शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

परभणी शहरासाठीचे टंचाई प्रस्ताव लाल फितीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 19:18 IST

पाणीटंचाई निवारणासाठी महापालिकेने तयार केलेला १ कोटी ९३ लाख रुपयांचा टंचाई निवारणाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.

ठळक मुद्दे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे १० ते १२ दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. ही योजना ३५ वर्षापूर्वीची जुनी असून शहराच्या लोकसंख्येत दुपटीने वाढ झाल्याने योजनेचे पाणी पुरेशा प्रमाणात शहरवासियांपर्यंत पोहोचत नाही.

परभणी : पाणीटंचाई निवारणासाठी महापालिकेने तयार केलेला १ कोटी ९३ लाख रुपयांचा टंचाई निवारणाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. या प्रस्तावास अद्याप मंजुरी न मिळाल्याने शहरातील टंचाई निवारणाची कामे ठप्प पडली आहेत.

परभणी शहराला राहटी येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा होतो. या बंधाऱ्यात गुरुवारी सायंकाळपर्यंत निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी दाखल झाल्याने शहरवासियांना अल्पसा दिलासा मिळाला असला तरी शहरात सध्या टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे १० ते १२ दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. ही योजना ३५ वर्षापूर्वीची जुनी असून शहराच्या लोकसंख्येत दुपटीने वाढ झाल्याने योजनेचे पाणी पुरेशा प्रमाणात शहरवासियांपर्यंत पोहोचत नाही. दहा- दहा दिवस पाणी येत नसल्याने टंचाई तीव्र झाली आहे. 

शहरातील अनेक भागांत जलवाहिनी पोहोचलेली नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना खाजगी बोअरवर अवलंबून रहावे लागते. उन्हाळ्यात भूजल पातळी घटल्याने बोअरही कोरडे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये शहरात टंचाईची परिस्थिती निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन मनपाने उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईचा कृती आराखडा जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यात शहरातील १० विहिरींमधील गाळ काढणे, विहीर खोलीकरण करणे या कामांसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. तसेच कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी १५ लाख रुपये आणि शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ९४ लाख ६३ हजार रुपये, विंधन विहीर, हातपंपाच्या दुरुस्तीसाठी ३८ लाख ४६ हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. अर्धा उन्हाळा सरला असून शहरात पाणीटंचाई वाढली आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाने या प्रस्तावास मंजुरी दिली नसल्याने शहरातील टंचाईची कामे ठप्प पडली आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे सुरु झाली तर नागरिकांना टंचाईपासून दिलासा मिळणार आहे. तेव्हा जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखड्यातील कामांना मंजुरी द्यावी, अशी मागणी होत आहे. 

मनपाने सुरू केला दहा टँकरने पाणीपुरवठापरभणी शहरातील अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने महापालिकेने १० टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यात १२ हजार लिटर क्षमतेचे दोन टँकर असून पाच हजार लिटर क्षमतेचे उर्वरित टँकर आहेत. शहरातील भीमनगर, परसावतनगर, संजयगांधी नगर , गौस कॉलनी, झमझम कॉलनी, शिवनेरीनगर, लक्ष्मीनगर, सागरनगर, गालिबनगर, सिंचननगर, धनलक्ष्मीनगर, मराठवाडा प्लॉट, पोस्ट कॉलनी आदी भागात टँकरच्या साह्याने पाणीपुरवठा केला जात आहे. 

हातपंप दुरुस्ती रेंगाळलीशहरामध्ये ६०० पेक्षा अधिक सार्वजनिक हातपंप असून निम्मे हातपंप बंद आहेत. काही हातंपप केवळ साहित्य नसल्याने बंद आहेत. हातपंपांची दुरुस्ती झाली तर पाणीटंचाईवर बऱ्याच अंशी मात होऊ शकते. मात्र मंजुरी अभावी हातपंप दुरुस्तीचे कामही सुरु झालेले नाही. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMuncipal Corporationनगर पालिकाgovernment schemeसरकारी योजना