शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

परभणी शहरासाठीचे टंचाई प्रस्ताव लाल फितीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 19:18 IST

पाणीटंचाई निवारणासाठी महापालिकेने तयार केलेला १ कोटी ९३ लाख रुपयांचा टंचाई निवारणाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.

ठळक मुद्दे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे १० ते १२ दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. ही योजना ३५ वर्षापूर्वीची जुनी असून शहराच्या लोकसंख्येत दुपटीने वाढ झाल्याने योजनेचे पाणी पुरेशा प्रमाणात शहरवासियांपर्यंत पोहोचत नाही.

परभणी : पाणीटंचाई निवारणासाठी महापालिकेने तयार केलेला १ कोटी ९३ लाख रुपयांचा टंचाई निवारणाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. या प्रस्तावास अद्याप मंजुरी न मिळाल्याने शहरातील टंचाई निवारणाची कामे ठप्प पडली आहेत.

परभणी शहराला राहटी येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा होतो. या बंधाऱ्यात गुरुवारी सायंकाळपर्यंत निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी दाखल झाल्याने शहरवासियांना अल्पसा दिलासा मिळाला असला तरी शहरात सध्या टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे १० ते १२ दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. ही योजना ३५ वर्षापूर्वीची जुनी असून शहराच्या लोकसंख्येत दुपटीने वाढ झाल्याने योजनेचे पाणी पुरेशा प्रमाणात शहरवासियांपर्यंत पोहोचत नाही. दहा- दहा दिवस पाणी येत नसल्याने टंचाई तीव्र झाली आहे. 

शहरातील अनेक भागांत जलवाहिनी पोहोचलेली नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना खाजगी बोअरवर अवलंबून रहावे लागते. उन्हाळ्यात भूजल पातळी घटल्याने बोअरही कोरडे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये शहरात टंचाईची परिस्थिती निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन मनपाने उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईचा कृती आराखडा जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यात शहरातील १० विहिरींमधील गाळ काढणे, विहीर खोलीकरण करणे या कामांसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. तसेच कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी १५ लाख रुपये आणि शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ९४ लाख ६३ हजार रुपये, विंधन विहीर, हातपंपाच्या दुरुस्तीसाठी ३८ लाख ४६ हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. अर्धा उन्हाळा सरला असून शहरात पाणीटंचाई वाढली आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाने या प्रस्तावास मंजुरी दिली नसल्याने शहरातील टंचाईची कामे ठप्प पडली आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे सुरु झाली तर नागरिकांना टंचाईपासून दिलासा मिळणार आहे. तेव्हा जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखड्यातील कामांना मंजुरी द्यावी, अशी मागणी होत आहे. 

मनपाने सुरू केला दहा टँकरने पाणीपुरवठापरभणी शहरातील अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने महापालिकेने १० टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यात १२ हजार लिटर क्षमतेचे दोन टँकर असून पाच हजार लिटर क्षमतेचे उर्वरित टँकर आहेत. शहरातील भीमनगर, परसावतनगर, संजयगांधी नगर , गौस कॉलनी, झमझम कॉलनी, शिवनेरीनगर, लक्ष्मीनगर, सागरनगर, गालिबनगर, सिंचननगर, धनलक्ष्मीनगर, मराठवाडा प्लॉट, पोस्ट कॉलनी आदी भागात टँकरच्या साह्याने पाणीपुरवठा केला जात आहे. 

हातपंप दुरुस्ती रेंगाळलीशहरामध्ये ६०० पेक्षा अधिक सार्वजनिक हातपंप असून निम्मे हातपंप बंद आहेत. काही हातंपप केवळ साहित्य नसल्याने बंद आहेत. हातपंपांची दुरुस्ती झाली तर पाणीटंचाईवर बऱ्याच अंशी मात होऊ शकते. मात्र मंजुरी अभावी हातपंप दुरुस्तीचे कामही सुरु झालेले नाही. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMuncipal Corporationनगर पालिकाgovernment schemeसरकारी योजना