शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

परभणी जिल्ह्यातील स्थिती: विहीर अधिग्रहण, टँकरसाठी ३६ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:03 IST

जिल्ह्यात दुष्काळामुळे पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली असून विहीर अधिग्रहण व टँकरसाठी पंचायत समित्यांकडे एकूण ३६ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. प्रत्यक्ष टँकर मात्र एकाही गावामध्ये अद्याप सुरु नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी :जिल्ह्यात दुष्काळामुळे पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली असून विहीर अधिग्रहण व टँकरसाठी पंचायत समित्यांकडे एकूण ३६ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. प्रत्यक्ष टँकर मात्र एकाही गावामध्ये अद्याप सुरु नाही.जिल्ह्यात चालू वर्षी फक्त ६२.३० टक्के पाऊस झाला आहे. त्यामध्ये परभणी तालुक्यात ५९.२०, गंगाखेड तालुक्यात ६०.२०, पालम तालुक्यात ५८.४०, पूर्णा तालुक्यात ८९.७०, पाथरी तालुक्यात ५३ टक्के, मानवत तालुक्यात ६१.८०, सोनपेठ तालुक्यात ६२.७०, सेलू तालुक्यात ५६.८०, जिंतूर तालुक्यात ६२.८० टक्के पाऊस झाला होता. समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सर्वत्र टंचाई जाणवू लागली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांकडे टँकर व विहीर अधिग्रहणाचे ३६ प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यामध्ये पालम तालुक्यातून ४ प्रस्ताव दाखल झाले असून त्यापैकी एका प्रस्तावावर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. तीन प्रस्ताव तहसीलस्तरावर प्रलंबित आहेत. गंगाखेड तालुक्यातून सर्वाधिक म्हणजे १४ प्रस्ताव प्राप्त झाले असून एका प्रस्तावावर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांनी निर्गमित केले आहेत. १३ प्रस्ताव गटविकास अधिकारीस्तरावर प्रलंबित आहेत. सेलू तालुक्यातून ६ प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत. त्यापैकी एका प्रस्तावावर कारवाईचे आदेश तहसीलदारांनी निर्गमित केले आहेत. ५ प्रस्ताव गटविकास अधिकारीस्तरावर प्रलंबित आहेत. सोनपेठ तालुक्यातून ४ प्रस्ताव पं.स.कडे दाखल झाले असून हे सर्व प्रस्ताव गटविकास अधिकारी स्तरावर प्रलंबित आहेत.मानवत तालुक्यातून दोन प्रस्ताव प्राप्त झाले असून दोन्ही प्रस्तावांवर कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदारांनी संबंधित यंत्रणेस दिले आहेत. परभणी तालुक्यातून ६ प्रस्ताव पं.स.कडे दाखल झाले आहेत. त्यापैकी दोन प्रस्ताव गटविकास अधिकारी तर चार प्रस्ताव तहसीलस्तरावर प्रलंबित आहेत. पाथरी, जिंतूर, पूर्णा या तिन्ही तालुक्यातून एकही प्रस्ताव यासाठी दाखल झालेला नाही.गटविकास अधिकारी स्तरावर सर्वाधिक प्रस्ताव प्रलंबितजिल्ह्यातील ३६ पैकी तब्बल २४ प्रस्ताव गटविकास अधिकारीस्तरावर निर्णयाविना प्रलंबित आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १३ प्रस्ताव गंगाखेड येथील गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत. तहसीलस्तरावर जिल्ह्यात ७ प्रस्ताव प्रलंबित आहेत. असे असले तरी जिल्ह्यात सध्य स्थितीमध्ये कुठेही टँकर सुरु करण्यात आलेले नाहीत.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईpanchayat samitiपंचायत समिती