शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

अग्निशमनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच साडेतीन लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 18:54 IST

कंत्राटी कर्मचाऱ्यांना आगीच्या घटना आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत.

ठळक मुद्देसाडेतीन लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी एकाच केंद्रावरअत्याधुनिक साहित्याचा अभाव

परभणी :  शहरातील महानगरपालिकेच्या जुन्या सेंट्रल नाका भागातील अग्निशमन दलाच्या केंद्रामध्ये सर्व १३ कर्मचारी कंत्राटी असल्याने या कर्मचाऱ्यावरच अग्निशमन दलाचा डोलारा अवलंबून आहे.

परभणी शहराची लोकसंख्या जवळपास साडेतीन लाखांच्या घरात आहे. या सर्व नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने परभणी शहरातील सेंट्रल नाका भागात अग्निशमन दलाचे केंद्र कार्यरत आहे. यामधून शहर व परिसरातील आगीच्या घटना आटोक्यात आणण्याचे काम केले जाते. 

या ठिकाणी प्रशिक्षित कर्मचारी व आधुनिक साहित्याचा भरणा असणे गरजेचे आहे. मात्र महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. या केंद्रात ४ फायरमन, ४ मदतनिस, ५ वाहन चालक कार्यरत असून, हे सर्व कर्मचारी कंत्राटी तत्वावर काम करतात. त्याचबरोबर या केंद्रात ३ वाहने असून, त्यातील केवळ एकच वाहन हे अत्याधुनिक स्वरुपाचे आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना आगीच्या घटना आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत.

९६ आगीच्या घटनापरभणी व शहर परिसरात १ मार्च ते ३० ऑक्टोबर या काळात आगीच्या ९६ घटना घडल्या आहेत. यामध्ये ८३ फायरमन तर १३ घटनांमध्ये रेस्क्यू करून अनेक नागरिकांना संकटातून बाहेर काढण्याचे काम या कर्मचाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे साडेतीन लाख नागरिकांच्या सुरक्षितेच्या जबाबदारीचा भार एका अग्नीशमन केंद्रावर येत आहे. त्यामुळे मनपाच्या वतीने अग्नीशमन दलाची केंद्रे वाढिवण्याची मागणी होत आहे. 

अत्याधुनिक साहित्याचा अभावशहरातील कानाकोपऱ्यात घडलेल्या आगीच्या घटना विझवण्याचे काम परभणी येथील अग्नीशमन केंद्र करीत असले तरी या ठिकाणी या केंद्रांकडे केवळ तीनच वाहने उपलब्ध आहेत. त्यातील दोन वाहने जुनी असून, एकच वाहन आधुनिक यंत्रांनी युक्त आहे. त्यामुळे शहरात घडणाऱ्या घटना आटोक्यात आणण्यासाठी कसरत करावी लागते.

प्रशिक्षीत कर्मचारी मिळेनातपरभणी येथील अग्नीशमन दलामध्ये १३ कर्मचारी हे कंत्राटी स्वरुपाचे आहेत. यामध्ये फायरमन, मदतनिस व वाहन चालकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे कर्मचारी मनपाच्या वसाहतीमध्ये वास्तव्याला राहत नाहीत. त्यातही एक कर्मचारी मनपातील पाणीपुरवठा विभागातील चालक आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रशिक्षीत कायमस्वरुपी कर्मचारी असणे गरजेचे आहे. 

मनपाच्या अग्नीशमन दलामध्ये १३ कर्मचारी असून, हे कंत्राटी तत्वावर घेण्यात आले आहेत. अत्याधुनिक साधनांसह ३ वाहने आहेत. त्याचबरोबर हायड्रोलिक, केमीकल, गॅसच्या घटनाही आटोक्यात आणण्यासाठी आमच्याकडे यंत्रणा आहे. शहरातील कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटना वेळेत आटोक्यात आणण्यास मदत होते.                 -दीपक कानोडे, विभागप्रमुख 

टॅग्स :parabhaniपरभणीFire Brigadeअग्निशमन दलParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिका