शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

लसच उपाय; लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:17 IST

जिल्ह्यात १ मार्चपासून आतापर्यंत २० हजार ४८२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच या कालावधीत तब्बल ४०४ जणांचा मृत्यू ...

जिल्ह्यात १ मार्चपासून आतापर्यंत २० हजार ४८२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच या कालावधीत तब्बल ४०४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग ज्या गतीने वाढला आहे, त्या गतीने जिल्ह्यात लसीकरण मात्र वाढलेले नाही. आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि कोरोना योद्धे अन्य कर्मचारी व ४५ वर्षांवरील नागरिक अशा जिल्ह्यातील एकूण ६ लाख ४८ हजार नागरिकांना लस देण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत फक्त १ लाख ३० हजार १०६ नागरिकांनीच लस घेतली आहे. हे प्रमाण फक्त २०.०७ टक्के आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात आतापर्यंत लस घेतलेल्या एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. शिवाय लसचे दोन डोस घेतल्यानंतर पुन्हा कोरोनाची लागण होण्याचे प्रमाणही नगण्य आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी लस घेणे, हाच एकमेव मार्ग आहे. त्यासाठी या मोहिमेला गती देण्याची गरज आहे.

पहिल्या डोसनंतर जिल्ह्यात केवळ ०.३ टक्के पॉझिटिव्ह

जिल्ह्यातील ८९ हजार ७५५ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यातील साधारणत: ०.०४ टक्के नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

जिल्ह्यात लसीचा दुसरा डोस ७ हजार ४० जणांनी घेतला आहे. त्यातील साधारणत: ०.०३ टक्के नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणातही लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण ०.०२ ते ०.०४ टक्के इतकेच आहे. त्यामुळे कोरोना लस ही प्रभावी असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी कोरोनाची लस घेणे आवश्यक आहे.

लस महत्त्वाचीच; मृत्यूचा धोका कमी धोका

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत एकाचाही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे लस महत्त्वाचीच आहे. शिवाय मृत्यूचा धोकाही कमीच आहे. त्यामुळे लस घेणे हे प्रत्येकाच्याच हिताचे आहे. यासाठी या मोहिमेला गती देण्याची गरज आहे.

दिवसभरात ५ हजार जणांनी घेतली लस

जिल्ह्यात एकीकडे लसीकरणाची गती कमी असताना लसीचा पुरवठाही म्हणावा त्या प्रमाणात होत नाही. गुरुवारी रात्रीपर्यंत जिल्हा स्तरावरील उपलब्ध साठा संपला होता; परंतु जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर पाईपलाईनमध्ये जवळपास ५ हजार लस उपलब्ध होती. शुक्रवारी दिवसभर ही लस संपली आहे.