शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
3
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
4
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
5
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
6
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
7
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
8
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
9
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
10
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
11
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
12
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
13
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
14
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
15
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
16
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
17
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
18
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
19
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
20
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!

वजन-मापांच्या नूतनीकरणातून ७४ लाखांचा महसूल शासनाच्या तिजोरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:18 IST

परभणी : कोरोनाच्या काळात एकीकडे निधीअभावी विकास कामे ठप्प असली तरी येथील वैधमापन शास्त्र विभागाने मात्र वजन-मापांच्या नूतनीकरणातून ७४ ...

परभणी : कोरोनाच्या काळात एकीकडे निधीअभावी विकास कामे ठप्प असली तरी येथील वैधमापन शास्त्र विभागाने मात्र वजन-मापांच्या नूतनीकरणातून ७४ लाख ३१ हजार २५९ रुपयांचा महसूल फेब्रुवारी अखेरपर्यंत शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे.

जिल्ह्यातील विविध व्यावसायिकांकडून पदार्थांच्या मोजणीसाठी वापरल्या जाणाऱ्या वजन-मापांचे दरवर्षी नूतनीकरण करणे गरजेचे असते. या नूतनीकरणासाठी वैधमापन शास्त्र विभागाला दरवर्षी ठराविक उद्दिष्ट निश्चित करून दिले जाते. मात्र, यावर्षी कोरोनाचा संसर्ग असल्याने उद्दिष्ट देण्यात आले नाही. अशाही परिस्थितीत मागील वर्षाचे उद्दिष्ट ग्राह्य धरून वैधमापन शास्त्र विभागाने फेब्रुवारी महिन्याअखेर ७४ लाख ३१ हजार २५९ रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे.

परभणी आणि हिंगोली अशा दोन जिल्ह्यांचा कारभार पाहणाऱ्या या कार्यालयात एकूण चार विभाग आहेत. परभणी १ या विभागाला १८ लाख ३० हजार रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १५ लाख ३४ हजार २०४ रुपयांचा महसूल जमा झाला आहे. परभणी २ विभागात २० लाख १३ हजार ४३० रुपये, सेलू विभागातून १७ लाख ७८ हजार ९९० रुपये, तर हिंगोली विभागातून २१ लाख ४६ हजार ३५ रुपयांचा महसूल फेब्रुवारी अखेरपर्यंत जमा करण्यात आला आहे.

बाजारपेठ भागातील व्यापारी, पेट्रोल पंप, औद्योगिक वसाहती, पोस्ट ऑफिस, रेल्वे स्टेशन अशा शासकीय संस्थांसह किरकोळ विक्रेते, तसेच ज्या ज्या ठिकाणी वजनाचा वापर होतो त्या ठिकाणाहून हा महसूल एकत्रित केला जातो. त्याचप्रमाणे वजन-मापांमध्ये हेराफेरी आढळल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार या विभागाला दिले आहेत.

एकंदर मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे सर्व व्यवहार ठप्प होते. परभणी जिल्ह्याला विकास निधी प्राप्त झाला नसल्याने विकासकामेही ठप्प राहिली, अशाही परिस्थितीत वैधमापन शास्त्र विभागाने मात्र उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. मार्चअखेरपर्यंत मागील वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

दीड लाखाचा दंड वसूल

वजन-मापांमध्ये हेराफेरी केल्याच्या कारणावरून जिल्ह्यात दंडात्मक कारवाई हाती घेण्यात आली. ५२ जणांकडून १ लाख ४९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

११४८ व्यापाऱ्यांची नोंदणी

परभणी आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांतील ठोक, तसेच किरकोळ अशा एकूण १ हजार १४८ व्यापाऱ्यांची या विभागाकडे नोंदणी आहे. या व्यापाऱ्यांकडून वजन-मापांचे प्रत्येक वर्षी नूतनीकरण केले जाते. नूतनीकरणापोटी ठरवून दिलेल्या नियमानुसार ५ रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंतचा मुद्रांक वसूल केला जातो.