व्यक्त केला़

ठळक मुद्देरिलायन्स पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान झाले असतानाही विमा दिला नाही़ रिलायन्स इन्शुअरन्स कंपनीविरूद्ध सोयाबीन उत्पादकांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे नोंदवावेत़ अशी मुख्य मागणी

परभणी : पीक विमा नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने आज जिल्ह्यात १५ ठिकाणी रस्ता अडवून आपला रोष व्यक्त केला़ या आंदोलनामुळे ठिक ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली होती़ 

रिलायन्स पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान झाले असतानाही विमा दिला नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे़ तेव्हा रिलायन्स इन्शुअरन्स कंपनीविरूद्ध सोयाबीन उत्पादकांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे नोंदवावेत़ या खरीप हंगामात १०७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची जबाबदारी रिलायन्स कंपनीवर निश्चित करावी, विमा जोखीम रकमेच्या हेक्टरी ४० हजार रुपये विमा भरपाई द्यावी, दुष्काळ जाहीर करण्यासाठी लागू केलेले नवीन नियम रद्द करावेत, या मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीचे कॉ़ राजन क्षीरसागर, माणिक कदम यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ 

परभणी शहरातील खानापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करून शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला़ गंगाखेड तालुक्यात गंगाखेड, राणीसावरगाव, पालम,  दैठणा, परभणी तालुक्यात खानापूर, झिरोफाटा, झरी, पाथरी, सेलू आदी ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ ठिक ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती़ प्रशासनाची धावपळ झाली़ 

खानापूर फाटा येथे रास्ता रोको

खानापूर फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ पीक विम्याच्या पैशाबरोबरच तुरीचा प्रश्नही या आंदोलनातून मांडण्यात आला़ १५ मे पासून तूर खरेदी बंद पडली आहे़ आॅनलाईन नोंदणी केलेल्या १३ हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे शिल्लक असून, ही तूर खरेदी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली़ या आंदोलनात स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामभाऊ आवरगंड, शेख जाफर, दिगंबर पवार, गोपाळ लोंढे, अमोल जवंजाळ, बालाजी मोहिते, दिनकर गरुड, रामकिशन गरुड, गजानन गरुड, शिवाजी आवचार, संतोष थोरात, नागनाथ देशमुख, शिवाजी ढगे, बाळासाहेब ढगे, योगेश दराडे, रमेश दुधाटे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ 

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीparabhaniपरभणी