शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

लसच उपाय; लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:17 IST

जिल्ह्यात १ मार्चपासून आतापर्यंत २० हजार ४८२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच या कालावधीत तब्बल ४०४ जणांचा मृत्यू ...

जिल्ह्यात १ मार्चपासून आतापर्यंत २० हजार ४८२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच या कालावधीत तब्बल ४०४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग ज्या गतीने वाढला आहे, त्या गतीने जिल्ह्यात लसीकरण मात्र वाढलेले नाही. आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि कोरोना योद्धे अन्य कर्मचारी व ४५ वर्षांवरील नागरिक अशा जिल्ह्यातील एकूण ६ लाख ४८ हजार नागरिकांना लस देण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत फक्त १ लाख ३० हजार १०६ नागरिकांनीच लस घेतली आहे. हे प्रमाण फक्त २०.०७ टक्के आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात आतापर्यंत लस घेतलेल्या एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. शिवाय लसचे दोन डोस घेतल्यानंतर पुन्हा कोरोनाची लागण होण्याचे प्रमाणही नगण्य आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी लस घेणे, हाच एकमेव मार्ग आहे. त्यासाठी या मोहिमेला गती देण्याची गरज आहे.

पहिल्या डोसनंतर जिल्ह्यात केवळ ०.३ टक्के पॉझिटिव्ह

जिल्ह्यातील ८९ हजार ७५५ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यातील साधारणत: ०.०४ टक्के नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

जिल्ह्यात लसीचा दुसरा डोस ७ हजार ४० जणांनी घेतला आहे. त्यातील साधारणत: ०.०३ टक्के नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणातही लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण ०.०२ ते ०.०४ टक्के इतकेच आहे. त्यामुळे कोरोना लस ही प्रभावी असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी कोरोनाची लस घेणे आवश्यक आहे.

लस महत्त्वाचीच; मृत्यूचा धोका कमी धोका

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत एकाचाही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे लस महत्त्वाचीच आहे. शिवाय मृत्यूचा धोकाही कमीच आहे. त्यामुळे लस घेणे हे प्रत्येकाच्याच हिताचे आहे. यासाठी या मोहिमेला गती देण्याची गरज आहे.

दिवसभरात ५ हजार जणांनी घेतली लस

जिल्ह्यात एकीकडे लसीकरणाची गती कमी असताना लसीचा पुरवठाही म्हणावा त्या प्रमाणात होत नाही. गुरुवारी रात्रीपर्यंत जिल्हा स्तरावरील उपलब्ध साठा संपला होता; परंतु जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर पाईपलाईनमध्ये जवळपास ५ हजार लस उपलब्ध होती. शुक्रवारी दिवसभर ही लस संपली आहे.