शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात नद्यांनी गाठली धोक्याची पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 14:54 IST

पैठण येथील जायकवाडी प्रकल्प तसेच बीड जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्पातून गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले आहे.

परभणी : पैठण येथील जायकवाडी प्रकल्पासह गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने जिल्ह्यात गोदावरी पूर्णा आणि दुधना या तीनही नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असून, जिल्हावासीयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात पाऊस आता थांबला आहे; परंतु प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक सुरूच असल्याने प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. 

पैठण येथील जायकवाडी प्रकल्प तसेच बीड जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्पातून गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले आहे. त्यामुळे सर्व बंधारे फुल्ल झाले असून, या बंधाऱ्यातून ही नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. परिणामी अनेक भागात गोदावरी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्याजवळ गोदावरी नदीची धोक्याची पातळी ३९६ मीटर एवढी असून, सध्या या ठिकाणी गोदावरी नदीची पाणी पातळी ३९१ मीटर इतकी आहे. त्याचप्रमाणे परभणी -जिंतूर रस्त्यावर झरी पुलाजवळ दुधना नदीची धोक्याची पातळी ३८० मीटर एवढी असून, सध्या या नदीची पाणीपातळी ३८२ मीटर इतकी आहे. तर गंगाखेड शहरात गोदावरी नदीची धोक्याची पातळी ३७५ मीटर एवढी असून सध्या या नदीत ३७० मीटर पाणी पातळी आहे. तीनही नद्यांनी धोक्याची पाणी पातळी गाठली असल्याने या नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राहाटी पुलावरील वाहतूक बंदच येलदरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग कमी झाला असला तरी नदीपात्रातील पाणीपातळी अद्याप कमी झालेली नाही. परभणी- वसमत रस्त्यावरील राहाटी येथील पुलावरून हे पाणी वाहत आहे. त्यामुळे बुधवारी रात्री या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाणी कमी होण्याची शक्यता असल्याने सायंकाळनंतर वाहतूक पूर्ववत होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसriverनदी