शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

परभणी जिल्ह्यात नद्यांनी गाठली धोक्याची पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 14:54 IST

पैठण येथील जायकवाडी प्रकल्प तसेच बीड जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्पातून गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले आहे.

परभणी : पैठण येथील जायकवाडी प्रकल्पासह गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने जिल्ह्यात गोदावरी पूर्णा आणि दुधना या तीनही नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असून, जिल्हावासीयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात पाऊस आता थांबला आहे; परंतु प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक सुरूच असल्याने प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. 

पैठण येथील जायकवाडी प्रकल्प तसेच बीड जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्पातून गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले आहे. त्यामुळे सर्व बंधारे फुल्ल झाले असून, या बंधाऱ्यातून ही नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. परिणामी अनेक भागात गोदावरी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्याजवळ गोदावरी नदीची धोक्याची पातळी ३९६ मीटर एवढी असून, सध्या या ठिकाणी गोदावरी नदीची पाणी पातळी ३९१ मीटर इतकी आहे. त्याचप्रमाणे परभणी -जिंतूर रस्त्यावर झरी पुलाजवळ दुधना नदीची धोक्याची पातळी ३८० मीटर एवढी असून, सध्या या नदीची पाणीपातळी ३८२ मीटर इतकी आहे. तर गंगाखेड शहरात गोदावरी नदीची धोक्याची पातळी ३७५ मीटर एवढी असून सध्या या नदीत ३७० मीटर पाणी पातळी आहे. तीनही नद्यांनी धोक्याची पाणी पातळी गाठली असल्याने या नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राहाटी पुलावरील वाहतूक बंदच येलदरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग कमी झाला असला तरी नदीपात्रातील पाणीपातळी अद्याप कमी झालेली नाही. परभणी- वसमत रस्त्यावरील राहाटी येथील पुलावरून हे पाणी वाहत आहे. त्यामुळे बुधवारी रात्री या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाणी कमी होण्याची शक्यता असल्याने सायंकाळनंतर वाहतूक पूर्ववत होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसriverनदी