शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

परभणी जिल्ह्यात सोनपेठमध्ये बसवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:15 IST

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी जिल्ह्यात आंदोलन सुरुच असून शुक्रवारी सोनपेठ तालुक्यात एका बसवर दगडफेक करण्यात आली. तर शहरात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी जिल्ह्यात आंदोलन सुरुच असून शुक्रवारी सोनपेठ तालुक्यात एका बसवर दगडफेक करण्यात आली. तर शहरात ठिय्या आंदोलन करण्यात आले.सोनपेठ तालुक्यातील कोठाळा या गावाजवळ शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सोनपेठहून गंगाखेडकडे जाणारी एम.एच.०६-एस.८५७६ ही एस.टी.बस रस्त्यावर दगड लावून अडविली. त्यानंतर चालकाने बस थांबविली. त्यानंतर शेजारील शेतातून युवक बससमोर आले व मराठा समाजाच्या आरक्षणाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर बसमधील प्रवासी खाली उतरले. त्यानंतर सात ते आठ युवकांनी बसवर दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचा फुटल्या असून ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद चालक मधुकर कुकडे यांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात दिली. यावरुन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार संतोष मुपडे करीत आहेत. दरम्यान, सोनपेठ येथेच सकाळी १० वाजता शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आंदोलनास पाठिंबा दर्शवून मनोगत व्यक्त केले. त्यानंतर नामदेव महाराज फपाळ यांनी कीर्तनातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली.मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी लवकरच वसतिगृहपभणी- मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी लवकरच जिल्ह्याच्या ठिकाणी ५०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह बांधण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासन ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. या वसतिगृहामध्ये पदवी, पदविका, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. वसतिगृहाचे बांधकाम होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात कृषी विद्यापीठाच्या परिसरात वापरात नसलेल्या इमारती ताब्यात घेऊन त्यामध्ये सुधारणा करुन त्या ठिकाणी वसतिगृह सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार कृषी विद्यापीठातील चार इमारतींची शुक्रवारी पाहणी करण्यात आली. त्यामध्ये नागनाथ, वसंत, वसुंधरा व शेतकरी निवास या इमारतींचा समावेश आहे. या इमारतींची दुरुस्ती करुन तातडीने सुविधा उपलब्ध करुन द्या, असे आदेश जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाला दिले असल्याचे लोणीकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, कुलगुरु डॉ.अशोक ढवन, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, कुलसचिव गजेंद्र लोंढे, प्राचार्य गोखले, भाजपा जिल्हाध्यक्ष अभय चाटे, गणेश रोकडे आदी उपस्थित होते.मानवतमध्ये १०१ नारळांचा नवसमानवत शहरात तहसील कार्यालयासमोर १३ व्या दिवशीही धरणे आंदोलन सुरुच आहे. या अंतर्गत शुक्रवारी सकाळी आंदोलकांनी १०१ नारळ फोडून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्य शासनाला नवस केला. तालुक्यातील सोमठाणा ग्रुप ग्रामपंचायतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे असा ठराव मंजूर केला. यासाठी सरपंच राजाराम कुकडे, सदस्य रविकांत निर्वळ, बाबासाहेब भदर्गे, उज्ज्वला निर्वळ, शकुंतला भारती, परमेश्वर निर्वळ, किरण देशमुख, माणिक निर्वळ, गुलाब निर्वळ, संतोष निर्वळ, अनिल निर्वळ आदींनी पुढाकार घेतला.

टॅग्स :parabhaniपरभणीstate transportराज्य परीवहन महामंडळmarathaमराठा