शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

परभणी जिल्ह्यात साडेदहा हजार हेक्टरवर होणार बीजोत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 1:01 AM

२०१८-१९ या खरीप हंगामासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून जिल्ह्यातील साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या १० हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर बीजोत्पादन होणार आहे. त्यामुळे शेतकºयांना प्रमाणित व दर्जेदार बियाणे वाजवी दरात उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : २०१८-१९ या खरीप हंगामासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून जिल्ह्यातील साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या १० हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर बीजोत्पादन होणार आहे. त्यामुळे शेतकºयांना प्रमाणित व दर्जेदार बियाणे वाजवी दरात उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.खरीप हंगाम हा जिल्ह्यातील शेतकºयांची आर्थिक वाहिनी म्हणून समजला जातो. या हंगामात शेतकरी सोयाबीन, तूर, उडीद, मूग व नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कापसाची जवळपास ५ लाख हेक्टर क्षेत्रवर लागवड करतात. लागवड केलेल्या पिकातून होणाºया उत्पादनातून वर्षभराची आर्थिक घडी बसविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, गेल्या काही वर्षापासून सुलतानी व अस्मानी संकटाचा सामना जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत.गेल्या काही वर्षात शेतकºयांना बोगस बियाणांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नैसर्गिक संकटातून बचावलेल्या शेतकºयांना निकृष्ट बियाणांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या सर्व प्रकारातून शेतकºयांना बाहेर काढण्यासाठी २०१८-१९ च्या खरीप हंगामात तूर, मुग, सोयाबीन, उडीद, सुधारित बाजारा व ज्युट या पिकांच्या लागवडीसाठी प्रमाणित व दर्जेदार बियाणे मिळावे, यासाठी गेल्या दोन वर्षापासून राज्य शासन व बियाणे महामंडळाच्या वतीने बीजोत्पादन कार्यक्रम अंमलात आणला. या कार्यक्रमातून शेतकºयांना बियाणे महामंडळाकडून बियाणे उपलब्ध करुन दिले जाते. या बियाणातून होणारे उत्पन्न महामंडळ व शेतकरी पुढील खरीप हंगामात पेरणीसाठी उपलब्ध करुन देतात. यावर्षी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने जिल्ह्यातील बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत साडेतीन हजार शेतकºयांना बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील साडेदहा हजार हेक्टर क्षेत्र बिजोत्पादन कार्यक्रमासाठी प्रस्तावित केले आहे. यामध्ये सोयाबीनसाठी ९५०० हेक्टर क्षेत्र, तुरीसाठी २०० हेक्टर, मुगासाठी १०० हेक्टर, उडदासाठी ५० हेक्टर, सुधारित बाजरीसाठी १०० हेक्टर, ज्युट पिकासाठी ५० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. त्यामुळे यावर्षी खरीप हंगामासाठी प्रमाणित व दर्जेदार बियाणे उपलब्ध होणार आहेत.गतवर्षी ५५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध२०१७-१८ या खरीप हंगामापासून राज्य शासन व बियाणे महामंडळाकडून बिजोत्पादन कार्यक्रम राबविला जात आहे. २०१७-१८ या खरीप हंगामात जिल्ह्यातील ९ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर बिजोत्पादन कार्यक्रम घेण्यात आला. परंतु, अवेळी झालेल्या पावसामुळे बिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत असलेल्या पिकाला फटका बसला. तरी सुद्धा या कार्यक्रमांतर्गत बियाणे महामंडळाकडे ५५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. हे बियाणे २०१८-१९ च्या खरीप हंगामातील पेरणीसाठी वापरण्यात येणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी