शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

परभणी जिल्ह्यातील स्थिती: विहीर अधिग्रहण, टँकरसाठी ३६ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:03 IST

जिल्ह्यात दुष्काळामुळे पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली असून विहीर अधिग्रहण व टँकरसाठी पंचायत समित्यांकडे एकूण ३६ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. प्रत्यक्ष टँकर मात्र एकाही गावामध्ये अद्याप सुरु नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी :जिल्ह्यात दुष्काळामुळे पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली असून विहीर अधिग्रहण व टँकरसाठी पंचायत समित्यांकडे एकूण ३६ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. प्रत्यक्ष टँकर मात्र एकाही गावामध्ये अद्याप सुरु नाही.जिल्ह्यात चालू वर्षी फक्त ६२.३० टक्के पाऊस झाला आहे. त्यामध्ये परभणी तालुक्यात ५९.२०, गंगाखेड तालुक्यात ६०.२०, पालम तालुक्यात ५८.४०, पूर्णा तालुक्यात ८९.७०, पाथरी तालुक्यात ५३ टक्के, मानवत तालुक्यात ६१.८०, सोनपेठ तालुक्यात ६२.७०, सेलू तालुक्यात ५६.८०, जिंतूर तालुक्यात ६२.८० टक्के पाऊस झाला होता. समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सर्वत्र टंचाई जाणवू लागली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांकडे टँकर व विहीर अधिग्रहणाचे ३६ प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यामध्ये पालम तालुक्यातून ४ प्रस्ताव दाखल झाले असून त्यापैकी एका प्रस्तावावर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. तीन प्रस्ताव तहसीलस्तरावर प्रलंबित आहेत. गंगाखेड तालुक्यातून सर्वाधिक म्हणजे १४ प्रस्ताव प्राप्त झाले असून एका प्रस्तावावर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांनी निर्गमित केले आहेत. १३ प्रस्ताव गटविकास अधिकारीस्तरावर प्रलंबित आहेत. सेलू तालुक्यातून ६ प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत. त्यापैकी एका प्रस्तावावर कारवाईचे आदेश तहसीलदारांनी निर्गमित केले आहेत. ५ प्रस्ताव गटविकास अधिकारीस्तरावर प्रलंबित आहेत. सोनपेठ तालुक्यातून ४ प्रस्ताव पं.स.कडे दाखल झाले असून हे सर्व प्रस्ताव गटविकास अधिकारी स्तरावर प्रलंबित आहेत.मानवत तालुक्यातून दोन प्रस्ताव प्राप्त झाले असून दोन्ही प्रस्तावांवर कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदारांनी संबंधित यंत्रणेस दिले आहेत. परभणी तालुक्यातून ६ प्रस्ताव पं.स.कडे दाखल झाले आहेत. त्यापैकी दोन प्रस्ताव गटविकास अधिकारी तर चार प्रस्ताव तहसीलस्तरावर प्रलंबित आहेत. पाथरी, जिंतूर, पूर्णा या तिन्ही तालुक्यातून एकही प्रस्ताव यासाठी दाखल झालेला नाही.गटविकास अधिकारी स्तरावर सर्वाधिक प्रस्ताव प्रलंबितजिल्ह्यातील ३६ पैकी तब्बल २४ प्रस्ताव गटविकास अधिकारीस्तरावर निर्णयाविना प्रलंबित आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १३ प्रस्ताव गंगाखेड येथील गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत. तहसीलस्तरावर जिल्ह्यात ७ प्रस्ताव प्रलंबित आहेत. असे असले तरी जिल्ह्यात सध्य स्थितीमध्ये कुठेही टँकर सुरु करण्यात आलेले नाहीत.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईpanchayat samitiपंचायत समिती