शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
2
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
3
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
4
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
5
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
6
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
7
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
8
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
9
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
10
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
11
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
12
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
13
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
14
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
15
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
16
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
17
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
18
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
19
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
20
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी शहरासाठीचे टंचाई प्रस्ताव लाल फितीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 19:18 IST

पाणीटंचाई निवारणासाठी महापालिकेने तयार केलेला १ कोटी ९३ लाख रुपयांचा टंचाई निवारणाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.

ठळक मुद्दे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे १० ते १२ दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. ही योजना ३५ वर्षापूर्वीची जुनी असून शहराच्या लोकसंख्येत दुपटीने वाढ झाल्याने योजनेचे पाणी पुरेशा प्रमाणात शहरवासियांपर्यंत पोहोचत नाही.

परभणी : पाणीटंचाई निवारणासाठी महापालिकेने तयार केलेला १ कोटी ९३ लाख रुपयांचा टंचाई निवारणाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. या प्रस्तावास अद्याप मंजुरी न मिळाल्याने शहरातील टंचाई निवारणाची कामे ठप्प पडली आहेत.

परभणी शहराला राहटी येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा होतो. या बंधाऱ्यात गुरुवारी सायंकाळपर्यंत निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी दाखल झाल्याने शहरवासियांना अल्पसा दिलासा मिळाला असला तरी शहरात सध्या टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे १० ते १२ दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. ही योजना ३५ वर्षापूर्वीची जुनी असून शहराच्या लोकसंख्येत दुपटीने वाढ झाल्याने योजनेचे पाणी पुरेशा प्रमाणात शहरवासियांपर्यंत पोहोचत नाही. दहा- दहा दिवस पाणी येत नसल्याने टंचाई तीव्र झाली आहे. 

शहरातील अनेक भागांत जलवाहिनी पोहोचलेली नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना खाजगी बोअरवर अवलंबून रहावे लागते. उन्हाळ्यात भूजल पातळी घटल्याने बोअरही कोरडे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये शहरात टंचाईची परिस्थिती निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन मनपाने उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईचा कृती आराखडा जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यात शहरातील १० विहिरींमधील गाळ काढणे, विहीर खोलीकरण करणे या कामांसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. तसेच कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी १५ लाख रुपये आणि शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ९४ लाख ६३ हजार रुपये, विंधन विहीर, हातपंपाच्या दुरुस्तीसाठी ३८ लाख ४६ हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. अर्धा उन्हाळा सरला असून शहरात पाणीटंचाई वाढली आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाने या प्रस्तावास मंजुरी दिली नसल्याने शहरातील टंचाईची कामे ठप्प पडली आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे सुरु झाली तर नागरिकांना टंचाईपासून दिलासा मिळणार आहे. तेव्हा जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखड्यातील कामांना मंजुरी द्यावी, अशी मागणी होत आहे. 

मनपाने सुरू केला दहा टँकरने पाणीपुरवठापरभणी शहरातील अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने महापालिकेने १० टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यात १२ हजार लिटर क्षमतेचे दोन टँकर असून पाच हजार लिटर क्षमतेचे उर्वरित टँकर आहेत. शहरातील भीमनगर, परसावतनगर, संजयगांधी नगर , गौस कॉलनी, झमझम कॉलनी, शिवनेरीनगर, लक्ष्मीनगर, सागरनगर, गालिबनगर, सिंचननगर, धनलक्ष्मीनगर, मराठवाडा प्लॉट, पोस्ट कॉलनी आदी भागात टँकरच्या साह्याने पाणीपुरवठा केला जात आहे. 

हातपंप दुरुस्ती रेंगाळलीशहरामध्ये ६०० पेक्षा अधिक सार्वजनिक हातपंप असून निम्मे हातपंप बंद आहेत. काही हातंपप केवळ साहित्य नसल्याने बंद आहेत. हातपंपांची दुरुस्ती झाली तर पाणीटंचाईवर बऱ्याच अंशी मात होऊ शकते. मात्र मंजुरी अभावी हातपंप दुरुस्तीचे कामही सुरु झालेले नाही. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMuncipal Corporationनगर पालिकाgovernment schemeसरकारी योजना