शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

अग्निशमनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच साडेतीन लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 18:54 IST

कंत्राटी कर्मचाऱ्यांना आगीच्या घटना आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत.

ठळक मुद्देसाडेतीन लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी एकाच केंद्रावरअत्याधुनिक साहित्याचा अभाव

परभणी :  शहरातील महानगरपालिकेच्या जुन्या सेंट्रल नाका भागातील अग्निशमन दलाच्या केंद्रामध्ये सर्व १३ कर्मचारी कंत्राटी असल्याने या कर्मचाऱ्यावरच अग्निशमन दलाचा डोलारा अवलंबून आहे.

परभणी शहराची लोकसंख्या जवळपास साडेतीन लाखांच्या घरात आहे. या सर्व नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने परभणी शहरातील सेंट्रल नाका भागात अग्निशमन दलाचे केंद्र कार्यरत आहे. यामधून शहर व परिसरातील आगीच्या घटना आटोक्यात आणण्याचे काम केले जाते. 

या ठिकाणी प्रशिक्षित कर्मचारी व आधुनिक साहित्याचा भरणा असणे गरजेचे आहे. मात्र महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. या केंद्रात ४ फायरमन, ४ मदतनिस, ५ वाहन चालक कार्यरत असून, हे सर्व कर्मचारी कंत्राटी तत्वावर काम करतात. त्याचबरोबर या केंद्रात ३ वाहने असून, त्यातील केवळ एकच वाहन हे अत्याधुनिक स्वरुपाचे आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना आगीच्या घटना आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत.

९६ आगीच्या घटनापरभणी व शहर परिसरात १ मार्च ते ३० ऑक्टोबर या काळात आगीच्या ९६ घटना घडल्या आहेत. यामध्ये ८३ फायरमन तर १३ घटनांमध्ये रेस्क्यू करून अनेक नागरिकांना संकटातून बाहेर काढण्याचे काम या कर्मचाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे साडेतीन लाख नागरिकांच्या सुरक्षितेच्या जबाबदारीचा भार एका अग्नीशमन केंद्रावर येत आहे. त्यामुळे मनपाच्या वतीने अग्नीशमन दलाची केंद्रे वाढिवण्याची मागणी होत आहे. 

अत्याधुनिक साहित्याचा अभावशहरातील कानाकोपऱ्यात घडलेल्या आगीच्या घटना विझवण्याचे काम परभणी येथील अग्नीशमन केंद्र करीत असले तरी या ठिकाणी या केंद्रांकडे केवळ तीनच वाहने उपलब्ध आहेत. त्यातील दोन वाहने जुनी असून, एकच वाहन आधुनिक यंत्रांनी युक्त आहे. त्यामुळे शहरात घडणाऱ्या घटना आटोक्यात आणण्यासाठी कसरत करावी लागते.

प्रशिक्षीत कर्मचारी मिळेनातपरभणी येथील अग्नीशमन दलामध्ये १३ कर्मचारी हे कंत्राटी स्वरुपाचे आहेत. यामध्ये फायरमन, मदतनिस व वाहन चालकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे कर्मचारी मनपाच्या वसाहतीमध्ये वास्तव्याला राहत नाहीत. त्यातही एक कर्मचारी मनपातील पाणीपुरवठा विभागातील चालक आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रशिक्षीत कायमस्वरुपी कर्मचारी असणे गरजेचे आहे. 

मनपाच्या अग्नीशमन दलामध्ये १३ कर्मचारी असून, हे कंत्राटी तत्वावर घेण्यात आले आहेत. अत्याधुनिक साधनांसह ३ वाहने आहेत. त्याचबरोबर हायड्रोलिक, केमीकल, गॅसच्या घटनाही आटोक्यात आणण्यासाठी आमच्याकडे यंत्रणा आहे. शहरातील कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटना वेळेत आटोक्यात आणण्यास मदत होते.                 -दीपक कानोडे, विभागप्रमुख 

टॅग्स :parabhaniपरभणीFire Brigadeअग्निशमन दलParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिका