शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
4
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
5
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
6
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
7
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 
8
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
9
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
10
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
11
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
12
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
13
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
14
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
15
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
16
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
17
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
18
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
19
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
20
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!

ग्रामपंचायतीसाठी वेगळाच राजकीय पट; पक्षीय विचारांना बाजूला सारुन विरोधक आले एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 16:58 IST

राजकारणात आता वैचारिक मूल्य, तत्वनिष्ठा, पक्षनिष्ठा, त्याग, नि:स्वार्थ भावना या सर्व गोष्टी नावालाच राहिल्या आहेत.

ठळक मुद्देस्व:हित साधण्यासाठी व्यक्तिनिष्ठतेलाच पक्षनिष्ठेचा मुलामा महाविकास आघाडीतील घटक पक्षापेक्षा विरोधातील पक्षाचे कार्यकर्ते जवळचे

- अभिमन्यू कांबळे

परभणी : जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पक्षीय राजकारण बाजूला सारून राज्य पातळीवर एकमेकाविरोधात असलेल्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आल्याचे चित्र पहावयास मिळाले. 

राजकारणात आता वैचारिक मूल्य, तत्वनिष्ठा, पक्षनिष्ठा, त्याग, नि:स्वार्थ भावना या सर्व गोष्टी नावालाच राहिल्या आहेत. स्व:हित साधण्यासाठी व्यक्तिनिष्ठतेलाच पक्षनिष्ठेचा मुलामा देऊन तत्त्वनिष्ठतेच्या गप्पा राजकीय नेते मंडळी व काही कार्यकर्त्यांकडून हाकल्या जात आहेत. परभणी जिल्ह्याचे राजकारणही गेल्या अनेक वर्षांपासून अशाच पद्धतीने सुरू आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील नेतेमंडळींची मुंबईत पत राहत नाही. परिणामी जिल्ह्याच्या विकासाची झोळी बहुतांश वेळा रिकामीच राहते. आतापर्यंत जिल्हास्तरावरील नेत्यांकडून रावबविण्यात येणारा हा पॅटर्न आता गावपातळीवरील कार्यकर्तेही राबवू लागले आहेत. याची प्रचिती नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिल्हावासीयांना अनुभवयास मिळाली. 

राज्यात सध्या शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या ३ पक्षांचे सरकार सत्तेत आहे. या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्यांची आघाडी होणे अपेक्षित असताना महाविकास आघाडीतील घटक पक्षापेक्षा विरोधातील पक्षाचे कार्यकर्ते जवळचे वाटल्याचा प्रकार अनेक ग्रामपंचायतीत सरपंच पद मिळविण्यासाठी झाल्याचे दिसून आले. विशेषतः जिंतूर व सेलू तालुक्यात ही बाब प्रकर्षाने जाणवली. या तालुक्यांत भाजपचे माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. विजय भांबळे याच्यात कट्टर राजकीय वाद असताना त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते ग्रा. प. निवडणुकीत काही ठिकाणी एकत्र आले. त्यात जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे भाजप व राष्ट्रवादीच्या पॅनलमध्येच लढत झाली असताना, समसमान जागा मिळाल्याने सरपंच पद मिळविण्यासाठी या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले. असेच चित्र धमधम, सावंगी म्हाळसा, टाकळखोपा, सायखेडा (बामणी), धानोरा बु. या ग्रामपंचायतीतही पहावयास मिळाले. सेलू तालुक्यातही अशी परिस्थिती ही गावांमध्ये पहावयास मिळाली. या तालुक्यातील वालुर, कुला कोलदांडी, हातनूर, देगावफाटा, निपाणी टाकळी तसेच पाथरी तालुक्यातील पाटोदा या गावांमध्येही भाजपा-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पद मिळविण्यासाठी एकत्र आले. गंगाखेड तालुक्यातील झोला या गावात मात्र या सर्वांच्या पुढे जाऊन सर्वच पक्षांच्या नेत्यांचे फोटो स्थानिक पॅनलच्या जाहीरातीत दिसून आले. ग्रा. प. निवडणुका या स्थानिक प्रश्नांवर लढल्या जात असल्या तरी प्रमुख नेत्यांचे राजकारण याच कार्यकर्यांच्या पाठींब्यावर चालते. शिवाय केंद्र व राज्य शासनाने थेट ग्रामपंचायतींना निधी देण्यास सुरुवात केल्याने ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी दिग्गज नेतेमंडळींनी चांगलीच ताकद पणाला लावली होती. तसेच राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी पेक्षा शिवसेना व भाजपामध्ये पराकोटीचा विरोध परंतु, परभणी जिल्ह्यात शिवसेना नेहमीच भाजपला पूरक भूमिका घेत असल्याचा आरोप, राष्ट्रवादीने केला केला आहे. विशेषतः जिंतूर बाजार समितीच्या वादात हा विषय चर्चेत आला होता. आता ग्रामपंचायत निवडणुकीत आडगाव बाजार येथे भाजप व शिवसेना कार्यकर्ते एकत्र आल्याचे पहावयास मिळाले.जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही प्रत्ययपरभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५ वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत असेच चित्र पहावयास मिळाले होते. आता पुन्हा ही निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीतही इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचे संकेत मिळत आहेत. 

टॅग्स :parabhaniपरभणीPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा