शहरं
Join us  
Trending Stories
1
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
2
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
3
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
4
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
5
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
6
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
7
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
8
राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक, दमदार लूक समोर
9
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित
10
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
11
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
12
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
13
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
14
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
15
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
16
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
17
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
18
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
19
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
20
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली

जिल्ह्यात सात दिवसांत कोरोनाने दगावले ६० रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:17 AM

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांना धास्ती निर्माण झाली आहे. या संसर्गाला आवर घालण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळे प्रयत्न केले ...

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांना धास्ती निर्माण झाली आहे. या संसर्गाला आवर घालण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अद्यापपर्यंत त्यास यश आले नाही. रुग्णांची वाढलेली संख्या ज्या प्रमाणे चिंतेची बनत आहे, त्यापेक्षा अधिक चिंताजनक बाब म्हणजे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूची आहे.

मागील आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणे २ ते ३ रुग्णांवर होते. मात्र १ एप्रिलपासून रुग्ण दगावण्याचे प्रमाण अधिक झाले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांची चिंता आणखीच वाढली आहे.

१ ते ७ एप्रिल या सात दिवसांत जिल्ह्यातील ६० जणांना प्राण गमवावा लागला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्यावर शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार केले जातात. जिल्ह्यात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन बेडसाठी धावपळ होत आहे. त्यातच मागील आठवड्यामध्ये रेमडेसिवीर या इंजेक्शनचाही तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.

१ एप्रिल रोजी जिल्ह्यातील ११ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यानंतर ७ एप्रिल रोजी सर्वाधिक १२ रुग्ण कोरोनाने मृत्यू पावले आहेत. याच काळात दि. २ आणि ३ एप्रिल रजी प्रत्येकी ६, ४ आणि ५ एप्रिल रोजी ८ आणि ६ एप्रिल रोजी ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्यात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ज्येष्ठांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक

कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. विशेष म्हणजे ज्या रुग्णांना इतर आजाराची लक्षणे आहेत, अशा रुग्णांना कोरोनापासून अधिक धोका निर्माण झाला आहे. ज्येष्ठ नागरिकांसह आजार असणाऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे.