शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लायकी नसताना पगारवाढ मंजूर; परभणी जिल्हा परिषदेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 17:10 IST

 शासनाच्या निर्णयानुसार संगणक परीक्षा उत्तीर्ण नसतानाही काही कर्मचाऱ्यांना वेतनवाढी मंजूर करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली

परभणी :  शासनाच्या निर्णयानुसार संगणक परीक्षा उत्तीर्ण नसतानाही काही कर्मचाऱ्यांना वेतनवाढी मंजूर करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली असून अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी रोखून त्यांना प्रदान केलेली रक्कम वसूल करावी, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार शासकीय सेवेतील गट अ, गट ब, गट क या पदावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करीत असताना संगणक वापराचे ज्ञान आवश्यक आहे, म्हणून याबाबतची अर्हता ठरविण्यात आली होती. त्यानंतर ३ मे २००० रोजी या संदर्भात आदेश देऊन १ जानेवारी २००१ पासून या आदेशाचा प्रभाव लागू करण्यात आला. त्यात शासकीय कर्मचाऱ्यांना दोन वर्षाच्या आत संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते. वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना यामधून सूट देण्यात आली होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र सादर करण्यास ३१ डिसेंबर २०१७ ची अंतिम मुदत देण्यात आली होती.

संगणक परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच वार्षिक वेतनवाढ मंजूर करण्याचे आदेश असताना परभणी जिल्हा परिषदेत मात्र या शासन निर्णयाचे उल्लंघन करुन सर्रासपणे वेतनवाढी देण्यात आल्याची बाब जि.प. मुख्य कार्यकारी बी.पी. पृथ्वीराज यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी या संदर्भात आता कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. याबाबत १५ सप्टेंबर रोजी त्यांनी सर्व विभागप्रमुखांच्या नावे आदेश काढला असून त्यामध्ये संगणक परीक्षा उत्तीर्ण नसतानाही जुलै २००८ पासून काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ मंजूर केल्याची बाब निदर्शनास आली आहे. ही गंभीर स्वरुपाची बाब आहे. त्यामुळे अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी थांबविण्यात याव्यात. तसेच त्यांना अति प्रदान केलेल्या रकमेची तात्काळ वसुली करुन रक्कम शासकीय खात्यात भरणा करावी, नियमबाह्यरीत्या वेतनवाढी मंजूर करणाऱ्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करुन त्यांच्यावर शास्तीची कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे आदेश पृथ्वीराज यांनी दिले. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही पृथ्वीराज यांनी म्हटले आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

अनियमिततेचा कळससंगणक अर्हता प्रमाणपत्राची परीक्षा उत्तीर्ण नसतानाही शासकीय नियम डावलून अनेक प्रमुख अधिकाऱ्यांनी तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरुन वार्षिक वेतनवाढ मिळविली आहे. त्यामुळे या कर्मचारी- अधिकाऱ्यांनी शासनाच्या तिजोरीवर १० वर्षापासून डल्ला मारला असला तरी आता सीईओं बी.पी.पृथ्वीराज यांच्या निर्णयाने संबंधित कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली आहे. १० वर्षापासून उचललेली वार्षिक वेतनवाढीची रक्कम व्याजासह त्यांना शासनाकडे जमा करावी लागणार आहे. ही रक्कम लाखो रुपयांच्या घरात आहे. शिवाय अशा अपात्र कर्मचाऱ्यांवर मेहरबानी दाखविणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यामुळे संबंधित विभागप्रमुखांना आता जबाबदार अधिकाऱ्यांची नावे सीईओंना द्यावी लागणार आहेत. 

टॅग्स :Parbhani z pपरभणी जिल्हा परिषदparabhaniपरभणीEmployeeकर्मचारीfundsनिधी