शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

आरटीओ कार्यालयाचे कामकाज ३० एप्रिलपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:16 IST

कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने राज्यात ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने देखील आदेश काढला ...

कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने राज्यात ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने देखील आदेश काढला आहे. या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात विविध कामानिमित्त येणारे नागरिक मास्कचा वापर करीत नसल्याने दिसून आले आहे. तसेच फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे पालनही करत नाहीत. या कार्यालयात अधिक नागरिक येत असल्याने होणारी गर्दी रोखणे कठीण आहे. शिवाय या कार्यालयाच्या परिसरात १० ते १२ इतर शासकीय कार्यालये आहेत. आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तोकडी संख्या विचारात घेता, कोरोनापासून त्यांचा बचाव न झाल्यास भविष्यातील कार्यालयीन कामकाजावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता असल्याने १५ ते ३० एप्रिल या कालावधीत नवीन वाहन नोंदणी, वाहन विषयक कामे, वाहन हस्तांतरण, कर्ज बोजा चढविणे-उतरविणे, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, परवाना विषयक कामे, शिकाऊ अनुज्ञप्ती व त्या विषयक कामे, दुय्यमीकरण व नूतनीकरण, आदी कामकाज गर्दी होऊ नये, म्हणून बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी दिली. ज्यांनी या कालावधीत अपाॅइंटमेंट घेतल्या आहेत, त्यांनी त्या रद्द करून पुन्हा नवीन अपाॅइंटमेंट घ्याव्यात, यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. १ मे पासून कार्यालय नियमित सुरू राहील, असेही नखाते म्हणाले.