शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

मराठवाड्यात पाच जिल्हा परिषदांच्या शाळांमधील पाचवी, आठवीच्या नव्या वर्गांवर प्रतिबंध; शिक्षण उपसंचालकांचे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 19:14 IST

राज्याच्या शिक्षण विभागाने फक्त पाच जिल्ह्यांसाठी नियम घालून दिले आहेत़

परभणी : जिल्हा  परिषद शाळांना पाचवी व आठवीचे नवे वर्ग सुरू करण्यासंदर्भात राज्याच्या शिक्षण विभागाने फक्त पाच जिल्ह्यांसाठी नियम घालून दिले आहेत़ या नियमांमुळे जि़प़ शाळांना पाचवी व आठवीचे नवे वर्ग सुरू करणे सोपे राहिलेले नाही़ 

जिल्हा परिषद शाळांनी सरसकट पाचवी व आठवीचा वर्ग नव्याने सुरू करण्यासंदर्भात राज्याचे शिक्षण उपसंचालक शरद गोसावी यांनी नुकताच परभणी, हिंगोली, जालना, बीड व औरंगाबाद या पाच जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाधिकाऱ्यांच्या नावे आदेश काढला आहे़ या आदेशामुळे जि़प़ शाळांना पाचवी व आठवीचे नवे वर्ग सुरू करताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे़ गोसावी यांच्या आदेशानुसार शासन निर्णय २ जुलै २०१३ नुसार राज्यातील प्राथमिक अथवा उच्च प्राथमिक शाळांमध्ये आवश्यकतेनुसार पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात काही निकष देण्यात आले आहेत.

त्यानुसार ज्या ठिकाणी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे व  १ किमी परिसरात पाचवीचा त्या माध्यमाचा वर्ग नाही, अशा शाळांमध्ये इयत्ता पाचवीचा वर्ग देण्यात यावा़ ज्या ठिकाणी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे व एक किमी परिसरात पाचवीच्या त्याच माध्यमाचा वर्ग उपलब्ध आहे, अशा ठिकाणी अन्य शाळांमध्ये पाचवीचा वर्ग देण्यात येऊ नये़ ज्या ठिकाणी पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे व ३ किमी परिसरात इयत्ता आठवीचा वर्ग नाही, अशा शाळांमध्ये इयत्ता आठवीचा वर्ग देण्यात यावा, ज्या ठिकाणी पहिली ते सातवीपर्यंत व ३ किमी परिसरामध्ये त्याच माध्यमाच्या आठवीचा वर्ग उपलब्ध आहे, अशा शाळांमध्ये आठवीचा वर्ग देण्यात येऊ नये, असे या आदेशात गोसावी यांनी म्हटले आहे़ 

जि़प़च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिपत्याखालील व खाजगी व्यवस्थापनेच्या सर्व शाळांचा आढावा घेऊन जेथे जेथे अशा प्रकारचे वर्ग आवश्यक असेल त्याचा एक रितसर संयुक्त प्रस्ताव प्राथमिक शिक्षण संचालकांकडे मान्यतेसाठी पाठवावा आणि आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथी आहे तेथे पाचवी वर्ग जोडण्यात आलेला आहे व जिथे सातवी आहे तेथे आठवीचा वर्ग सरसकट देण्यात आला आहे का?, याबाबतचा अहवाल सादर करावा, असेही या आदेशात  गोसावी यांनी म्हटले आहे़ 

खाजगी शाळांना धार्जिणा आदेशशिक्षण उपसंचालक गोसावी यांनी जिल्हा परिषद शाळांच्या अनुषंगाने काढलेला आदेश हा खाजगी शिक्षण संस्थाचालक धार्जिणा असल्याची शिक्षण वर्तुळात चर्चा आहे़ नैसर्सिक पटसंख्या वाढीनुसार जिल्हा परिषद शाळांनी पाचवी व आठवीचा वर्ग वाढविल्यास काय नुकसान होणार आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ एकीकडे २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा शासनस्तरावरून घाट घातला गेला़ त्यानुसार जिल्ह्यातील आठ शाळांवर गंडात्तर आले़ आता पाचवी व आठवीच्या नव्या वर्गांवरही प्रतिबंध घालण्यात आल्याने शासनस्तरावरून निर्णय कोणासाठी घेतले जातात, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ 

पाच जिल्ह्यांसाठीच आदेशशिक्षण उपसंचालक शरद गोसावी यांनी काढलेला हा आदेश मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, जालना, बीड व औरंगाबाद या पाच जिल्ह्यांसाठीच आहे़ त्यामुळे या पाच जिल्ह्यांमधील जि़प़ शाळांसाठीच हा आदेश का काढण्यात आला आहे? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ या प्रकरणी वरिष्ठ पातळीवरूनच चौकशी होणे आवश्यक आहे़ 

टॅग्स :parabhaniपरभणीEducationशिक्षणzp schoolजिल्हा परिषद शाळाMarathwadaमराठवाडा