शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

परभणी जिल्ह्यात नद्यांनी गाठली धोक्याची पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 14:54 IST

पैठण येथील जायकवाडी प्रकल्प तसेच बीड जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्पातून गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले आहे.

परभणी : पैठण येथील जायकवाडी प्रकल्पासह गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने जिल्ह्यात गोदावरी पूर्णा आणि दुधना या तीनही नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असून, जिल्हावासीयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात पाऊस आता थांबला आहे; परंतु प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक सुरूच असल्याने प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. 

पैठण येथील जायकवाडी प्रकल्प तसेच बीड जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्पातून गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले आहे. त्यामुळे सर्व बंधारे फुल्ल झाले असून, या बंधाऱ्यातून ही नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. परिणामी अनेक भागात गोदावरी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्याजवळ गोदावरी नदीची धोक्याची पातळी ३९६ मीटर एवढी असून, सध्या या ठिकाणी गोदावरी नदीची पाणी पातळी ३९१ मीटर इतकी आहे. त्याचप्रमाणे परभणी -जिंतूर रस्त्यावर झरी पुलाजवळ दुधना नदीची धोक्याची पातळी ३८० मीटर एवढी असून, सध्या या नदीची पाणीपातळी ३८२ मीटर इतकी आहे. तर गंगाखेड शहरात गोदावरी नदीची धोक्याची पातळी ३७५ मीटर एवढी असून सध्या या नदीत ३७० मीटर पाणी पातळी आहे. तीनही नद्यांनी धोक्याची पाणी पातळी गाठली असल्याने या नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राहाटी पुलावरील वाहतूक बंदच येलदरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग कमी झाला असला तरी नदीपात्रातील पाणीपातळी अद्याप कमी झालेली नाही. परभणी- वसमत रस्त्यावरील राहाटी येथील पुलावरून हे पाणी वाहत आहे. त्यामुळे बुधवारी रात्री या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाणी कमी होण्याची शक्यता असल्याने सायंकाळनंतर वाहतूक पूर्ववत होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसriverनदी