शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

एटीएम केंद्रांची सुरक्षा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:18 AM

परभणी : शहरातील एटीएम केंद्रांच्या सुरक्षेविषयी फारसे गांभीर्याने घेतले जात नसून, बहुतांश एटीएम केंद्रांच्या परिसरातील सुरक्षारक्षक गायब झाले आहेत. ...

परभणी : शहरातील एटीएम केंद्रांच्या सुरक्षेविषयी फारसे गांभीर्याने घेतले जात नसून, बहुतांश एटीएम केंद्रांच्या परिसरातील सुरक्षारक्षक गायब झाले आहेत. त्यामुळे केवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरच या केंद्रांच्या सुरक्षेची भिस्त आहे.

मागच्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील एटीएम केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही केंद्र बँक शाखेच्या शेजारीच आहेत. मात्र, बहुतांश केंद्र हे बँकेच्या कार्यालयापासून दूर अंतरावर आहेत. या केंद्रांच्या परिसरात सुरुवातीच्या काळात सुरक्षारक्षक नियुक्त केलेले होते. मात्र, मागील काही दिवसांपासून हे सुरक्षारक्षक गायब झाले आहेत. जिल्हा परिषदेसमोरील जुनी हैदराबाद बँक, वसमत रस्त्यावरील युनियन बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, नानलपेठ परिसरातील स्टेट बँकेचे एटीएम केंद्र या ठिकाणी दिवसा आणि रात्रीही सुरक्षारक्षक गैरहजर असतात. त्यामुळे एटीएम केंद्रात छेडछाड करुन चोरीचा प्रयत्न होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका एटीएम मशीनमध्ये साधारणत: २० ते २५ लाख रुपयांपर्यंतची कॅश बसते. एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेली कॅश सांभाळण्यासाठी किंवा सुरक्षेच्या दृष्टीने फारसी काळजी घेतली जात नसल्याचे सध्याच्या स्थितीवरून दिसत आहे. विशेष म्हणजे काही एटीएम केंद्रांची दुरवस्था झाली आहे. केंद्रांचे दरवाजे तुटलेले असून, केंद्राच्या परिसरात अस्वच्छता असते. अधिक वर्दळ नसलेल्या भागातील एटीएम केंद्राच्या सुरक्षेसाठी काळजी घेणे गरजेचे असताना त्याकडे मात्र बँक प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

एटीएम फोडण्याच्या घडल्या होत्या घटना

दोन वर्षांपूर्वीच शहरात एटीएम केंद्र फोडून रक्कम पळवण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या आहेत. वसमत रस्त्यावरील एमआयडीसी परिसरातील स्टेट बँकेचे एटीएम मशीन जेसीबी मशीनच्या साह्याने फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना ताजी आहे. याशिवाय शहरातील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसमोरील एटीएम केंद्राला आग लावून त्यातील रक्कम पळवण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच एटीएम मशीनमध्ये छेडछाड करण्याचे प्रकारही सातत्याने होत असतात. या घटना लक्षात घेता, एटीएम केंद्राच्या सुरक्षेसाठी २४ तास सुरक्षारक्षक नियुक्त करणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

फसवेगिरीलाही बसेल आळा

एटीएम केंद्रावर एटीएम मशीनची अदलाबदल करून खात्यातील रक्कम लांबविण्याचे प्रकार गंगाखेड, पाथरी तालुक्यात घडले आहेत. त्यामुळे गैरकायदेशीर कृत्य करणारे या केंद्रांच्या परिसरातच वावरत असतात. प्रत्येक एटीएम केंद्रावर सुरक्षारक्षकाची नियुक्ती झाली तर भामट्यांकडून होणाऱ्या फसवेगिरीलाही आळा बसण्याची शक्यता आहे.