शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील स्थिती: विहीर अधिग्रहण, टँकरसाठी ३६ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:03 IST

जिल्ह्यात दुष्काळामुळे पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली असून विहीर अधिग्रहण व टँकरसाठी पंचायत समित्यांकडे एकूण ३६ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. प्रत्यक्ष टँकर मात्र एकाही गावामध्ये अद्याप सुरु नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी :जिल्ह्यात दुष्काळामुळे पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली असून विहीर अधिग्रहण व टँकरसाठी पंचायत समित्यांकडे एकूण ३६ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. प्रत्यक्ष टँकर मात्र एकाही गावामध्ये अद्याप सुरु नाही.जिल्ह्यात चालू वर्षी फक्त ६२.३० टक्के पाऊस झाला आहे. त्यामध्ये परभणी तालुक्यात ५९.२०, गंगाखेड तालुक्यात ६०.२०, पालम तालुक्यात ५८.४०, पूर्णा तालुक्यात ८९.७०, पाथरी तालुक्यात ५३ टक्के, मानवत तालुक्यात ६१.८०, सोनपेठ तालुक्यात ६२.७०, सेलू तालुक्यात ५६.८०, जिंतूर तालुक्यात ६२.८० टक्के पाऊस झाला होता. समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सर्वत्र टंचाई जाणवू लागली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांकडे टँकर व विहीर अधिग्रहणाचे ३६ प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यामध्ये पालम तालुक्यातून ४ प्रस्ताव दाखल झाले असून त्यापैकी एका प्रस्तावावर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. तीन प्रस्ताव तहसीलस्तरावर प्रलंबित आहेत. गंगाखेड तालुक्यातून सर्वाधिक म्हणजे १४ प्रस्ताव प्राप्त झाले असून एका प्रस्तावावर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांनी निर्गमित केले आहेत. १३ प्रस्ताव गटविकास अधिकारीस्तरावर प्रलंबित आहेत. सेलू तालुक्यातून ६ प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत. त्यापैकी एका प्रस्तावावर कारवाईचे आदेश तहसीलदारांनी निर्गमित केले आहेत. ५ प्रस्ताव गटविकास अधिकारीस्तरावर प्रलंबित आहेत. सोनपेठ तालुक्यातून ४ प्रस्ताव पं.स.कडे दाखल झाले असून हे सर्व प्रस्ताव गटविकास अधिकारी स्तरावर प्रलंबित आहेत.मानवत तालुक्यातून दोन प्रस्ताव प्राप्त झाले असून दोन्ही प्रस्तावांवर कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदारांनी संबंधित यंत्रणेस दिले आहेत. परभणी तालुक्यातून ६ प्रस्ताव पं.स.कडे दाखल झाले आहेत. त्यापैकी दोन प्रस्ताव गटविकास अधिकारी तर चार प्रस्ताव तहसीलस्तरावर प्रलंबित आहेत. पाथरी, जिंतूर, पूर्णा या तिन्ही तालुक्यातून एकही प्रस्ताव यासाठी दाखल झालेला नाही.गटविकास अधिकारी स्तरावर सर्वाधिक प्रस्ताव प्रलंबितजिल्ह्यातील ३६ पैकी तब्बल २४ प्रस्ताव गटविकास अधिकारीस्तरावर निर्णयाविना प्रलंबित आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १३ प्रस्ताव गंगाखेड येथील गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत. तहसीलस्तरावर जिल्ह्यात ७ प्रस्ताव प्रलंबित आहेत. असे असले तरी जिल्ह्यात सध्य स्थितीमध्ये कुठेही टँकर सुरु करण्यात आलेले नाहीत.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईpanchayat samitiपंचायत समिती