शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

सेलू तालुक्यात महावितरणने २३०० कृषी पंपाचा वीज पुरवठा तोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 7:08 PM

सेलू तालुक्यात महावितरणने थकबाकी वसूली मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत सुमारे २३०० ग्राहकांचा वीज पुरवठा तोडला आहे.तर १४ कृषी पंपधारकाकडून २६ लाख रूपयांची वसूली करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसेलू तालुक्यात १० हजार ४०० कृषीपंप वीज ग्राहक आहेत़ या कृषी पंपधारकांकडे ९० कोटी रूपयांची थकबाकी आहे़ १० हजार ४०० कृषी पंपापैकी जवळपास २३०० कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित आहे १४०० शेतक-यांनी २६ लाख रूपयांचा भरणा केला़ यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला़

सेलू :  सेलू तालुक्यात महावितरणने थकबाकी वसूली मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत सुमारे २३०० ग्राहकांचा वीज पुरवठा तोडला आहे.तर १४ कृषी पंपधारकाकडून २६ लाख रूपयांची वसूली करण्यात आली आहे़

सेलू तालुक्यात १० हजार ४०० कृषीपंप वीज ग्राहक आहेत़ या कृषी पंपधारकांकडे ९० कोटी रूपयांची थकबाकी आहे़ सध्या दुधना प्रकल्पातून डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे़ सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतक-यांनी गहू, हरभरा आदी पिकांना पाणी देणे सुरू केले आहे़ परंतु, महावितरणने थकबाकीधारकांडून वीज बील वसूली मोहीम हाती घेतली आहे़ त्यामुळे कृषी पंप धारक त्रस्त झाले आहेत़ कृषी पंप धारकांकडून वसूलीसाठी महावितरणच्या वतीने पथके नियुक्त केली आहेत.

डिसेंबर महिन्यात वालूर, चिखलठाणा, नांदगाव या उपकेंद्रातील १० हजार ४०० कृषी पंपापैकी जवळपास २३०० कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित केला होता़ या शेतकºयांकडे २२ कोटी रूपयांचे वीज बील थकीत होते़ त्यातील १४०० शेतक-यांनी २६ लाख रूपयांचा भरणा केला़ यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला़ परंतु, वीज पुरवठा तोडलेल्या पंपापैकी ९०० कृषी पंपाचा वीज पुरवठा जोडलेलाच नाही़ सध्या कृषी पंपाना काही ठिकाणी ५ तास तसेच काही उपकेंद्रातून रात्री १० तास तर दिवसा ८ तास वीज पुरवठा केला जातो़ इतर फिडर अंतर्गत येणाºया कृषी पंपाना केवळ ५ तास वीज पुरवठा करण्यात येतो़ रब्बी हंगामातील पिकांचे उत्पन्न पाण्यावर अवलंबून असून महावितरणने ऐन हंगामातच वसूली मोहीमेचा धडाका लावल्यामुळे अडचणीत वाढ झाली आहे़ 

११०० घरगुती ग्राहकांना शॉकमहावितरणने आतापर्यंत ११०० घरगुती ग्राहकांसह ८६ वाणिज्य ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे़ यामध्ये सेलू शहरातील ४५० ग्राहकांचा समावेश असून उर्वरित ग्रामीण भागातील ग्राहक आहेत़ ११०० ग्राहकांकडे अडीच कोटींची थकबाकी आहे़ ८६ वाणिज्य ग्राहकांकडे ६० लाख रूपये थकले आहेत़ आतापर्यंत तालुक्यातील गुळखंड, कुपटा, हातनुर, वलंगवाडी, कुंडी, म्हाळसापूर, डिग्रस, डिग्रसवाडीसह २० ते २५ गावांतील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे़ 

तालुक्यात पाणी उपलब्ध असल्याने अनेक शेतकºयांनी बोंडअळीग्रस्त कापूस उपटून गहू, हरभरा आदी पिकांची लागवड केली आहे. परंतु, महावितरणच्या वतीने थकबाकी वसुली मोहीम सुरू केल्याने शेतक-यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील कृषीपंप, घरगुती व वाणिज्य ग्राहकांकडून थकीत वसूलीसाठी मार्च पर्यंत महावितरण वसूली मोहिम राबविणार आहे़ - राजेश मेश्राम, उपविभागीय अभियंता, सेलू

टॅग्स :parabhaniपरभणी